शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
2
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
3
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
4
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
5
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
6
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
7
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
8
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
9
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
10
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
11
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
12
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
13
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर
14
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
15
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
16
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
17
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
18
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
19
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
20
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले

खराब रस्त्यामुळे गावातील घरांची धूळधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 01:12 IST

शहापूरपासून पुढे जाणारा सापगावपर्यंतचा रस्ता हा महामार्ग आहे, यावर विश्वासच बसत नाही. फूटभर खोलीचे असंख्य असे खड्डे या रस्त्याला पडले असून केवळ नाममात्र खड्डे भरण्याची प्रक्रिया केली.

भातसानगर / शहापूर : शहापूर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. शहापूरपासून सापगावपर्यंत जाणारा महामार्गाचा रस्ता जागाेजागी उखडला आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे गाेठेघर-सापगाव या गावांतील घरांची अक्षरश: धूळधाण उडत आहे. त्यामुळे आराेग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता शहापूर ते सापगाव रस्त्यासाठी गावातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

शहापूरपासून पुढे जाणारा सापगावपर्यंतचा रस्ता हा महामार्ग आहे, यावर विश्वासच बसत नाही. फूटभर खोलीचे असंख्य असे खड्डे या रस्त्याला पडले असून केवळ नाममात्र खड्डे भरण्याची प्रक्रिया केली. मात्र, तद्नंतर आजपर्यंत हा रस्ता तसाच आहे. सापगाव ते शहापूर हे अंतर अडीच किलोमीटर अंतराचे असून या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गोठेघर-सापगाव या गावांतील घरांत दिवसभर धूळ जाऊन अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  त्यामुळे आता हा रस्ता व्हावा, यासाठी नेते, राजकीय व्यक्ती नाहीत, तर गावकरी आंदोलनाच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. कुणीच राजकीय व्यक्ती लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.  

शहापूर-सापगाव रस्त्याचे काम होत नसल्याने व नागरिकांना होत असलेला त्रास पाहता सापगाव येथील नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याचे ग्रामस्थ तानाजी अंदाडे, दीपक अंदाडे, नंदकुमार देसले, निवृत्ती देसले, विलास देसले, संजय देसले, गुरुनाथ अंदाडे, लक्ष्मण दुधाळे आदींनी यावेळी सांगितले. दरम्यान, महिला  राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा विद्या वेखंडे यांनीही लक्ष वेधले आहे.  सात दिवसांत हा रस्ता सुरळीत न झाल्यास याच रस्त्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एमएसआरडीसी प्रशासनाला त्यांनी दिला आहे. 

वाहने नादुरुस्त हाेण्याचे वाढले प्रमाण

  • मोठ्या प्रमाणात या महामार्गावरून वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यातील धूळ ही घराघरांत जाऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 
  • खड्ड्यांमुळे अनेक वाहने नादुरुस्त होत आहेत. अनेक अपघात होत असून अनेकांना आतापर्यंत या खड्ड्यांमुळे जीवही गमवावा लागला आहे.