शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी घेणार आज पाणीटंचाईचा आढावा; प्रशासकीय यंत्रणा कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:27 IST

ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांनाही सहन कराव्या लागत आहेत.

अनगाव : ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांनाही सहन कराव्या लागत आहेत. हंडांभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे; नागरिक पाण्यासाठी आक्र मक झाले असून, याबाबत लोकमतने दुष्काळदाह सदराच्या माध्यमातून चालवलेल्या मालिकेची दखल घेत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी पाणीटंचाईसंबंधी आढावा बेठक बोलावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजता बैठक होणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.ठाणे जिल्ह्याच्या ग्रामिण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खड्ड्यांतील दूषित पाणी ग्रामस्थांच्या नशिबी आले असून, ही विदारक परिस्थिती लोकमतने मांडल्यानंतर यंत्रणेला जाग आली. भिंवडीचे आमदार शांताराम मोरे यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना धारेवर धरत ग्रामसेवकांची तातडीची बैठक घेऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला.या पाणीटंचाईची दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या पाणीपूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, तानसा, वैतरणा, भातसा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक बोलावली आहे. यावेळी पाणीटंचाईचा आढावा घेऊन काय उपाययोजना केल्या आहेत, पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक नियोजन व उपाय यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईसंबंधी ज्या विभागाने दुर्लक्ष केले आहे, त्यांची बैठकीआधीच दमछाक झाली आहे.

टॅग्स :thaneठाणे