शहरं
Join us  
Trending Stories
1
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
2
'स्वतःचे अपयश लपवण्याची पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
4
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
5
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
6
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
7
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
8
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
9
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
10
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
11
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
12
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
13
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
14
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
15
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
16
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
17
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
18
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
19
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
20
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?

लोकसभेच्या कमी टक्केवारीच्या परिणामांवर राजकीय वर्तुळात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:49 IST

ठाण्यात घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला आणि भिवंडी व कल्याणमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा व तोटा कोणाला याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

ठाणे : लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही ठाण्यासारख्या सुशिक्षित मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत १.६४ टक्के घट झाली. तर कल्याण आणि भिवंडीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यामुळे ठाण्यात घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला आणि भिवंडी व कल्याणमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा व तोटा कोणाला याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

ठाण्यात ४९.२३ टक्के म्हणजेच २०१४ च्या तुलनेत १.६४ टक्के कमी मतदान झाले तर कल्याणमध्ये ४५.२८ टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्यावेळी येथे ४२.८८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत २.३९ टक्के मतदान वाढले आहे. तर भिवंडीत ५३.०७ टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीत ५१.६२ टक्के मतदान झाले होते. यावेळी त्यात १.४५ टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाच्या आकड्याचा विचार करता ठाण्यात १ लाख १२ हजार ६९७ मतांची वाढ झाली आहे. भिवंडीत १ लाख २७ हजार ७४ मतांची वाढ झाली आहे. तर कल्याणमध्ये ६४ हजार ३९५ एवढ्या मतांची वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे यावेळी मतदानाची वेळ तासाभराने वाढविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही ठाण्यातील मतांची टक्केवारी घटल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये २० लाख ७३ हजार २५१ मतदारांपैकी १० लाख ५४ हजार ५७५ मतदारांनी (५०.८७ टक्के) मतदान केले होेते. यावेळी २३ लाख ७० हजार २७३ मतदारांपैकी ११ लाख ६६ हजार ८८६ मतदारांनी (४९.२३ टक्के ) हक्क बजावला. यावरून १.६४ टक्के मतदान कमी झाले असले तरी झालेल्या मतदार संख्येचा विचार करता १ लाख १२ हजार ६९७ मतदानाची प्रत्यक्ष भर पडली आहे. ठाण्यात मतदार यादीत घोळ झाल्याचे दिसून आले. कल्याण आणि भिवंडीमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती होती. अनेकांची नावेच गहाळ होती. त्यामुळे अनेक मतदारांची ईच्छा असूनही, त्यांना मतदान करता आले नाही.

मतदारयाद्यांमध्ये यावेळीही ठिकठिकाणी त्रुटी आढळल्या. एकाच कुटुंबातील व्यक्तींचे मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर देण्यात आले होते. या सर्व बाबींचा मतदानावर परिणाम झाला. शिवाय वाढत्या उन्हामुळे आणि सलग आलेल्या पाच दिवसांच्या सुट्यांचा मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकVotingमतदानthane-pcठाणे