शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

प्रभागातच लागणार कचऱ्याची विल्हेवाट

By admin | Updated: March 24, 2017 01:03 IST

पश्चिमेतील कोकण विभाग वसाहतीच्या शिवसेना नगरसेविका नीलिमा पाटील यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे या

कल्याण : पश्चिमेतील कोकण विभाग वसाहतीच्या शिवसेना नगरसेविका नीलिमा पाटील यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे या प्रभागातील ओल्या कचऱ्यावर आता प्रभागातच प्रक्रिया होणार आहे. गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक संजय पाटील, मनसृष्टी संस्थेच्या संचालिका वैशाली तांबट आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभागात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करू शकतो, ही संकल्पना मनसृष्टी संस्थेच्या तांबट यांनी मांडली. त्यांच्या सूचनेनुसार नगरसेविका पाटील यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे. महापालिकेच्या प्रकल्पाची वाट न पाहता एक लहान प्रयत्न पाटील यांनी सुरू केल्याने त्यांच्या या सकारात्मक कृतीचे देवळेकर यांनी कौतुक केले. तसेच हा प्रकल्प नियमित सुरू राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रभागातील कचरा प्रभागात खतप्रक्रियेसाठी वापरला जाईल. त्यामुळे प्रभागात दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल. तसेच कचरा वाहून नेण्यासाठी फक्त सुक्या कचऱ्याच्या वाहतुकीवर खर्च करावा लागेल. जैव कचरा गांडूळ खतासाठी वापरला जाईल. कल्याण-डोंबिवली महापालिका केवळ दोन टन कचऱ्यावर प्रक्रिया करते. शहरातून गोळा होणाऱ्या ५७० मेट्रीक टन कचऱ्यापैकी केवळ सहा टन कचऱ्यावर महापालिका प्रक्रिया करते. महापालिकेने १२ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प प्रस्तावित केले आहे. त्यापैकी उंबर्डे येथेच १० टन क्षमतेचा प्रकल्प सुरू झाला आहे. प्रत्येक प्रभागातील नगरसेवकाने पाटील यांच्या धर्तीवर प्रभागात लहान गांडूळ खत प्रकल्प सुरू केल्यास कचरा वाहतुकीचा खर्च कमी होऊन जागच्या जागेवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे कचराकुंडीत कचरा साठणार नाही. तसेच दुर्गंधीचा सामनाही करावा लागणार नाही. ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकावा, अशी तंबी महापालिकेने दिली होती. मात्र, ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे काम महापालिकेने सुरूच केलेले नाही. केवळ कारवाईचे इशारे देऊन कचरा वर्गीकृत पद्धतीने गोळा होणार नाही. त्यासाठी नागरिकांना शिस्त लावली गेली पाहिजे. प्रत्येक प्रभागात कचऱ्यापासून २४ तासांत खतनिर्मिती यंत्र पुरवण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या पटलावर आला होता. त्या यंत्र खरेदीचे घोडे कुठे अडले, हे अद्याप कोणालाही माहिती नाही. तसेच महापालिका ५०० कर्मचाऱ्यांना कचरा खाणाऱ्या जादूच्या बादल्या पुरवल्या जाणार होत्या. (प्रतिनिधी)