शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ठाण्यात रंगणार व्यास क्रिएशन्सचा ज्येष्ठ महोत्सव, ज्येष्ठ रत्न आणि सेवा रत्न पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:54 IST

‘ज्येष्ठ एक राष्ट्रीय संपत्ती’ हा विचार रूढ करण्यासाठी ‘व्यास क्रिएशन्स्’तर्फे प्रतिवर्षी ज्येष्ठ महोत्सवाचे आयोजन केले जाते. 

ठळक मुद्देव्यास क्रिएशन्स्’तर्फे ज्येष्ठ महोत्सवज्येष्ठ रत्न आणि सेवा रत्न पुरस्कारांचे वितरणमान्यवरांची व्याख्याने, मनोरंजनाचा कार्यक्रम, पुस्तक भेट

ठाणे : विविध संस्थांच्या भाऊगर्दीत आपलं वेगळंपण सिद्ध करून, समृद्ध आणि नेटके उपक्रम राबविण्यात व्यास क्रिएशन्स् ही संस्था नेहमीच आघाडीवर राहिली आहे. नाविन्याचा ध्यास घेऊन सृजनशीलता जपणारी व्यास क्रिएशन्स् संस्था प्रकाशन आणि समारंभ या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे.  ‘ज्येष्ठ एक राष्ट्रीय संपत्ती’ हा विचार रूढ करण्यासाठी ‘व्यास क्रिएशन्स्’तर्फे प्रतिवर्षी ज्येष्ठ महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाही मंगळवार 6 मार्च रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे ज्येष्ठ महोत्सव साजरा होणार आहे.

या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ रत्न आणि सेवा रत्न पुरस्कारांचे वितरण, नामवंत डॉक्टर्स व वैद्यांचे मार्गदर्शन, ज्येष्ठांसाठी आरोग्य व अध्यात्म या विषयावर सुसंवाद, मान्यवरांची व्याख्याने, मनोरंजनाचा कार्यक्रम, पुस्तक भेट, अल्पोपहार, जेवण... आदींची रेलचेल असेल. ज्येष्ठांचा वाढता पाठिंबा, तज्ज्ञ व श्रेष्ठींची उपस्थिती यामुळे महोत्सवाची वाढती कमान सर्वांनाच आकर्षित करीत आहे. ज्येष्ठ रत्न (वय वर्षे 60 वरील) आणि सेवा रत्न (विशेष सेवा) पुरस्कारासाठी आपल्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदि क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यक्तींचे परिचयपत्र (1 फोटोंसह) 24 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत असे आवाहन संस्थेतर्फे केले आहे. याचेच औचित्य साधून खास जेष्ठांसाठी ‘ज्येष्ठ विश्व’ नावाचे मासिक व्यास क्रिएशन्सतर्फे प्रकाशित होत आहे. साहित्य, अध्यात्म, कायदा, आर्थिक स्वावलंबन, शासकीय योजना, मनोरंजन अशा अनैक पैलूंवर भाष्य करणारे हे मासिक असेल. सदर मासिकाची मूळ किंमत रु. 60/- आहे. वार्षिक वर्गणी रु. 600/- (टपाल खर्चासहित-संपूर्ण महाराष्ट्रभर) आहे. जास्तीत जास्त ज्येष्ठांनी याचे सभासदत्व स्विकारावे, असे आवाहन व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी केले आहे. यंदाचा १७ वा ज्येष्ठ महोत्सव आहे. ज्येष्ठांसाठी युवांकांमार्फत होणारा राज्यातील एकमेव हा महोत्सव आहे.. आजवर मच्छिन्द्र  कांबळी,शंकर अभ्यंकर, पुरुषोत्तम बेर्डे, आशा खाडिलकर, अरुण नलावडे, आनंद अभ्यंकर अशा अनेक मान्यवरांनी महोत्सवाला उपस्थिती लावली आहे. या महोत्सवानिमित्त ज्येष्ठांची आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता मोहीम हि रॅली काढली जाते. आजवर ठाणे जिल्ह्यातील ५००० हुन आरोग्य विषयक तपासण्या विनामूल्य केल्या आहे. गेली ३ वर्षे समाजात कार्य करणाऱ्या ज्येष्ठ दाम्पत्याला पुरस्कार दिला जातो. अशा दाम्पत्यांनी आपली माहिती संस्थेकडे पाठविण्याचे आवाहन केले आहे. आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला  कृतार्थ जीवन पुरस्कार दिला जातो, गेल्या ३ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो. या महोत्सवाला ठाणे जिल्हा व आसपासच्या परिसरातील हजारो ज्येष्ठ गर्दी करतात, १०० हुन अधिक ज्येष्ठ नागरिक संघांचे प्रतिनिधी या महोत्सवाला आवर्जून उपस्थित असतात असे निलेश गायकवाड यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई