शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणामुळे भिवंडीत वाढले क्षयाचे रूग्ण

By admin | Updated: September 15, 2015 23:09 IST

शहरातील कल्याणरोड परिसरांत मोठ्या संख्येंने मोती कारखाने असून त्यातून पसरणाऱ्या प्रदूषणांतून आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये क्षयरोगाची लागण झाल्याचे आढळून आले असून नागरिकांच्या

- पंढरीनाथ कुंभार,  भिवंडीशहरातील कल्याणरोड परिसरांत मोठ्या संख्येंने मोती कारखाने असून त्यातून पसरणाऱ्या प्रदूषणांतून आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये क्षयरोगाची लागण झाल्याचे आढळून आले असून नागरिकांच्या जीवितास घातक बनलेले मोती कारखाने बंद करण्याची मागणी होत आहे. शहरात कल्याणरोड परिसरांतील नवी वस्ती, बाबला कंपाऊण्ड, रावजीनगर, नारायण कंपाऊण्ड, गणेश सोसायटी, पाईपलाईन, शांतीनगर आदी परिसरांत मोठ्या संख्येने मोती कारखाने आहेत. त्यात प्लॅस्टीकच्या दाण्यापासून मणी तयार करतात. त्यावर कोटींग करून मोती रंग दिला जातो. त्यामुळे ते मोत्यासारखे चमकतात. या मोतीसारख्या दिसणाऱ्या मण्यांना मुंबईतील मार्केटमध्ये भरपूर मागणी असल्याने शहरांत शेकडोच्या संख्येने मोती कारखाने सुरू आहेत. दाट लोकवस्तीमध्ये ते असल्याने तेथे वापरण्यात येणाऱ्या घातक रासायनिक पदार्थांचे व द्रव्यांचे प्रदूषण या लोकवस्तीत पसरल्याने नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो आहे. मण्यांवर कोटींग करताना होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेतून परिसरांत ते होते. त्यामुळे नागरिकांना चक्कर येणे, जीव गुदमरणे, फुफ्फुसाचे आजार व क्षयरोग असे आजार होत आहेत. नागरिकांच्या जीवास धोका निर्माण करणारे प्रदूषण मोती कारखान्यापासून होते याची माहिती प्रदूषण विभाग व फॅक्टरी विभागास आहे. तरीदेखील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तसेच प्रदूषण विभागाने अद्याप या कारखानदारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे परिसरांतील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्लॅस्टीकच्या दाण्यापासून मणी बनविल्यानंतर त्यावर कोटींग करण्यासाठी इन्थोल क्लोराईड व मिथॉल क्लोराईड ही केमीकल वापरली जातात. त्यापासून लेमोनायटीस(फुफ्फुस सुकणे), टी.बी. (क्षयरोग)होतात. याबाबत लेखी तक्रारी देऊनही संबधित शासकीय अधिकारी कारवाईस टाळाटाळ करतात.- मुकेश लांबोळे, तक्रारदार, डार्इंग प्रयोगशाळा इन्चार्ज