शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

जिल्ह्याला आपत्ती व्यवस्थापन अधिकारीच नाही!

By admin | Updated: May 28, 2016 02:49 IST

डोंबिवलीत झालेल्या स्फोटाच्या दुर्दैवी घटनेनंतर ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कोण, अशी विचारणा होत होती. मात्र, मागील आठ महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हा आपत्ती अधिकाऱ्यांनी

- पंकज रोडेकर, ठाणे

डोंबिवलीत झालेल्या स्फोटाच्या दुर्दैवी घटनेनंतर ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कोण, अशी विचारणा होत होती. मात्र, मागील आठ महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हा आपत्ती अधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर कायमस्वरूपी जिल्हा आपत्ती अधिकारी मिळत नसल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान,एकाची नियुक्ती केली होती. मात्र, त्या अधिकाऱ्याने १० दिवसांतच राजीनामा दिल्याने पुन्हा हे पद रिक्त आहे. पावसाळा तोंडावर आल्याने ते भरावे, अशी मागणी होऊ लागली आहे.जिल्ह्यात तसेच आसपासच्या शहरांत पावसाळ्यात उद्भवलेल्या आपत्ती निवारणासाठी जिल्हा आपत्ती कक्षाची स्थापना केली आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी महापालिका क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात अनेक इमारती जुन्या असल्याने त्या धोकादायक तसेच अतिधोकादायक झाल्या आहेत. पावसाळ्यात त्या कोसळण्याची शक्यता अधिकच असते. या दुर्घटनांमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे तसेच जिल्ह्यातील कंपन्यांमध्येदेखील एखादी अनुचित घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व तेथील कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागासह त्यांच्या प्रमुखाचे असते. २०१५ च्या आॅगस्ट महिन्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कक्षप्रमुख डॉ. जयदीप विसावे यांनी वैयक्तिक कारण देऊन राजीनामा दिला. त्यानंतर, जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबवली गेली. मात्र, तिला योग्य तो प्रतिसाद मिळाला नव्हता. याचदरम्यान, मीरा-भार्इंदरचे नगररचनाकार दिलीप घेवारे यांना या पदाची तात्पुरत्या स्वरूपात जबाबदारी दिली. त्यानंतर, पुन्हा भरती प्रक्रि या राबवल्यावर त्याला चांगला प्रतिसाद लाभल्याने जिल्हा आपत्ती कक्ष अधिकारीपदी सांगलीचे मोहन भोरे यांची नियुक्ती झाली. मात्र, त्यांनीदेखील कौटुंबिक कारणामुळे १० दिवसांतच राजीनामा दिल्यानंतर भरती प्रक्रि येनुसार निवड झालेल्या १० पैकी दोन नंबरच्या साताऱ्यातील उमेदवाराची निवड केली. त्यांनी काही दिवसांतच या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नियमानुसार निवड केलेल्या १० उमेदवारांपैकी तीन नंबरवर असलेल्या उमेदवाराच्या शिफारशीचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी ठेवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी विशेष बाब म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील कार्यालय अधीक्षक पद्माकर दळवी यांच्याकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवल्याचे पत्रक एप्रिल महिन्यात काढले. मात्र, त्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.