शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

मीरा भाईदर शहराचा सुधारीत विकास आराखडा प्रसिध्द व्हायच्या आधीच फुटला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 19:59 IST

मीरा भार्इंदर शहराचा सुधारीत प्रारुप विकास आराखडा अद्याप जाहिर झाला नसतानाच मुर्धा - राई परिसरातील प्रारुप नकाशाचे कथीत पान व्हायरल झालं असुन त्याची तक्रार केली गेली आहे.

मीरारोड - मीरा भार्इंदर शहराचा सुधारीत प्रारुप विकास आराखडा अद्याप जाहिर झाला नसतानाच मुर्धा - राई परिसरातील प्रारुप नकाशाचे कथीत पान व्हायरल झालं असुन त्याची तक्रार केली गेली आहे. अन्य पानं देखील फिरत असुन ज्यांच्या जमीनीं वर आरक्षण टाकलं आहे त्यांना त्यांची जमीन कवडीमोल झाल्याचं सांगत निम्म्या किमतीत विकण्यासाठी दबाव आणला जात आहे. तर काहींना त्यांच्या जमीनी सुरक्षित ठेवण्यासाठी अर्थपुर्ण दबावतंत्राचा वापर चालवला जात असल्याने प्रारुप आराखड्याच्या आड अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार चालल्याचा संशय व्यक्त होत करुन थेट मुख्यमंत्र्यां पर्यंत तक्रार करण्यात आली आहे.तत्कालिन मीरा भार्इंदर नगरपालिका असताना शहराचा पहिला विकास आराखडा १४ मे १९९७ साली मंजुर करण्यात आला होता. आराखड्याची २० वर्षांची मुदत असते. त्यामुळे सुधारीत प्रारुप आराखडयाचा इरादा आॅक्टोबर २०१५ च्या महासभेत मंजुर करण्यात आला होता. त्या नंतर नगररचना अधिकारी म्हणुन मार्च २०१६ मध्ये दिलीप घेवारे यांची नेमणुक करण्यात आली होती. सद्याचा तयार केलेला प्रारुप आराखडा अजुन गुलदस्त्यातच असुन तो जाहिर केलेला नाही.सदर प्रारुप आराखडा प्रसिध्द व्हायच्या आधी पासुनच वादग्रस्त ठरला आहे. त्यावर कोणा राजकिय नेत्याचा प्रभाव असल्याची चर्चा देखील होत आहे.तसे असतानाच मुर्धा व राई गाव तसेच त्या मागील परिसराच्या कथीत आराखड्याच्या पानाचा भाग सद्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. ज्यांच्या जमीनी आरक्षणा खाली टाकण्यात आल्या आहेत त्यांच्यात भितीचे वातावरण आहे.आरक्षणं टाकण्यात आल्याने जमीनींना कवडीमोलाचा भाव आलाय. तर आर झोन टाकण्यात आला त्यांच्या जमीनींना सोन्याचे भाव आले आहेत. महत्वाचे म्हणजे खारभूमी विभागाचा असलेला बांध हा चक्क रस्ता म्हणुन परिवर्तीत करण्यात आलाय. तर येथील कांदळवन, पाणथळ देखील गिळंकृत करण्यात आलं आहे. नकाशा पाहता मधल्या भागात उद्यानं आदी न ठेवता तेथील जमीनी बांधकामांसाठी मोकळ्या केल्या आहेत. तर मोठ्या प्रमाणात असलेलं हरीत वा नाविकास क्षेत्र देखील काढुन टाकण्यात आल्याचं दिसुन येत आहे.या भागात बड्या बिल्डर व काही लोकप्रतिनिधी कम बिल्डरांनी जमीनी खरेदी आधी पासुनच सुरु केली होती. त्यातुनच नकाशा पाहता बक्कळ फायद्यासाठी जमीनी मोकळ्या करण्याचा घाट प्रारुप विकास आराखड्या मार्फत घातला जात असल्याच्या आरोपां मध्ये बळक टी आली आहे.तर जमीन आरक्षणा खाली आल्याने ती कवडीमोल झाल्याचं सांगण्यात आलं. आरक्षण काढुन देतो पण त्यासाठी खर्च करावा लागेल असं सांगण्यात येतं जमीन मालकाने पैसे खर्च करण्यास असमर्थता व्यक्त केली तर कमी भावात जमीन विकुन मोकळे व्हा सांगण्यासह गिरहाईक देखील लावलं जात आहे. तर जमीन निम्म्या दरात कशी विकायची अशा कात्रीत तो जमीन मालक सापडला आहे.तुमची जमीन आहे, आरक्षण टाकतो असे निरोप देखील काही जमीन मालकांना देऊन अर्थपुर्ण दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे. तर काही विरोधकांच्या जमीनींवर आरक्षणं ठरवुन टाकण्यात आली आहेत. त्यातही एका वजनदार लोकप्रतिनिधी कडुन तसे निरोप दिले जात असल्याची चर्चा आहे.हेमंत पवार ( नागरीक ) - माझ्या बहिणीची फक्त ८ गुंठे जमीन असुन त्यावर आरक्षण टाकल्याचे सांगण्यात आले. तसा नकाशाच दाखवला. आरक्षण काढण्यासाठी ५ -६ लाख खर्च करावे लागतील असे म्हणाले. पण आपण तेवढ पैसे खर्च करण्यास असमर्थता व्यक्त केल्याने जमीन विक्रीसाठी गिरहाईक देखील लावले आहे. नाईजास्तव जमीन विकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.रोहित सुवर्णा ( माजी नगरसेवक ) - सुधारीत विकास आराखडा प्रसिध्द व्हायच्या आधीच नकाशा फुटला ही गंभीर बाब असुन या प्रकरणी आपण थेट मुख्यमंत्र्यां पर्यंत तक्रार केली आहे. कोणाच्या जमीनी मोकळ्या ठेवायच्या तर कोणाच्या आरक्षणा खाली टाकायच्या हे संगनमताने ठरवले जात आहे. हा अब्जावधी रुपयांचा आराखडा घोटाळा असल्याचा आरोप आहे. याची उच्च स्तरीय चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल केले पाहिजेत.श्रीकांत देशमुख ( सहाय्यक संचालक, नगररचना ) - प्रारुप विकास आराखडा हा गोपनीय असुन तो प्रसिध्द झालेला नाही. त्यामुळे सदर चे व्हायरल पान खरंच त्याचा भाग आहे का नाही ? हे सांगता येत नाही. आपण या बद्दल आयुक्तांशी बोलु.