शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

‘त्या’ रस्ता रुंदीकरणातून केडीएमसीने साधले काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:40 IST

केडीएमसीने कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाºया पश्चिमेतील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडी यात नागरिकांना चालणेही जिकिरीचे होऊन बसल्याने

प्रशांत माने । कल्याण : केडीएमसीने कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाºया पश्चिमेतील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडी यात नागरिकांना चालणेही जिकिरीचे होऊन बसल्याने हा रुंदीकरणाचा घाट घातला आणि तो यशस्वीही झाला. परंतु, या रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. तसेच रस्त्यातील दुभाजकामुळे रस्ता पुन्हा अरुंद झाल्याने रुंदीकरणाने काय साधले, असा सवाल उपस्थित होत आहे.रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत केडीएमसी प्रशासनाने पहिल्या टप्प्यात १६ रस्त्यांची कामे हाती घेतली होती. यात आतापर्यंत केवळ कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मार्गी लागले. मात्र, त्याचा फटका व्यापाºयांना बसला खरा, पण पुनर्वसन आणि दुरुस्तीच्या नावाखाली त्यांनी वाढीव बांधकामे केली आहेत. विशेष म्हणजे, ज्या इमारतींचा वापर निवासाकरिता होत होता, तो रस्ता रुंदीकरणानंतर व्यावसायिक कामांसाठी होऊ लागला आहे. महापालिकेच्या कृपाशीर्वादामुळे या रुंदीकरणात व्यापाºयांचे चांगभलं झाल्याचेही पाहावयास मिळाले. रस्ता रुंद करताना येथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण होणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती. परंतु, रुंदीकरणानंतरची परिस्थिती पाहता फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. त्यात या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक टाकण्यात आले आहेत. दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांचे बस्तान आणि मधोमध असलेल्या दुभाजकाने रस्त्याची बहुतांश बाजू व्यापल्याने या रस्तारुंदीकरणाचे फलित शून्य असल्याचे पाहावयास मिळत आहे.डोंबिवलीतील केळकर रोड आणि दीनदयाळ पथचेही रुंदीकरण महापालिकेकडून केले जाणार होते. परंतु, यासंदर्भात रहिवासी आणि व्यापाºयांना बजावलेल्या नोटिसाच चुकीच्या असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने मांडला आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू होण्यास तूर्तास विलंब लागणार आहे.दरम्यान, कल्याणमधील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या रुंदीकरण झालेल्या मार्गावरची अतिक्रमणाची स्थिती पाहता अन्य रस्त्यांच्या रुंदीकरणानंतरही तेथे अतिक्रमणाचे चित्र कायम राहण्याची दाट शक्यता आहे.