शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

अनेक खातेधारकांमुळे भरपाई देण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:26 IST

अवकाळी पावसाचा फटका : ३२० पैकी २५ शेतकऱ्यांना मिळणार रक्कम, निधी परत जाण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : अवकाळी पावसामुळे शेती, भाजीपाल्याचे नुकसान झाल्याप्रकरणी महसूल विभागाने मीरा-भार्इंदरमधील ३२० शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यासाठीच्या भरपाईची साडेसात लाखांची रक्कमही मंजूर झाली. परंतु, सातबारा नोंदीत कुटुंबातील अनेकांची नावे असून त्यांची आपसात सहमती होत नसल्याने केवळ २५ एकेरी खातेधारक शेतकºयांनाच भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे. तर, २९५ जणांना वंचित राहावे लागणार असून सरकारचा निधी परत जाण्याची शक्यता आहे.अवकाळी पावसामुळे मीरा-भार्इंदरमधील उत्तन, डोंगरी, तारोडी, पाली, राई, मुर्धा, मोर्वा, चेणे, काजूपाडा आदी भागांतील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. कापणी करून ठेवलेले तर काहींचे हाताशी आलेले उभे भातपीक कुजून गेले. लागवड केलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. आधीच शेती, भाजीपाला लागवडीसाठी होणाºया खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातही बहुतांश शेतकरी हे आपली पिढीजात शेती टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. घरच्यापुरते तरी धान्य मिळावे, या आशेने शेती करणारेही अनेक आहेत. काही जणांची शेती मालकीची नसली, तरी अनेक वर्षांपासून कसत आहेत.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सरकारकडून भरपाई मिळावी, अशी आशा शेतकºयांना वाटू लागली. त्या अनुषंगाने महसूल विभागाने पंचनामे सुरू केल्यानंतर त्यावेळीही सातबारा नोंदी असलेल्या अनेकांच्या नावांचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, तलाठ्यांनी शेती कसणाºयाचे जबाब तसेच पंच यांची नोंद घेऊन पंचनामे तयार केले. त्यामुळे निदान ३२० शेती नुकसानीचे पंचनामे झाले.या पंचनाम्यानुसार आता किमान एक हजार ते कमाल आठ हजारनुसार सात लाख ४५ हजार रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम शेतकºयांना देण्यासाठी मंजूर झाली आहे. त्याचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. अपर तहसीलदार कार्यालयाने पंचनामे व झालेल्या मंजुरीनुसार एकेरी खातेधारक असलेल्या २५ प्रकरणांत ४८ हजारांची नुकसानभरपाई थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, २९५ नुकसानभरपाई प्रकरणांत निधी मंजूर झाला असला, तरी सातबारा नोंदी एकापेक्षा जास्त खातेदार असल्याने आता ही रक्कम कुणाच्या खात्यात जमा करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानभरपाई मिळवायची असल्यास अन्य खातेधारकांचे सहमतीपत्र घ्यावे लागणार आहे.सहमतीपत्रासाठी करावी लागणार कसरतबहुतांश शेतकºयांना शेतीच्या क्षेत्राच्या अनुषंगाने नुकसानभरपाईची मिळणारी रक्कम ही एक ते चार हजारांच्या घरात असेल. पण, कसणाºयास अन्य खातेधारकांची सहमतीपत्रे आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवाय, कौटुंबिक बेबनाव, वादाचे प्रकार असल्याने अशी सहमतीपत्रे मिळणे बहुतेकांना अवघड जाणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी आलेलीमदतीची सुमारे सात लाखांची रक्कम परत जाण्याची शक्यता आहे.