शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मतपेट्यांच्या राजकारणात खुंटला विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:15 IST

निवडणुकीच्या काळात भिवंडीचा विकास करणार, म्हणून जवळजवळ सर्वच पक्ष नागरिकांना आश्वासने देतात. परंतु, जेव्हा कामे करण्यासाठी अधिकारी रस्त्यावर उतरतात, तेव्हा पक्षाचे काही पुढारी तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन पुढे येत नाहीत.

- पंढरीनाथ कुंभार, भिवंडीनिवडणुकीच्या काळात भिवंडीचा विकास करणार, म्हणून जवळजवळ सर्वच पक्ष नागरिकांना आश्वासने देतात. परंतु, जेव्हा कामे करण्यासाठी अधिकारी रस्त्यावर उतरतात, तेव्हा पक्षाचे काही पुढारी तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन पुढे येत नाहीत. तर, काही पुढारी मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी राजकारणाच्या आहारी जातात. त्यामुळे शहराचा विकास बोलण्यापुरता राहिला की काय, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्ताने शहराच्या कानाकोपऱ्यांत हवा तापू लागली आहे. सर्वच पक्ष आपल्या मतपेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शहराच्या विकासाची दृष्टी व आत्मविश्वास नसलेली माणसे राजकारणात आल्याने शहराची दुरवस्था झाली आहे. महापालिकेची करापोटी वसुली बाकी आहे. त्यामुळे विकासाला गती येत नाही. सरकारकडून येणारा निधी पालिकेची देणी देण्यातच जातो. असे असतानाही सरकारच्या निधीतून विविध योजना शहरात राबवल्या जात आहेत. मात्र, त्याही धड राबवल्या जात नाही. त्यातही व्होटबँकेचे राजकारण झाल्याने अनेक योजना अर्धवट आहेत.शहरातील रस्ते दरवर्षी खराब होत असल्याने व नेहमी वाहतूककोंडी होते. खासदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेऊन एमएमआरडीएकडून काँक्रिटचे रस्ते व उड्डाणपूल मंजूर करून घेतला. परंतु, या मार्गावरील नागरिक व व्यापाºयांनी रस्ता रुंदीकरणासाठी विरोध केल्याने या मार्गावरील रस्त्याच्या कामास अडथळा निर्माण झाला आहे.हा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यासाठी जे नगरसेवक सभागृहात हजर होते, त्यापैकी काही नगरसेवक कल्याण रोडच्या नागरिकांनी काढलेल्या मोर्चात सहभागी होऊन रस्ता रुंदीकरणास विरोध करू लागले. कल्याण रोड हा वर्दळीचा रस्ता आहे. विशेष म्हणजे हा मार्ग मुंबई-नाशिक महामार्गाला जोडलेला असल्याने ठाणे व मुंबईसाठी कल्याण रोडचा वापर करतात. त्यामुळे हा मार्ग रुंद होणे काळाची गरज आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास उड्डाणपूल व मेट्रो रेल्वेला गती मिळणार आहे. मात्र, या रस्त्याला कल्याण रोड संघर्ष समितीचा विरोध आहे. रस्त्याबाबत प्रशासनाची ठोस भूमिका असूनही काही लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे या विकासकामांना अडथळा निर्माण झाला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी नेते पुढे येणे गरजेचे आहे.हीच स्थिती अंजूरफाटा ते बागेफिरदोस या मार्गाची आहे. राज्य सरकारने बाळकुम ते मनोर हा महामार्ग करताना शहरातील दाट वस्तीचा व पर्यायी जागेचा विचार केला नाही. याच मार्गावरून मेट्रो शहरात येणार आहे. मात्र, त्यानुसार रुंदीकरण झालेले नाही. हे दोन्ही मार्ग शहराच्या विकासाला गती देणारे आहेत. त्यासाठी प्रशासनाने हे रस्ते रुंद केले पाहिजेत. त्याचप्रमाणे वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाची तसेच एकेरी मार्ग निर्माण करण्याची गरज आहे.- शहराचा विकास करताना प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे.- विनाकारण राजकारण आणून त्यात खोडा घालता कामा नये. यामुळे विकास राहतो दूर, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नाही.- ज्या कामातून शहराचा खरोखरच विकास साधला जाणार असेल, तर मदतीचा हात पुढे केला पाहिजे.नियोजित विकास गरजेचासध्या जे रस्त्यांचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून काम पूर्ण केलेच पाहिजे. परंतु, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून लोकप्रतिनिधींनी, राजकीय नेत्यांनी आणि पालिका प्रशासनाने शहराचा नियोजित विकास करणे गरजेचे आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी