शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

चाळ परिसराचा खुंटणार विकास, आयुक्तांचे पत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:25 IST

गटारे आणि पायवाटांच्या कामांऐवजी रस्ते विकासाच्या कामाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे पत्रक केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी काढले आहे.

कल्याण : गटारे आणि पायवाटांच्या कामांऐवजी रस्ते विकासाच्या कामाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे पत्रक केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी काढले आहे. त्यामुळे चाळवजा वस्तीतील गटारे, पायवाटांची कामे करता येणार नसल्याने विकास खुंटणार आहे. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.२०१८-१९ या कालावधीत गटारे व पायवाटांच्या कामांचे प्रस्ताव न करता रस्त्यांचे प्रस्ताव तयार करावेत, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. आयुक्तांनी रस्त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे, ही चांगली बाब आहे. मात्र, शहरातील झोपडपट्टी व चाळवजा वस्तीत गटारे, पायवाटा तयार न केल्यास तेथील रहिवाशांवर अन्याय केल्यासारखे होईल, असा मुद्दा शिवसेना नगरसेवक सुधीर बासरे यांनी उपस्थित केला आहे.शिवसेना नगरसेवक मोहन उगले म्हणाले, ‘यूटीडब्ल्यूटी पद्धतीने रस्ता तयार करताना अनावश्यक बाबी करू नयेत, असे आयुक्तांनी अभियंत्यांना सूचित केले आहे. ज्या बाबींची आवश्यकता नाही, त्यांचा समावेश प्राकलनात करू नये, असे म्हटले आहे. जुन्या कल्याणमध्ये काही ठिकाणी रस्त्यांची डागडुजीच झालेली नाही. त्यामुळे रस्त्याचे सोलिंग न करता यूटीडब्ल्यूटीचे काम केले, तर ते टिकणार नाही. त्यामुळे नगरसेवकांची त्रिधा स्थिती झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता वर आणि गटारे खाली गेली आहेत. त्यात समतलपणा नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा कसा होणार?’ तर, शिवसेनेचे नगरसेवक दया शेट्टी म्हणाले, ‘मोहन प्रभागात बहुतांश झोपडपट्टी आहे. तेथे गटारे व पायवाटांची कामेच झालेली नाहीत. त्यात आयुक्तांनी असे पत्रक काढले आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात कामांवर अन्याय होणार आहे.’दुसरीकडे २०१७-१८ या आर्थिक वर्षातील नगरसेवक निधीचे प्रस्ताव शिल्लक आहेत, असे आयुक्तांनीच स्वत: कबूल केले आहे. त्यांच्या कबुलीमुळे मागच्या वर्षी कामे झालेली नाही. यावर्षीही ही कामे होणार नाहीत, हेच यातून उघड आहे. कामे प्रस्तावित करताना अभियंत्यांनी त्याची गरज किती आहे, याची प्रत्यक्षस्थळी पाहणी करावी. त्याचे फोटो काढावेत. काम झाल्यावरही फोटो काढावेत. काम प्रस्तावित करताना नगरसेवक निधीतून प्रस्तावित करण्यास प्राधान्य द्यावे. त्यानंतर, भांडवली खर्चातून कामे प्रस्तावित करण्यास द्वितीय प्राधान्य असावे. काम प्रस्तावित करताना जागा खाजगी की सरकारी आहे, याची शहानिशा करावी, असे म्हटले आहे.>कार्यभाराकडे दुर्लक्षमहापालिकेतील बऱ्याच कनिष्ठ व उपअभियंत्यांना उच्च पदाचा कार्यभार दिला आहे. त्यामुळे हे अधिकारी मूळ पदाऐवजी उच्च पदाचा कार्यभार सांभाळण्याकडे अधिक लक्ष देतात. त्यांनी मूळ पदाचे काम आधी पाहावे. त्यानंतर, उच्च पदाची जबाबदारी पार पाडावी, असे आयुक्तांनी सूचित केले आहे.