शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

महापालिका हद्दीत हजारो कोटीची विकास कामे; उल्हासनगर महापालिकेची मदार ६ अभियंतावर

By सदानंद नाईक | Updated: January 30, 2024 17:17 IST

हजारो कोटीच्या विकास कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेच्या ६ अभियंतावर येऊन पडली आहे.

सदानंद नाईक, उल्हासनगर : हजारो कोटीच्या विकास कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेच्या ६ अभियंतावर येऊन पडली आहे. त्यांच्या दिमतीला सेवानिवृत्त व कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती महापालिकेने केली असून सुरू असलेल्या विकास कामावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.

 उल्हासनगर महापालिका हद्दीत ४२६ कोटींची भुयारी गटार योजना, १५० कोटीची एमएमआरडीएची रस्ते योजना, १२३ कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना, ४३ कोटीच्या निधीतून मूलभूत सुखसुविधा योजना आदी १ हजार कोटीची कामे कार्यान्वित झाली आहेत. मात्र या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडे फक्त एकून ६ अभियंता पदे असून प्रत्येकावर ३ ते ४ पदाचा पदभार देण्यात आला. त्यांच्या मदतीला ७ सेवानिवृत्त अभियंत्यांची तात्पुरत्या स्वरूपात तर १८ कंत्राटी नवखे अभियंते नियुक्त केले आहेत. शहरातील विकास कामाची सर्व जबाबदारी या ६ अभियंतावर येऊन पडली असून त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फ़ैरी झडत असल्याने तेही वादात सापडले आहेत. 

शहरातील हजारो कोटीच्या विकास कामावर नियंत्रण ठेवण्यात महापालिकेचे हे ६ अभियंता कमी पडत असून विकासकामे निकृष्ट होत असल्याचा आरोप होत आहेत. महापालिका बैठका, मंत्रालय, जिल्हाधिकारीसह अन्य ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमतच या अभियंताचा वेळ जात असून विकास कामावर कोण नियंत्रण ठेवणार? असा प्रश्न पडला आहे. यापूर्वी ४०० कोटीच्या निधीतून राबविलेली पाणी पुरवठा वितरण योजनेचा असाच बोजवारा उडल्याची टीका होत आहे. ४२६ कोटीच्या निधीतील भुयारी गटार योजने अंतर्गत कोणतेही रस्ते खोदण्यात येत असून टाकण्यात येत असलेल्या गटार पाईपवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. पूर्वीपेक्षा लहान आकाराचे पाईप टाकण्यात येत असल्याचा आरोप होत असून योजनेची ब्ल्यूप्रिंट महापालिकेकडे नसल्याचे बोलले जात आहे. तसेच नव्याने बांधण्यात येत असलेले रस्ते शहरविकास आराखड्यानुसार नसल्याने, त्याबाबतही नागरिकांकडून आरोप होत आहे. 

अशोक नाईकवाडे (उपायुक्त- महापालिका) -  महापालिकेकडे सद्यस्थिती एकून ६ अभियंता पदे असून तात्पुरत्या स्वरूपात ७ सेवानिवृत्त अभियंता व १८ अभियंता कंत्राटी पद्धतीने घेतले आहेत. अभियंता पदाची लवकरच भरती होणार असून जाहिरात प्रक्रिया सुरू आहे. 

संदीप जाधव (शहर अभियंता-महापालिका) -  महापालिका हद्दीत १ हजार कोटीच्या निधीतून विविध विकास कामे सुरू आहेत. तसेच प्रस्तावित कामेही शासन दरबारी आहेत. अभियंता पदे कमी असल्याने, दबाव वाढला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका