शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

जिल्हाधिकारी घेणार आज पाणीटंचाईचा आढावा; प्रशासकीय यंत्रणा कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:27 IST

ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांनाही सहन कराव्या लागत आहेत.

अनगाव : ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांनाही सहन कराव्या लागत आहेत. हंडांभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे; नागरिक पाण्यासाठी आक्र मक झाले असून, याबाबत लोकमतने दुष्काळदाह सदराच्या माध्यमातून चालवलेल्या मालिकेची दखल घेत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी पाणीटंचाईसंबंधी आढावा बेठक बोलावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजता बैठक होणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.ठाणे जिल्ह्याच्या ग्रामिण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खड्ड्यांतील दूषित पाणी ग्रामस्थांच्या नशिबी आले असून, ही विदारक परिस्थिती लोकमतने मांडल्यानंतर यंत्रणेला जाग आली. भिंवडीचे आमदार शांताराम मोरे यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना धारेवर धरत ग्रामसेवकांची तातडीची बैठक घेऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला.या पाणीटंचाईची दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या पाणीपूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, तानसा, वैतरणा, भातसा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक बोलावली आहे. यावेळी पाणीटंचाईचा आढावा घेऊन काय उपाययोजना केल्या आहेत, पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक नियोजन व उपाय यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईसंबंधी ज्या विभागाने दुर्लक्ष केले आहे, त्यांची बैठकीआधीच दमछाक झाली आहे.

टॅग्स :thaneठाणे