शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

चाळ परिसराचा खुंटणार विकास, आयुक्तांचे पत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:25 IST

गटारे आणि पायवाटांच्या कामांऐवजी रस्ते विकासाच्या कामाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे पत्रक केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी काढले आहे.

कल्याण : गटारे आणि पायवाटांच्या कामांऐवजी रस्ते विकासाच्या कामाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे पत्रक केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी काढले आहे. त्यामुळे चाळवजा वस्तीतील गटारे, पायवाटांची कामे करता येणार नसल्याने विकास खुंटणार आहे. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.२०१८-१९ या कालावधीत गटारे व पायवाटांच्या कामांचे प्रस्ताव न करता रस्त्यांचे प्रस्ताव तयार करावेत, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. आयुक्तांनी रस्त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे, ही चांगली बाब आहे. मात्र, शहरातील झोपडपट्टी व चाळवजा वस्तीत गटारे, पायवाटा तयार न केल्यास तेथील रहिवाशांवर अन्याय केल्यासारखे होईल, असा मुद्दा शिवसेना नगरसेवक सुधीर बासरे यांनी उपस्थित केला आहे.शिवसेना नगरसेवक मोहन उगले म्हणाले, ‘यूटीडब्ल्यूटी पद्धतीने रस्ता तयार करताना अनावश्यक बाबी करू नयेत, असे आयुक्तांनी अभियंत्यांना सूचित केले आहे. ज्या बाबींची आवश्यकता नाही, त्यांचा समावेश प्राकलनात करू नये, असे म्हटले आहे. जुन्या कल्याणमध्ये काही ठिकाणी रस्त्यांची डागडुजीच झालेली नाही. त्यामुळे रस्त्याचे सोलिंग न करता यूटीडब्ल्यूटीचे काम केले, तर ते टिकणार नाही. त्यामुळे नगरसेवकांची त्रिधा स्थिती झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता वर आणि गटारे खाली गेली आहेत. त्यात समतलपणा नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा कसा होणार?’ तर, शिवसेनेचे नगरसेवक दया शेट्टी म्हणाले, ‘मोहन प्रभागात बहुतांश झोपडपट्टी आहे. तेथे गटारे व पायवाटांची कामेच झालेली नाहीत. त्यात आयुक्तांनी असे पत्रक काढले आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात कामांवर अन्याय होणार आहे.’दुसरीकडे २०१७-१८ या आर्थिक वर्षातील नगरसेवक निधीचे प्रस्ताव शिल्लक आहेत, असे आयुक्तांनीच स्वत: कबूल केले आहे. त्यांच्या कबुलीमुळे मागच्या वर्षी कामे झालेली नाही. यावर्षीही ही कामे होणार नाहीत, हेच यातून उघड आहे. कामे प्रस्तावित करताना अभियंत्यांनी त्याची गरज किती आहे, याची प्रत्यक्षस्थळी पाहणी करावी. त्याचे फोटो काढावेत. काम झाल्यावरही फोटो काढावेत. काम प्रस्तावित करताना नगरसेवक निधीतून प्रस्तावित करण्यास प्राधान्य द्यावे. त्यानंतर, भांडवली खर्चातून कामे प्रस्तावित करण्यास द्वितीय प्राधान्य असावे. काम प्रस्तावित करताना जागा खाजगी की सरकारी आहे, याची शहानिशा करावी, असे म्हटले आहे.>कार्यभाराकडे दुर्लक्षमहापालिकेतील बऱ्याच कनिष्ठ व उपअभियंत्यांना उच्च पदाचा कार्यभार दिला आहे. त्यामुळे हे अधिकारी मूळ पदाऐवजी उच्च पदाचा कार्यभार सांभाळण्याकडे अधिक लक्ष देतात. त्यांनी मूळ पदाचे काम आधी पाहावे. त्यानंतर, उच्च पदाची जबाबदारी पार पाडावी, असे आयुक्तांनी सूचित केले आहे.