शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

जिल्हा प्रशासनाचाही धान्य महोत्सव

By admin | Updated: May 7, 2017 05:54 IST

सर्वाधिक शेतकरी आठवडाबाजार गेल्या वर्षभरात ठाणे जिल्ह्यासह शहरात भरवण्यात आले. शेतकरी आणि ग्राहक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सर्वाधिक शेतकरी आठवडाबाजार गेल्या वर्षभरात ठाणे जिल्ह्यासह शहरात भरवण्यात आले. शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही त्याचा फायदा झाला. तद्वतच, धान्य महोत्सव भरवण्याची कल्पना नावीन्यपूर्ण असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे धान्य बाजारभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्र मांना जिल्हा प्रशासनातर्फे बळ देऊन ते सुरू करणार असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.शनिवारी पातलीपाडा येथील ऋ तू पार्कजवळील माझी आई शाळा येथे आयोजित दुसऱ्या धान्य महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. हा महोत्सव १० मे पर्यंत सकाळी १० ते रात्री १० वाजतापर्यंत होणार असून ठाणेकरांनी जसा गावदेवीला धान्य महोत्सवाला प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद याला मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यात सुरू केलेल्या ४४ आठवडाबाजारांचा फायदा शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही झाला आहे. त्यात, आता धान्य महोत्सव ही चांगली कल्पना असून काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांस अशा माध्यमातून श्रमाचे पैसे थेट मिळणार असतील, तर या उपक्रमांना उत्तेजन दिलेच पाहिजे. नाम आणि संस्कार संस्था तसेच इतरही सेवाभावी संस्था पुढे आल्यास त्यांना जिल्हा प्रशासन सहकार्य करेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात ७० लाखांपेक्षा जास्त नागरिक शहरी भागात राहतात आणि उर्वरित ग्रामीण भागातले आहेत. शहरी ग्राहकांना दर्जेदार धान्य बाजारभावापेक्षा कमी दरात मिळत असेल, तर त्याला निश्चित उदंड प्रतिसाद मिळेल. धान्याचे पॅकिंग व्यवस्थित असावे तसेच बाजारभावापेक्षा कमी दरात आणि दर्जेदार धान्य असेल, तर आपली विश्वासार्हता वाढेल, असे मार्गदर्शनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.