शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईदर शहराचा सुधारीत विकास आराखडा प्रसिध्द व्हायच्या आधीच फुटला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 19:59 IST

मीरा भार्इंदर शहराचा सुधारीत प्रारुप विकास आराखडा अद्याप जाहिर झाला नसतानाच मुर्धा - राई परिसरातील प्रारुप नकाशाचे कथीत पान व्हायरल झालं असुन त्याची तक्रार केली गेली आहे.

मीरारोड - मीरा भार्इंदर शहराचा सुधारीत प्रारुप विकास आराखडा अद्याप जाहिर झाला नसतानाच मुर्धा - राई परिसरातील प्रारुप नकाशाचे कथीत पान व्हायरल झालं असुन त्याची तक्रार केली गेली आहे. अन्य पानं देखील फिरत असुन ज्यांच्या जमीनीं वर आरक्षण टाकलं आहे त्यांना त्यांची जमीन कवडीमोल झाल्याचं सांगत निम्म्या किमतीत विकण्यासाठी दबाव आणला जात आहे. तर काहींना त्यांच्या जमीनी सुरक्षित ठेवण्यासाठी अर्थपुर्ण दबावतंत्राचा वापर चालवला जात असल्याने प्रारुप आराखड्याच्या आड अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार चालल्याचा संशय व्यक्त होत करुन थेट मुख्यमंत्र्यां पर्यंत तक्रार करण्यात आली आहे.तत्कालिन मीरा भार्इंदर नगरपालिका असताना शहराचा पहिला विकास आराखडा १४ मे १९९७ साली मंजुर करण्यात आला होता. आराखड्याची २० वर्षांची मुदत असते. त्यामुळे सुधारीत प्रारुप आराखडयाचा इरादा आॅक्टोबर २०१५ च्या महासभेत मंजुर करण्यात आला होता. त्या नंतर नगररचना अधिकारी म्हणुन मार्च २०१६ मध्ये दिलीप घेवारे यांची नेमणुक करण्यात आली होती. सद्याचा तयार केलेला प्रारुप आराखडा अजुन गुलदस्त्यातच असुन तो जाहिर केलेला नाही.सदर प्रारुप आराखडा प्रसिध्द व्हायच्या आधी पासुनच वादग्रस्त ठरला आहे. त्यावर कोणा राजकिय नेत्याचा प्रभाव असल्याची चर्चा देखील होत आहे.तसे असतानाच मुर्धा व राई गाव तसेच त्या मागील परिसराच्या कथीत आराखड्याच्या पानाचा भाग सद्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. ज्यांच्या जमीनी आरक्षणा खाली टाकण्यात आल्या आहेत त्यांच्यात भितीचे वातावरण आहे.आरक्षणं टाकण्यात आल्याने जमीनींना कवडीमोलाचा भाव आलाय. तर आर झोन टाकण्यात आला त्यांच्या जमीनींना सोन्याचे भाव आले आहेत. महत्वाचे म्हणजे खारभूमी विभागाचा असलेला बांध हा चक्क रस्ता म्हणुन परिवर्तीत करण्यात आलाय. तर येथील कांदळवन, पाणथळ देखील गिळंकृत करण्यात आलं आहे. नकाशा पाहता मधल्या भागात उद्यानं आदी न ठेवता तेथील जमीनी बांधकामांसाठी मोकळ्या केल्या आहेत. तर मोठ्या प्रमाणात असलेलं हरीत वा नाविकास क्षेत्र देखील काढुन टाकण्यात आल्याचं दिसुन येत आहे.या भागात बड्या बिल्डर व काही लोकप्रतिनिधी कम बिल्डरांनी जमीनी खरेदी आधी पासुनच सुरु केली होती. त्यातुनच नकाशा पाहता बक्कळ फायद्यासाठी जमीनी मोकळ्या करण्याचा घाट प्रारुप विकास आराखड्या मार्फत घातला जात असल्याच्या आरोपां मध्ये बळक टी आली आहे.तर जमीन आरक्षणा खाली आल्याने ती कवडीमोल झाल्याचं सांगण्यात आलं. आरक्षण काढुन देतो पण त्यासाठी खर्च करावा लागेल असं सांगण्यात येतं जमीन मालकाने पैसे खर्च करण्यास असमर्थता व्यक्त केली तर कमी भावात जमीन विकुन मोकळे व्हा सांगण्यासह गिरहाईक देखील लावलं जात आहे. तर जमीन निम्म्या दरात कशी विकायची अशा कात्रीत तो जमीन मालक सापडला आहे.तुमची जमीन आहे, आरक्षण टाकतो असे निरोप देखील काही जमीन मालकांना देऊन अर्थपुर्ण दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे. तर काही विरोधकांच्या जमीनींवर आरक्षणं ठरवुन टाकण्यात आली आहेत. त्यातही एका वजनदार लोकप्रतिनिधी कडुन तसे निरोप दिले जात असल्याची चर्चा आहे.हेमंत पवार ( नागरीक ) - माझ्या बहिणीची फक्त ८ गुंठे जमीन असुन त्यावर आरक्षण टाकल्याचे सांगण्यात आले. तसा नकाशाच दाखवला. आरक्षण काढण्यासाठी ५ -६ लाख खर्च करावे लागतील असे म्हणाले. पण आपण तेवढ पैसे खर्च करण्यास असमर्थता व्यक्त केल्याने जमीन विक्रीसाठी गिरहाईक देखील लावले आहे. नाईजास्तव जमीन विकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.रोहित सुवर्णा ( माजी नगरसेवक ) - सुधारीत विकास आराखडा प्रसिध्द व्हायच्या आधीच नकाशा फुटला ही गंभीर बाब असुन या प्रकरणी आपण थेट मुख्यमंत्र्यां पर्यंत तक्रार केली आहे. कोणाच्या जमीनी मोकळ्या ठेवायच्या तर कोणाच्या आरक्षणा खाली टाकायच्या हे संगनमताने ठरवले जात आहे. हा अब्जावधी रुपयांचा आराखडा घोटाळा असल्याचा आरोप आहे. याची उच्च स्तरीय चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल केले पाहिजेत.श्रीकांत देशमुख ( सहाय्यक संचालक, नगररचना ) - प्रारुप विकास आराखडा हा गोपनीय असुन तो प्रसिध्द झालेला नाही. त्यामुळे सदर चे व्हायरल पान खरंच त्याचा भाग आहे का नाही ? हे सांगता येत नाही. आपण या बद्दल आयुक्तांशी बोलु.