शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

अनेक खातेधारकांमुळे भरपाई देण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:26 IST

अवकाळी पावसाचा फटका : ३२० पैकी २५ शेतकऱ्यांना मिळणार रक्कम, निधी परत जाण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : अवकाळी पावसामुळे शेती, भाजीपाल्याचे नुकसान झाल्याप्रकरणी महसूल विभागाने मीरा-भार्इंदरमधील ३२० शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यासाठीच्या भरपाईची साडेसात लाखांची रक्कमही मंजूर झाली. परंतु, सातबारा नोंदीत कुटुंबातील अनेकांची नावे असून त्यांची आपसात सहमती होत नसल्याने केवळ २५ एकेरी खातेधारक शेतकºयांनाच भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे. तर, २९५ जणांना वंचित राहावे लागणार असून सरकारचा निधी परत जाण्याची शक्यता आहे.अवकाळी पावसामुळे मीरा-भार्इंदरमधील उत्तन, डोंगरी, तारोडी, पाली, राई, मुर्धा, मोर्वा, चेणे, काजूपाडा आदी भागांतील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. कापणी करून ठेवलेले तर काहींचे हाताशी आलेले उभे भातपीक कुजून गेले. लागवड केलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. आधीच शेती, भाजीपाला लागवडीसाठी होणाºया खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातही बहुतांश शेतकरी हे आपली पिढीजात शेती टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. घरच्यापुरते तरी धान्य मिळावे, या आशेने शेती करणारेही अनेक आहेत. काही जणांची शेती मालकीची नसली, तरी अनेक वर्षांपासून कसत आहेत.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सरकारकडून भरपाई मिळावी, अशी आशा शेतकºयांना वाटू लागली. त्या अनुषंगाने महसूल विभागाने पंचनामे सुरू केल्यानंतर त्यावेळीही सातबारा नोंदी असलेल्या अनेकांच्या नावांचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, तलाठ्यांनी शेती कसणाºयाचे जबाब तसेच पंच यांची नोंद घेऊन पंचनामे तयार केले. त्यामुळे निदान ३२० शेती नुकसानीचे पंचनामे झाले.या पंचनाम्यानुसार आता किमान एक हजार ते कमाल आठ हजारनुसार सात लाख ४५ हजार रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम शेतकºयांना देण्यासाठी मंजूर झाली आहे. त्याचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. अपर तहसीलदार कार्यालयाने पंचनामे व झालेल्या मंजुरीनुसार एकेरी खातेधारक असलेल्या २५ प्रकरणांत ४८ हजारांची नुकसानभरपाई थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, २९५ नुकसानभरपाई प्रकरणांत निधी मंजूर झाला असला, तरी सातबारा नोंदी एकापेक्षा जास्त खातेदार असल्याने आता ही रक्कम कुणाच्या खात्यात जमा करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानभरपाई मिळवायची असल्यास अन्य खातेधारकांचे सहमतीपत्र घ्यावे लागणार आहे.सहमतीपत्रासाठी करावी लागणार कसरतबहुतांश शेतकºयांना शेतीच्या क्षेत्राच्या अनुषंगाने नुकसानभरपाईची मिळणारी रक्कम ही एक ते चार हजारांच्या घरात असेल. पण, कसणाºयास अन्य खातेधारकांची सहमतीपत्रे आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवाय, कौटुंबिक बेबनाव, वादाचे प्रकार असल्याने अशी सहमतीपत्रे मिळणे बहुतेकांना अवघड जाणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी आलेलीमदतीची सुमारे सात लाखांची रक्कम परत जाण्याची शक्यता आहे.