शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रदूषणामुळे भिवंडीत वाढले क्षयाचे रूग्ण

By admin | Updated: September 15, 2015 23:09 IST

शहरातील कल्याणरोड परिसरांत मोठ्या संख्येंने मोती कारखाने असून त्यातून पसरणाऱ्या प्रदूषणांतून आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये क्षयरोगाची लागण झाल्याचे आढळून आले असून नागरिकांच्या

- पंढरीनाथ कुंभार,  भिवंडीशहरातील कल्याणरोड परिसरांत मोठ्या संख्येंने मोती कारखाने असून त्यातून पसरणाऱ्या प्रदूषणांतून आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये क्षयरोगाची लागण झाल्याचे आढळून आले असून नागरिकांच्या जीवितास घातक बनलेले मोती कारखाने बंद करण्याची मागणी होत आहे. शहरात कल्याणरोड परिसरांतील नवी वस्ती, बाबला कंपाऊण्ड, रावजीनगर, नारायण कंपाऊण्ड, गणेश सोसायटी, पाईपलाईन, शांतीनगर आदी परिसरांत मोठ्या संख्येने मोती कारखाने आहेत. त्यात प्लॅस्टीकच्या दाण्यापासून मणी तयार करतात. त्यावर कोटींग करून मोती रंग दिला जातो. त्यामुळे ते मोत्यासारखे चमकतात. या मोतीसारख्या दिसणाऱ्या मण्यांना मुंबईतील मार्केटमध्ये भरपूर मागणी असल्याने शहरांत शेकडोच्या संख्येने मोती कारखाने सुरू आहेत. दाट लोकवस्तीमध्ये ते असल्याने तेथे वापरण्यात येणाऱ्या घातक रासायनिक पदार्थांचे व द्रव्यांचे प्रदूषण या लोकवस्तीत पसरल्याने नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो आहे. मण्यांवर कोटींग करताना होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेतून परिसरांत ते होते. त्यामुळे नागरिकांना चक्कर येणे, जीव गुदमरणे, फुफ्फुसाचे आजार व क्षयरोग असे आजार होत आहेत. नागरिकांच्या जीवास धोका निर्माण करणारे प्रदूषण मोती कारखान्यापासून होते याची माहिती प्रदूषण विभाग व फॅक्टरी विभागास आहे. तरीदेखील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तसेच प्रदूषण विभागाने अद्याप या कारखानदारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे परिसरांतील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्लॅस्टीकच्या दाण्यापासून मणी बनविल्यानंतर त्यावर कोटींग करण्यासाठी इन्थोल क्लोराईड व मिथॉल क्लोराईड ही केमीकल वापरली जातात. त्यापासून लेमोनायटीस(फुफ्फुस सुकणे), टी.बी. (क्षयरोग)होतात. याबाबत लेखी तक्रारी देऊनही संबधित शासकीय अधिकारी कारवाईस टाळाटाळ करतात.- मुकेश लांबोळे, तक्रारदार, डार्इंग प्रयोगशाळा इन्चार्ज