शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

जिल्हाधिकारी घेणार आज पाणीटंचाईचा आढावा; प्रशासकीय यंत्रणा कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:27 IST

ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांनाही सहन कराव्या लागत आहेत.

अनगाव : ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांनाही सहन कराव्या लागत आहेत. हंडांभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे; नागरिक पाण्यासाठी आक्र मक झाले असून, याबाबत लोकमतने दुष्काळदाह सदराच्या माध्यमातून चालवलेल्या मालिकेची दखल घेत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी पाणीटंचाईसंबंधी आढावा बेठक बोलावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजता बैठक होणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.ठाणे जिल्ह्याच्या ग्रामिण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खड्ड्यांतील दूषित पाणी ग्रामस्थांच्या नशिबी आले असून, ही विदारक परिस्थिती लोकमतने मांडल्यानंतर यंत्रणेला जाग आली. भिंवडीचे आमदार शांताराम मोरे यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना धारेवर धरत ग्रामसेवकांची तातडीची बैठक घेऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला.या पाणीटंचाईची दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या पाणीपूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, तानसा, वैतरणा, भातसा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक बोलावली आहे. यावेळी पाणीटंचाईचा आढावा घेऊन काय उपाययोजना केल्या आहेत, पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक नियोजन व उपाय यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईसंबंधी ज्या विभागाने दुर्लक्ष केले आहे, त्यांची बैठकीआधीच दमछाक झाली आहे.

टॅग्स :thaneठाणे