शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलचोरीचा डाव सुरक्षारक्षकांमुळे फसला, चोरांकडून दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 01:01 IST

ठाकुर्लीनजीक केडीएमटीच्या खंबाळपाडा आगारात उभ्या केल्या जात असलेल्या कचरागाड्यांमधील डिझेलचोरीचा प्रयत्न तेथील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे रविवारी रात्री फसला.

कल्याण : ठाकुर्लीनजीक केडीएमटीच्या खंबाळपाडा आगारात उभ्या केल्या जात असलेल्या कचरागाड्यांमधील डिझेलचोरीचा प्रयत्न तेथील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे रविवारी रात्री फसला. या सुरक्षारक्षकांवर चोरट्यांनी दगडफेक केली. कोणालाही दुखापत झाली नसली, तरी दगडफेकीत एका घंटागाडीची काच फुटली.खंबाळपाडा परिसरात केडीएमटीच्या आगारासाठी आरक्षित जागा आहे. तेथे केडीएमटीच्या बस उभ्या करण्याचे आणि डिझेलपंप उभारण्याचे प्रस्तावित आहे. ती जागा सध्या कच-याच्या गाड्यांनी बळकावली आहे. हे आगार असुरक्षित आहे. रविवारी रात्री तेथील कचºयाच्या गाडीतून डिझेल चोरण्याचा प्रयत्न झाला. पण सुरक्षारक्षकांनी तो हाणून पाडला. केडीएमसीने तेथे महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे सहा सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यातील संतोष शिंदे आणि सचिन शेलार हे दोघेच रात्रपाळीला होते. रात्री १० च्या सुमारास यातील शिंदे गस्त घालत असताना त्यांना चार ते पाच जणांच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे दिसले. त्यांनी ते शेलार यांना सांगितले आणि दोघांनी त्यांना हटकले तेव्हा ते पळाले, पण पळताना त्यांनी दगडफेक केली. यात त्यांना दुखापत झाली नाही. परंतु, घंटागाडीची काच फुटून नुकसान झाले. आगारात शिरलेल्या चोरट्यांकडून कचºयाच्या गाडीतील डिझेल चोरले जात होते. तेथे दोन डिझेलने भरलेले मोठे कॅन आणि डिझेल काढण्यासाठी वापरलेला पाइप सापडला. या घटनेची माहिती पालिकेचे वरिष्ठ सुरक्षारक्षक सुरेश पवार यांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन टिळकनगर पोलिसांना बोलावले. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.सुरक्षा राखायची तरी कशी?असुविधा असलेल्या खंबाळपाडा आगारात सुरक्षा राखायची तरी कशी, असा सवाल येथील सुरक्षा कर्मचाºयांकडून उपस्थित होत आहे. अपुºया लाइटची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची बोंब आणि स्वच्छतागृहाचा अभाव यात सुरक्षारक्षकांची पुरती दमछाक होताना दिसते.आगाराच्या पाठीमागील भागात वसाहत वसली असून त्या वसाहतीसाठी वाटही या खंबाळपाडा आगारातूनच असल्याने सुरक्षा राखणे जिकिरीचे होऊन बसल्याचे येथील कर्मचाºयांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी या आगारातील गाड्यांमधील बॅटºया चोरीला गेल्या होत्या. परंतु, सुरक्षारक्षकांकडून याची भरपाई घेताना त्यांना प्रशासनाने निलंबित केले होते.एकीकडे सुविधा पुरवल्या नसताना अशाप्रकारची केलेली कारवाई कर्मचाºयांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. विशेष म्हणजे एखादी घटना घडल्यानंतरच जाग येते, या उक्तीनुसार रविवारची घटना घडताच तेथे तत्काळ तात्पुरत्या स्वरूपात विजेची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले.