शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शाळा प्रवेशास मुदतवाढ, मोबाइल संदेश सेवा बंद झाल्याने रहावे लागले होते वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 03:21 IST

आरटीई २५ टक्के अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी आॅनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या सोडतीत दोन हजार ६३७ अर्जांची निवड करण्यात आली आहे.

ठाणे : आरटीई २५ टक्के अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी आॅनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या सोडतीत दोन हजार ६३७ अर्जांची निवड करण्यात आली आहे. मात्र, मोबाइल संदेश सेवा बंद झाल्यामुळे या निवड झालेल्या अर्जदारांना शाळा प्रवेशापासून वंचित राहावे लागले होते. मात्र, आता पुन्हा मोबाइल संदेश सेवा सुरू केली असून शाळा प्रवेशासाठी देखील २५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रि या राबविण्यात येत असते. ठाणे जिल्ह्यातील ६४० कायम विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रि या राबवण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी शाळा प्रवेशाची दुसरी सोडत जाहिर करण्यात आली. यामध्ये प्ले ग्रुपसाठी ५, प्री.केजी ५१७, ज्यु.केजीसाठी ५९२ आणि इयत्ता १ ली साठी १ हजार ५२३ असे मिळून २ हजार ६३७ अर्जांची निवड करण्यात आली. त्यावेळी मोबाइल संदेश सेवा बंद असल्यामुळे केवळ १८१ जणांनीच शाळा प्रवेश घेतले होते.मात्र, अनेक पालक मोबाइलवर संदेश प्राप्त होण्याची वाट बघत होते. परंतु, मोबाइल संदेश सेवा बंद झाल्यामुळे या निवड झालेल्या अर्जदारांपैकी २ हजार ४५६ अर्जदारांना शाळा प्रवेशापासून वंचित राहावे लागले होते. मात्र, आता पुन्हा मोबाइल संदेश सेवा सुरू करण्यात आली असून शाळा प्रवेशासाठीदेखील २५ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.अद्याप एवढ्या जागा शिल्लक : यात ठाणे महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत सुमारे ४२४ जागा, भिवंडी महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत २३३ जागा, अंबरनाथमध्ये २१६ जागा भरणे शिल्लक आहेत. कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत १७० , उल्हासनगर विभागांतर्गत ६२, शहापूर तालुक्यांतर्गत ५४, कल्याण ग्रामीण विभागांतर्गत ५२, भिवंडी तालुक्यांतर्गत २६, मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रात १७ तर मुरबाड तालुक्यात १२ जागा शिल्लक आहेत.>दुसºया सोडतीनंतर १९६८ जागा रिक्तठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टक्के प्रवेशाच्या आॅनलाईन प्रक्रियेची दुसरी सोडत सोमवारी जाहीर झाली. दुसºया फेरी अखेर ठाणे जिल्ह्यात सुमारे १९६८ जागा अद्यापही शिल्लक असून यात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रांतर्गत सर्वाधिक सुमारे ७०२ जागा शिल्लक आहेत. तर आता प्रवेशासाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या सर्व जागांवर गोरगरीत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असून त्यांना प्रवेश मिळावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ठाणे जिल्ह्यातील ६४० कायम विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रि या राबवण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी झालेल्या सोडतीनंतरही जिल्हयात १९६८ जागा प्रवेशासाठी शिल्लक आहेत.