शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

उल्हासनगर इमारत दुर्घटनेत धनवानी कुटुंब उद्ध्वस्त, मुलीच्या लग्नाची तयारी होती सुरू तितक्यात...

By सदानंद नाईक | Updated: September 22, 2022 19:10 IST

उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून १५ दिवसाच्या अंतरात ३ इमारतीचे स्लॅब कोसळून एकून ६ जणांचा बळी गेला.

उल्हासनगर - शहरातील मानस इमारतीचा स्लॅब कोसळून अख्या धनवानी कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलगी प्रिया हिचा साखरपुडा होऊन, लग्नाची धामधूम घरात जोरात सुरू होती. तर तळमजल्यावरील पिठाची गिरणी चालविणारे अशोक घटनेच्या पाच मिनिटापूर्वी गोशाळेत गेल्याने ते वाचले. मात्र मुलगा सागर ओचानी यांचा मृत्यू झाला. 

उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून १५ दिवसाच्या अंतरात ३ इमारतीचे स्लॅब कोसळून एकून ६ जणांचा बळी गेला. याप्रकारने धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून शासनाने धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणी बाबत परिपत्रक काढावे. अशी मागणी होत आहे. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले होते. कॅम्प नं-५ वसंतबहार परिसरात मानस नावाची ५ मजली धोकादायक इमारत असून अनेक प्लॉटधारक इमारत सोडून गेले आहेत. दुपारी चौथ्या मजल्याच्या स्लॅब थेट तळमजल्यावर पडला. चौथा, तिसरा व दुसरा खाली होता. तर पहिल्या मजल्यावर ढोलमदास धनवानी हे पत्नी रेणू व मुलगी प्रिया सोबत राहतात. ढोलमदास पती-पत्नी हे दोघेही गुंगे-बहिरे असून २५ वर्षीय मुलगी प्रिया हिचा गेल्या महिन्यात साखरपुडा झाला होता. घरात लग्नाचे वातावरण असताना कुटुंबावर घाला येऊन, तिघा जणांचा मृत्यू झाला. याप्रकारने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

इमारतीच्या तळमजल्यावर ओचानी यांची पीठ गिरणी व अन्नधान्याचा साठा विक्रीस ठेवला होता. अशोक ओचानी हे दुपारी २ वाजता शेजारील गोशाळेत गेले. तर २२ वर्षीय सागर नावाचा मुलगा पीठ गिरणीत थांबला होता. त्याच वेळी इमारतीचा स्लॅब कोसळून सागर याचा मृत्यू झाला. तर सुदैवाने गोशाळेत गेल्याने अशोक ओचानी यांचा जीव वाचला. मात्र मुलाचा मृत्यू झाल्याने, ओचानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. इमारतीला खाली करण्याची नोटीस प्रभाग समितीने दिली होती. मात्र त्याच वेळी इमारत खाली केली असतीतर चौघांचे जीव वाचले असते. असे स्थानिक नागरिक बोलत आहेत. 

धोकादायक इमारती बाबत बैठक

 महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव यांच्यासह नगररचनाकार, प्रभाग अधिकारी, अभियंते, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग आदींची बैठक घेतली. इमारत स्ट्रक्चर ऑडिट बाबत चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याचे संकेत आयुक्तांनी दिले. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर