शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

वीज खंडित, प्राथमिक आरोग्य केंद्रे अंधारात

By admin | Updated: March 6, 2016 01:40 IST

या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विजपुरवठा महावितरणने खंडीत केल्याने ती अंधारात आहेत. त्यामुळे रुग्णांवर अंधारात उपचार करण्याची वेळ आली आहे.

हुसेन मेमन,  जव्हारया तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विजपुरवठा महावितरणने खंडीत केल्याने ती अंधारात आहेत. त्यामुळे रुग्णांवर अंधारात उपचार करण्याची वेळ आली आहे. जव्हार तालुक्यात साकुर, साखरशेत, जामसर, नांदगाव, या चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या चारही आरोग्य केंद्रांचे वीजबील गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून थकले आहे. महावितरणने प्राथमिक आरोग्य केंद्राना गेल्या महिन्यांपासून वारंवार सूचना लेखी निवेदने देऊनही ते भरण्यात न आल्याने ही कारवाई महावितरणने केली. त्यामुळे ही केंद्रे फक्त दिवसाच रुग्णसेवा देऊ शकत आहेत.अगदी तातडीच्या परिस्थितीत मेणबत्ती अथवा चिमणीच्या प्रकाशात किंवा इमर्जन्सी व लॅम्पच्या प्रकाशात कसेबसे उपचार केले जातात. या केंद्रात रात्री-बेरात्री उपचारासाठी रोज शेकडो रुग्ण येतात. मात्र दोन दिवसांपासून वीजपुरवठा नसल्याने रुग्णांवर अंधारात उपचार केले जात आहेत. या केंद्रांचे ७ ते ८ महिन्यांपासून ३ लाख ५० हजाराचे लाईट बिल थकलेले आहे. आरोग्य केंद्रांना विद्युत लाईट नसल्याने, शीतगृहात व फ्रीजमध्ये टी.टी.चे इंजेक्शन, पोलिओ, लस, रक्त पिशवी, औषधे, इंजेक्शन फ्रीजमध्ये ठेवावे लागतात. परंतु आता फ्रीजही बंद आहे. प्रशासनाने विजेची बिले भरून या आरोग्य केंद्राचा पुरवठा तातडीने सुरू करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य- रतन बुधर, व जव्हार पंचायत समिती सदस्य- सुधाकर वळे, व मनोज गावंढा यांनी केली आहे. अन्याथा जव्हार एमएसीबीवर आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)पावसामुळे झाडे उन्मळलीजव्हार : या शहरात गुरूवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जव्हार शहराला चांगलेच झोडपले, मुकणे आळीतील सदू मुकणे व अरूण सहाने याच्या दुकानावर व परिसरातील मोटरसायकलींवर भले मोठे आंब्याचे झाड उन्मळून पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शहरात काही ठिकाणी मोठ मोठी झाडे पडली. परंतु आसपास घरे अगर इतर कोणीही नसल्यामुळे कुठलेही नुकसान झालेले नाही. जव्हार नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे प्रमुख अखलाक कोतवाल आणि त्यांचे सहकारी यांनी तातडीने मनुष्यबळ वापरून झाडांच्या फांद्या कापून रस्ता मोकळा केला आहे. जव्हार मधील जुनी डॅम आळी येथील रहिवाशांच्या काही घरांचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले आहे, तर काही तुंबलेल्या गटारीत आलेले पावसाचे पाणी नासीर मेमन यांच्या घरात घुसून सर्वत्र दुर्गधी पसरली होती, त्यामुळे काही घरातील मंडळींना घर धुवून काढावे लागले, तसेच जव्हार तालुक्यातील खेडोपाड्यातही काजू व आंब्यांच्या बागांचे मोहोर गळल्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेले आहे, गेल्या दोन तीन वर्षापासून फेब्रुवारी व मार्र्च महिन्यात अचानक अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात आंबा व काजूची आवक कमी होत चालली आहे, मेहनत करून फळ मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे नुकासान सहन करण्याखेरीज दुसरे काहीच करता येत नाही, आणि शासनाच्या तटपुंज्या भरपाईमुळे झालेले नुकसान भरून निघत नाही असे शेतकऱ्यांनी बोलतांना सांगितले. (वार्ताहर)