शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

भिवंडीत कृषी विभागाची रोपवाटिका पाणी सिंचनासाठी चाळीस लाखांची उधळण; निकृष्ट बांधकाम करून भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 18:22 IST

विशेष म्हणजे २५ सप्टेंबर पर्यंत काम अर्धवट असताना परेश चौधरी यांच्या तक्रारी नंतर ठेकेदाराने प्रशासना सोबत हातमिळवणी करीत रंगरंगोटी करून काम पूर्ण झाल्याचे भासविले असल्याचा आरोप देखील मनसेचे चौधरी यांनी केला आहे .

- नितिन पंडीत

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळ रोपवाटीकेस पाणी सिंचनासाठी काँक्रेट पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये खर्च करण्यात आले असून या निधीतून २५ हजार लिटर साठवणूक क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट व तकलादू केले असून योजना पूर्ण होण्या आधीच ठेकेदारास काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देत सर्व रक्कम अदा केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष परेश चौधरी यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे .

 विशेष म्हणजे २५ सप्टेंबर पर्यंत काम अर्धवट असताना परेश चौधरी यांच्या तक्रारी नंतर ठेकेदाराने प्रशासना सोबत हातमिळवणी करीत रंगरंगोटी करून काम पूर्ण झाल्याचे भासविले असल्याचा आरोप देखील मनसेचे चौधरी यांनी केला आहे .

 राज्य शासनाच्या कृषी विभागाने ४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश काढून भिवंडी चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळरोपवाटीका बळकटीकरण योजने अंतर्गत पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यास मंजुरी दिली असता ठाणे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागा मार्फत फळ रोपवाटिका असलेल्या ठिकाणी असलेल्या विहिरीतील पाणी साठविण्यासाठी २५ हजार लिटर साठवणूक क्षमता असलेली पाण्याची काँक्रीट टाकी उभारण्यात आली आहे त्यासाठी ३२ लाख ६४ हजार २१ रुपये व बोअर वेल बांधण्यासाठी ८ लाख ६३ हजार ४२ रुपये असे एकत्रित ४१ लाख २७ हजार ६३ रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली.

परंतु या ठिकाणी उभारलेली टाकी ही जुन्या काँक्रीट पिलर्स वरच उभारली असून त्यासाठी तकलादू साहित्य वापरात निकृष्ट काम केले असून त्या बाबत तक्रार केल्या नंतर सदरच्या टाकीस ठेकेदाराने प्लास्टर न करताच रंगरंगोटी केली असून बोअरवेल अजून लावली नसतानाच कृषी विभागाने ठेकेदारास सर्व रक्कम दिली असल्याचे पुरावे परेश चौधरी यांनी माहिती अधिकारात मिळविले असल्याचे स्पष्ट केले आहे. 

 फळरोपवाटीकेस पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा या साठी शासन आटापिटा करत असतांनाच रोपवाटीकेत विहीर असून तेथील पाणी थेट रोपवाटीकेत देणे शक्य असताना त्यासाठी लाखो रुपयांची उधळण करीत साठवणूक टाकी उभारण्याची गरजच काय , या भ्रष्ट कारभाराची शासनाने पुन्हा चौकशी करावी व ठेकेदारावर व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया मनविसेनेचे परेश चौधरी यांनी दिली आहे. 

तर पाण्याच्या टाकीकॅगे काम उत्तम झाले असून त्यात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही अशी प्रतिक्रिया भिवंडी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सुदेश भास्कर यांनी दिली आहे.