शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत कृषी विभागाची रोपवाटिका पाणी सिंचनासाठी चाळीस लाखांची उधळण; निकृष्ट बांधकाम करून भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 18:22 IST

विशेष म्हणजे २५ सप्टेंबर पर्यंत काम अर्धवट असताना परेश चौधरी यांच्या तक्रारी नंतर ठेकेदाराने प्रशासना सोबत हातमिळवणी करीत रंगरंगोटी करून काम पूर्ण झाल्याचे भासविले असल्याचा आरोप देखील मनसेचे चौधरी यांनी केला आहे .

- नितिन पंडीत

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळ रोपवाटीकेस पाणी सिंचनासाठी काँक्रेट पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये खर्च करण्यात आले असून या निधीतून २५ हजार लिटर साठवणूक क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट व तकलादू केले असून योजना पूर्ण होण्या आधीच ठेकेदारास काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देत सर्व रक्कम अदा केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष परेश चौधरी यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे .

 विशेष म्हणजे २५ सप्टेंबर पर्यंत काम अर्धवट असताना परेश चौधरी यांच्या तक्रारी नंतर ठेकेदाराने प्रशासना सोबत हातमिळवणी करीत रंगरंगोटी करून काम पूर्ण झाल्याचे भासविले असल्याचा आरोप देखील मनसेचे चौधरी यांनी केला आहे .

 राज्य शासनाच्या कृषी विभागाने ४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश काढून भिवंडी चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळरोपवाटीका बळकटीकरण योजने अंतर्गत पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यास मंजुरी दिली असता ठाणे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागा मार्फत फळ रोपवाटिका असलेल्या ठिकाणी असलेल्या विहिरीतील पाणी साठविण्यासाठी २५ हजार लिटर साठवणूक क्षमता असलेली पाण्याची काँक्रीट टाकी उभारण्यात आली आहे त्यासाठी ३२ लाख ६४ हजार २१ रुपये व बोअर वेल बांधण्यासाठी ८ लाख ६३ हजार ४२ रुपये असे एकत्रित ४१ लाख २७ हजार ६३ रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली.

परंतु या ठिकाणी उभारलेली टाकी ही जुन्या काँक्रीट पिलर्स वरच उभारली असून त्यासाठी तकलादू साहित्य वापरात निकृष्ट काम केले असून त्या बाबत तक्रार केल्या नंतर सदरच्या टाकीस ठेकेदाराने प्लास्टर न करताच रंगरंगोटी केली असून बोअरवेल अजून लावली नसतानाच कृषी विभागाने ठेकेदारास सर्व रक्कम दिली असल्याचे पुरावे परेश चौधरी यांनी माहिती अधिकारात मिळविले असल्याचे स्पष्ट केले आहे. 

 फळरोपवाटीकेस पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा या साठी शासन आटापिटा करत असतांनाच रोपवाटीकेत विहीर असून तेथील पाणी थेट रोपवाटीकेत देणे शक्य असताना त्यासाठी लाखो रुपयांची उधळण करीत साठवणूक टाकी उभारण्याची गरजच काय , या भ्रष्ट कारभाराची शासनाने पुन्हा चौकशी करावी व ठेकेदारावर व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया मनविसेनेचे परेश चौधरी यांनी दिली आहे. 

तर पाण्याच्या टाकीकॅगे काम उत्तम झाले असून त्यात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही अशी प्रतिक्रिया भिवंडी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सुदेश भास्कर यांनी दिली आहे.