शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला आपत्ती व्यवस्थापन अधिकारीच नाही!

By admin | Updated: May 28, 2016 02:49 IST

डोंबिवलीत झालेल्या स्फोटाच्या दुर्दैवी घटनेनंतर ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कोण, अशी विचारणा होत होती. मात्र, मागील आठ महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हा आपत्ती अधिकाऱ्यांनी

- पंकज रोडेकर, ठाणे

डोंबिवलीत झालेल्या स्फोटाच्या दुर्दैवी घटनेनंतर ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कोण, अशी विचारणा होत होती. मात्र, मागील आठ महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हा आपत्ती अधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर कायमस्वरूपी जिल्हा आपत्ती अधिकारी मिळत नसल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान,एकाची नियुक्ती केली होती. मात्र, त्या अधिकाऱ्याने १० दिवसांतच राजीनामा दिल्याने पुन्हा हे पद रिक्त आहे. पावसाळा तोंडावर आल्याने ते भरावे, अशी मागणी होऊ लागली आहे.जिल्ह्यात तसेच आसपासच्या शहरांत पावसाळ्यात उद्भवलेल्या आपत्ती निवारणासाठी जिल्हा आपत्ती कक्षाची स्थापना केली आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी महापालिका क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात अनेक इमारती जुन्या असल्याने त्या धोकादायक तसेच अतिधोकादायक झाल्या आहेत. पावसाळ्यात त्या कोसळण्याची शक्यता अधिकच असते. या दुर्घटनांमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे तसेच जिल्ह्यातील कंपन्यांमध्येदेखील एखादी अनुचित घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व तेथील कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागासह त्यांच्या प्रमुखाचे असते. २०१५ च्या आॅगस्ट महिन्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कक्षप्रमुख डॉ. जयदीप विसावे यांनी वैयक्तिक कारण देऊन राजीनामा दिला. त्यानंतर, जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबवली गेली. मात्र, तिला योग्य तो प्रतिसाद मिळाला नव्हता. याचदरम्यान, मीरा-भार्इंदरचे नगररचनाकार दिलीप घेवारे यांना या पदाची तात्पुरत्या स्वरूपात जबाबदारी दिली. त्यानंतर, पुन्हा भरती प्रक्रि या राबवल्यावर त्याला चांगला प्रतिसाद लाभल्याने जिल्हा आपत्ती कक्ष अधिकारीपदी सांगलीचे मोहन भोरे यांची नियुक्ती झाली. मात्र, त्यांनीदेखील कौटुंबिक कारणामुळे १० दिवसांतच राजीनामा दिल्यानंतर भरती प्रक्रि येनुसार निवड झालेल्या १० पैकी दोन नंबरच्या साताऱ्यातील उमेदवाराची निवड केली. त्यांनी काही दिवसांतच या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नियमानुसार निवड केलेल्या १० उमेदवारांपैकी तीन नंबरवर असलेल्या उमेदवाराच्या शिफारशीचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी ठेवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी विशेष बाब म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील कार्यालय अधीक्षक पद्माकर दळवी यांच्याकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवल्याचे पत्रक एप्रिल महिन्यात काढले. मात्र, त्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.