शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

हॉटेल सायंकाळी सुरू ठेवण्याची खवय्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 00:33 IST

वेळेबाबत सुसूत्रता हवी; सायंकाळीच कोरोनाचा प्रसार होतो?

ठाणे : हॉटेल सायंकाळी सातनंतर बंद करण्याच्या आदेशामुळे हॉटेल व्यावसायिकांमधून संताप व्यक्त केला जात असताना खवय्यांनीही ते उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. हॉटेल किंवा अन्य खाद्यपदार्थांच्या दुकानांत जाण्यासाठी संध्याकाळीच खवय्ये बाहेर पडतात. त्यामुळे सायंकाळी सातनंतरही हॉटेल्स सुरू ठेवण्याची मागणी ठाण्यातील खवय्यांनी केली आहे.शासनाने सोमवारपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याचे आदेश दिले. या वेळेला हॉटेल व्यावसायिकांनी विरोध केला आहे. हॉटेलचा मुख्यत्वे व्यवसाय हा सायंकाळी असतो. त्यामुळे सकाळी ११ ते रात्री ११ या वेळेत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी सोमवारी महापालिका प्रशासनाला केली. त्यांच्या या मागणीला ठाण्यातील खवय्यांनीपण दुजोरा दिला आहे. दिवसभर काम केल्यावर सायंकाळच्या वेळेसच ठाणेकर हॉटेल, रेस्टॉरंट किंवा इतर खाद्यपदार्थांच्या दुकानांत खाण्यासाठी बाहेर पडू शकतात आणि सायंकाळी सातनंतरच कोरोनाचा प्रसार होतो का, असा सवाल त्यांनी केला आहे.हॉटेल, रेस्टॉरंट, बारसाठी प्रत्येक महापालिकेचे नियम वेगळे आहेत. या नियमांमध्ये सुसूत्रता नाही. वेळेची मर्यादा घालून व्यावसायिकांची अडवणूक करण्याचा पालिकेचा बेत आहे की काय, असे वाटत आहे. लोकांच्या गरजेचा विचार केला जात नाही.- मकरंद जोशीहॉटेल किंवा अन्य खाद्यपदार्थांची दुकाने नुसती सुरू करू देण्यात काही अर्थ नाही. खाद्यप्रेमी हे संध्याकाळीच स्नॅक्स कॉर्नर किंवा हॉटेलात जातात. यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत आस्थापना उघडी ठेवण्याची गरज आहे.- अजय नाईकतब्बल सहा महिन्यांनंतर हॉटेल्स सुरू झाले आहेत. पण हॉटेल्स, रेस्टॉरंट्स चालू ठेवण्याच्या वेळेत मर्यादा आहेत. ज्यांना कामाच्या गडबडीत त्या वेळेत जाणे शक्य होत नसेल त्यांनी काय करावे? वेळेच्या बाबतीत विचार जरूर व्हायला हवा.- अस्मिता येंडे