शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

भाजपात अंतर्गत असंतोष

By admin | Updated: June 29, 2017 02:36 IST

स्वपक्षाच्या काहींचा काटा काढण्यासाठी, पक्षात स्वत:ची ताकद आणि वर्चस्व वाढवण्यासाठी, अन्य पक्षाचे नगरसेवक

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : स्वपक्षाच्या काहींचा काटा काढण्यासाठी, पक्षात स्वत:ची ताकद आणि वर्चस्व वाढवण्यासाठी, अन्य पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याचा सपाटा लावणाऱ्या भाजपा आमदार नरेंद्र मेहतांपुढे आता उमेदवारी कोणाला द्यायची? याचे धमर्संकट उभे ठाकले आहे. पक्षातील जुने कार्यकर्ते, अनेक विद्यमान नगरसेवक तसेच गरजेपोटी आश्वासने देऊन पक्षात घेतलेल्या अनेकांचे पत्ते कापले जाणार असल्याच्या चर्चेने भाजपात असंतोष खदखदत आहे. त्यामुळे मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीत सर्वात जास्त बंडाळी भाजपात होण्याची चिन्हे आहेत. बंड मोडून काढणे, निवडणुकीचे वारे समजून घेणे, त्यात ठराविक मुद्दे योग्य वेळी आणणे, वेगवेगळे समाजगट सांभाळणे आणि आर्थिक आघाडी भक्कम असणे ही मेहता यांची वैशिष््टये मानली जातात. त्यातच मुंबई-ठाणे, भिवंडीप्रमाणेच पक्षाकडूनही उमेदवारांना घसघशीत निधी मिळणार असल्याने भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मेहता यांनी जी गणिते जुळवली त्यावेळेपासूनच अनकांना पालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यातील अनेकांची गरज आता संपली आहे. त्यातही पालिकेत भाजपाची सत्ता आणायची असेल तर बदलेलेल्या प्रभाग रचनेचा, सामाजिक गणितांचा विचार महत्त्वाचा असल्याने पक्षातील विद्यमान नगरसेवकांचाही पत्ता कापला जाण्याची चिन्हे आहेत. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीलाही भगदाड पडल्याने, मनसे, बविआही निष्प्रभ ठरल्याने शिवसेना वगळता एकही प्रभावी विरोधक उरलेला नाही. त्यामुळे आर्थिक व राजकीयदृष्ट्या सक्षम झालेल्या मेहता यांचाच एकछत्री अंमल आणि प्रभाव या निवडणुकांवर आहे. भाजपाच्या प्रदेश नेतृत्वानेही त्यांच्याच हाती निवडणुकीची सूत्रे सोपवल्याने पक्षांतर्गत नाराजांनाचाही आवाज दाबला गेला आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी बाहेरून पक्षात आलेल्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यातच प्रभागाचा आकारही दुप्पट झाला आहे आणि स्वबाविकपणे खर्चही. त्यामुळे इच्छुकांत धाकधूक आहे. मेहतांनी मात्र काही ठराविक जणांनाच प्रचारासाठी हिरवा कंदिल दाखवला आहे आणि उरलेल्यांना सबुरीचा उपदेश केला आहे. त्यातही सध्याच्या पद्धतीनुसार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बहुतांश इच्छुकांना झुलवत ठेवले जाऊ शकते. माजी आयुक्त शिवमूर्ती नाईक, माजी नगरसेवक ओमप्रकाश अग्रवाल, ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅड. दिलीप पंडित, भगवान कौशिक आदींनी आधीच मेहतांविरुध्द बंडाचा झेंडा फडकावत नव्या भाजपाची स्थापना केली आहे.