शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

महापालिका हद्दीत हजारो कोटीची विकास कामे; उल्हासनगर महापालिकेची मदार ६ अभियंतावर

By सदानंद नाईक | Updated: January 30, 2024 17:17 IST

हजारो कोटीच्या विकास कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेच्या ६ अभियंतावर येऊन पडली आहे.

सदानंद नाईक, उल्हासनगर : हजारो कोटीच्या विकास कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेच्या ६ अभियंतावर येऊन पडली आहे. त्यांच्या दिमतीला सेवानिवृत्त व कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती महापालिकेने केली असून सुरू असलेल्या विकास कामावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.

 उल्हासनगर महापालिका हद्दीत ४२६ कोटींची भुयारी गटार योजना, १५० कोटीची एमएमआरडीएची रस्ते योजना, १२३ कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना, ४३ कोटीच्या निधीतून मूलभूत सुखसुविधा योजना आदी १ हजार कोटीची कामे कार्यान्वित झाली आहेत. मात्र या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडे फक्त एकून ६ अभियंता पदे असून प्रत्येकावर ३ ते ४ पदाचा पदभार देण्यात आला. त्यांच्या मदतीला ७ सेवानिवृत्त अभियंत्यांची तात्पुरत्या स्वरूपात तर १८ कंत्राटी नवखे अभियंते नियुक्त केले आहेत. शहरातील विकास कामाची सर्व जबाबदारी या ६ अभियंतावर येऊन पडली असून त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फ़ैरी झडत असल्याने तेही वादात सापडले आहेत. 

शहरातील हजारो कोटीच्या विकास कामावर नियंत्रण ठेवण्यात महापालिकेचे हे ६ अभियंता कमी पडत असून विकासकामे निकृष्ट होत असल्याचा आरोप होत आहेत. महापालिका बैठका, मंत्रालय, जिल्हाधिकारीसह अन्य ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमतच या अभियंताचा वेळ जात असून विकास कामावर कोण नियंत्रण ठेवणार? असा प्रश्न पडला आहे. यापूर्वी ४०० कोटीच्या निधीतून राबविलेली पाणी पुरवठा वितरण योजनेचा असाच बोजवारा उडल्याची टीका होत आहे. ४२६ कोटीच्या निधीतील भुयारी गटार योजने अंतर्गत कोणतेही रस्ते खोदण्यात येत असून टाकण्यात येत असलेल्या गटार पाईपवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. पूर्वीपेक्षा लहान आकाराचे पाईप टाकण्यात येत असल्याचा आरोप होत असून योजनेची ब्ल्यूप्रिंट महापालिकेकडे नसल्याचे बोलले जात आहे. तसेच नव्याने बांधण्यात येत असलेले रस्ते शहरविकास आराखड्यानुसार नसल्याने, त्याबाबतही नागरिकांकडून आरोप होत आहे. 

अशोक नाईकवाडे (उपायुक्त- महापालिका) -  महापालिकेकडे सद्यस्थिती एकून ६ अभियंता पदे असून तात्पुरत्या स्वरूपात ७ सेवानिवृत्त अभियंता व १८ अभियंता कंत्राटी पद्धतीने घेतले आहेत. अभियंता पदाची लवकरच भरती होणार असून जाहिरात प्रक्रिया सुरू आहे. 

संदीप जाधव (शहर अभियंता-महापालिका) -  महापालिका हद्दीत १ हजार कोटीच्या निधीतून विविध विकास कामे सुरू आहेत. तसेच प्रस्तावित कामेही शासन दरबारी आहेत. अभियंता पदे कमी असल्याने, दबाव वाढला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका