शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

डिझेलचोरीचा डाव सुरक्षारक्षकांमुळे फसला, चोरांकडून दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 01:01 IST

ठाकुर्लीनजीक केडीएमटीच्या खंबाळपाडा आगारात उभ्या केल्या जात असलेल्या कचरागाड्यांमधील डिझेलचोरीचा प्रयत्न तेथील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे रविवारी रात्री फसला.

कल्याण : ठाकुर्लीनजीक केडीएमटीच्या खंबाळपाडा आगारात उभ्या केल्या जात असलेल्या कचरागाड्यांमधील डिझेलचोरीचा प्रयत्न तेथील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे रविवारी रात्री फसला. या सुरक्षारक्षकांवर चोरट्यांनी दगडफेक केली. कोणालाही दुखापत झाली नसली, तरी दगडफेकीत एका घंटागाडीची काच फुटली.खंबाळपाडा परिसरात केडीएमटीच्या आगारासाठी आरक्षित जागा आहे. तेथे केडीएमटीच्या बस उभ्या करण्याचे आणि डिझेलपंप उभारण्याचे प्रस्तावित आहे. ती जागा सध्या कच-याच्या गाड्यांनी बळकावली आहे. हे आगार असुरक्षित आहे. रविवारी रात्री तेथील कचºयाच्या गाडीतून डिझेल चोरण्याचा प्रयत्न झाला. पण सुरक्षारक्षकांनी तो हाणून पाडला. केडीएमसीने तेथे महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे सहा सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यातील संतोष शिंदे आणि सचिन शेलार हे दोघेच रात्रपाळीला होते. रात्री १० च्या सुमारास यातील शिंदे गस्त घालत असताना त्यांना चार ते पाच जणांच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे दिसले. त्यांनी ते शेलार यांना सांगितले आणि दोघांनी त्यांना हटकले तेव्हा ते पळाले, पण पळताना त्यांनी दगडफेक केली. यात त्यांना दुखापत झाली नाही. परंतु, घंटागाडीची काच फुटून नुकसान झाले. आगारात शिरलेल्या चोरट्यांकडून कचºयाच्या गाडीतील डिझेल चोरले जात होते. तेथे दोन डिझेलने भरलेले मोठे कॅन आणि डिझेल काढण्यासाठी वापरलेला पाइप सापडला. या घटनेची माहिती पालिकेचे वरिष्ठ सुरक्षारक्षक सुरेश पवार यांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन टिळकनगर पोलिसांना बोलावले. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.सुरक्षा राखायची तरी कशी?असुविधा असलेल्या खंबाळपाडा आगारात सुरक्षा राखायची तरी कशी, असा सवाल येथील सुरक्षा कर्मचाºयांकडून उपस्थित होत आहे. अपुºया लाइटची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची बोंब आणि स्वच्छतागृहाचा अभाव यात सुरक्षारक्षकांची पुरती दमछाक होताना दिसते.आगाराच्या पाठीमागील भागात वसाहत वसली असून त्या वसाहतीसाठी वाटही या खंबाळपाडा आगारातूनच असल्याने सुरक्षा राखणे जिकिरीचे होऊन बसल्याचे येथील कर्मचाºयांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी या आगारातील गाड्यांमधील बॅटºया चोरीला गेल्या होत्या. परंतु, सुरक्षारक्षकांकडून याची भरपाई घेताना त्यांना प्रशासनाने निलंबित केले होते.एकीकडे सुविधा पुरवल्या नसताना अशाप्रकारची केलेली कारवाई कर्मचाºयांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. विशेष म्हणजे एखादी घटना घडल्यानंतरच जाग येते, या उक्तीनुसार रविवारची घटना घडताच तेथे तत्काळ तात्पुरत्या स्वरूपात विजेची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले.