शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

‘विकास आराखड्याची अंमलबजावणी व्हावी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:33 IST

मुंबई महापालिकेचा विकास आराखडा नुकताच मंजूर झाला आहे. परंतु, दुसरीकडे ठाणे महापालिकेचा विकास आराखडा मागील २५ वर्षांत ११ टक्केच राबवण्यात आला आहे.

ठाणे : मुंबई महापालिकेचा विकास आराखडा नुकताच मंजूर झाला आहे. परंतु, दुसरीकडे ठाणे महापालिकेचा विकास आराखडा मागील २५ वर्षांत ११ टक्केच राबवण्यात आला आहे. यामुळे शहराचा नियोजनबद्ध विकास झाला नसून वाहतूककोंडीची समस्या पावलोपावली जाणवते.ठाणे रेल्वे स्थानकातून रोज सहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. शहरातील विविध भागांतून ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणारे रस्ते आजही अरुंद आहेत. त्यामुळे आता हा विकास आराखडा कधी पूर्णपणे राबवला जाणार, असा सवाल केला जाऊ लागला आहे. ठाणे महापालिकेचा विकास आराखडा १९९९ साली मंजूर झाला. तर, त्याचा काही भाग २००१ साली मंजूर करण्यात आला. आजघडीला शहरातून जाणारा मुंबई नाशिक आणि घोडबंदर भागातून जाणारा मुंबई-अहमदाबाद अशा दोन्ही महामार्गांवरील जंक्शनवर प्रचंड वाहतूककोंडी होऊ लागली आहे. या मार्गांवर उड्डाणपूल उभारले असले तरी वाहतूककोंडी काही कमी झालेली नाही.ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणाºया रस्त्यांवर वाहनांचा भार वाढला असून त्या तुलनेत रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे ऐन सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत ठाणेकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरातील रस्त्यांची लांबी एकूण ३५६.४० किमी इतकी आहे. त्यापैकी १०८ किमीचे रस्ते काँक्रिट आणि यूटीडब्ल्यूटी पद्धतीने तयार केले आहेत. तर, उर्वरित २४८.४० किमीचे रस्ते डांबरी आहेत. डांबरी रस्ते सातत्याने उखडत असल्याने त्यावर सतत डांबराचा लेप चढवला जातो.या कामांच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. परंतु, वारंवार रस्ते उखडत असल्याने केलेला खर्च जातो कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो. यंदाही हीच समस्या जाणवत आहे.