शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मतपेट्यांच्या राजकारणात खुंटला विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:15 IST

निवडणुकीच्या काळात भिवंडीचा विकास करणार, म्हणून जवळजवळ सर्वच पक्ष नागरिकांना आश्वासने देतात. परंतु, जेव्हा कामे करण्यासाठी अधिकारी रस्त्यावर उतरतात, तेव्हा पक्षाचे काही पुढारी तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन पुढे येत नाहीत.

- पंढरीनाथ कुंभार, भिवंडीनिवडणुकीच्या काळात भिवंडीचा विकास करणार, म्हणून जवळजवळ सर्वच पक्ष नागरिकांना आश्वासने देतात. परंतु, जेव्हा कामे करण्यासाठी अधिकारी रस्त्यावर उतरतात, तेव्हा पक्षाचे काही पुढारी तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन पुढे येत नाहीत. तर, काही पुढारी मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी राजकारणाच्या आहारी जातात. त्यामुळे शहराचा विकास बोलण्यापुरता राहिला की काय, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्ताने शहराच्या कानाकोपऱ्यांत हवा तापू लागली आहे. सर्वच पक्ष आपल्या मतपेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शहराच्या विकासाची दृष्टी व आत्मविश्वास नसलेली माणसे राजकारणात आल्याने शहराची दुरवस्था झाली आहे. महापालिकेची करापोटी वसुली बाकी आहे. त्यामुळे विकासाला गती येत नाही. सरकारकडून येणारा निधी पालिकेची देणी देण्यातच जातो. असे असतानाही सरकारच्या निधीतून विविध योजना शहरात राबवल्या जात आहेत. मात्र, त्याही धड राबवल्या जात नाही. त्यातही व्होटबँकेचे राजकारण झाल्याने अनेक योजना अर्धवट आहेत.शहरातील रस्ते दरवर्षी खराब होत असल्याने व नेहमी वाहतूककोंडी होते. खासदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेऊन एमएमआरडीएकडून काँक्रिटचे रस्ते व उड्डाणपूल मंजूर करून घेतला. परंतु, या मार्गावरील नागरिक व व्यापाºयांनी रस्ता रुंदीकरणासाठी विरोध केल्याने या मार्गावरील रस्त्याच्या कामास अडथळा निर्माण झाला आहे.हा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यासाठी जे नगरसेवक सभागृहात हजर होते, त्यापैकी काही नगरसेवक कल्याण रोडच्या नागरिकांनी काढलेल्या मोर्चात सहभागी होऊन रस्ता रुंदीकरणास विरोध करू लागले. कल्याण रोड हा वर्दळीचा रस्ता आहे. विशेष म्हणजे हा मार्ग मुंबई-नाशिक महामार्गाला जोडलेला असल्याने ठाणे व मुंबईसाठी कल्याण रोडचा वापर करतात. त्यामुळे हा मार्ग रुंद होणे काळाची गरज आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास उड्डाणपूल व मेट्रो रेल्वेला गती मिळणार आहे. मात्र, या रस्त्याला कल्याण रोड संघर्ष समितीचा विरोध आहे. रस्त्याबाबत प्रशासनाची ठोस भूमिका असूनही काही लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे या विकासकामांना अडथळा निर्माण झाला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी नेते पुढे येणे गरजेचे आहे.हीच स्थिती अंजूरफाटा ते बागेफिरदोस या मार्गाची आहे. राज्य सरकारने बाळकुम ते मनोर हा महामार्ग करताना शहरातील दाट वस्तीचा व पर्यायी जागेचा विचार केला नाही. याच मार्गावरून मेट्रो शहरात येणार आहे. मात्र, त्यानुसार रुंदीकरण झालेले नाही. हे दोन्ही मार्ग शहराच्या विकासाला गती देणारे आहेत. त्यासाठी प्रशासनाने हे रस्ते रुंद केले पाहिजेत. त्याचप्रमाणे वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाची तसेच एकेरी मार्ग निर्माण करण्याची गरज आहे.- शहराचा विकास करताना प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे.- विनाकारण राजकारण आणून त्यात खोडा घालता कामा नये. यामुळे विकास राहतो दूर, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नाही.- ज्या कामातून शहराचा खरोखरच विकास साधला जाणार असेल, तर मदतीचा हात पुढे केला पाहिजे.नियोजित विकास गरजेचासध्या जे रस्त्यांचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून काम पूर्ण केलेच पाहिजे. परंतु, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून लोकप्रतिनिधींनी, राजकीय नेत्यांनी आणि पालिका प्रशासनाने शहराचा नियोजित विकास करणे गरजेचे आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी