शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

उल्हास नदी प्रदूषित न करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

कल्याण : राजमाची डोंगरावरून वाहणारी आणि कर्जत, बदलापूर, अंबरनाथ आणि कल्याणमार्गे समुद्रास मिळणारी उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. ...

कल्याण : राजमाची डोंगरावरून वाहणारी आणि कर्जत, बदलापूर, अंबरनाथ आणि कल्याणमार्गे समुद्रास मिळणारी उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. अतिक्रमण, सांडपाणी, कारखान्यांतले रसायन व घरगुती टाकाऊ वस्तू यामुळे उल्हास नदीला काही ठिकाणी नाल्याचे स्वरूप आले आहे. या नदीची स्वच्छता आणि सुंदरता अबाधित राहावी आणि प्रदूषण थांबावे या भावनेतून उल्हास नदी बचाव कृती समिती आणि वालधुनी बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी राबविलेल्या उपक्रमात रंगीबेरंगी अकरा साड्या (उमाई) उल्हास नदीला ओटी स्वरूपात अर्पण करून नदी प्रदूषित न करण्याचा निर्धार केला गेला.

या अर्पण केलेल्या साड्या याच नदीच्या बाजूला राहणाऱ्या गरजू महिलांना भेट म्हणून देण्यात आल्या. रायते ब्रीज पांजरापोळ या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमाला कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी व त्यांच्या पत्नी सीमा, तसेच कांबाच्या सरपंच भारती भगत, वरप ग्रामपंचायत सदस्या संगीता भोईर, म्हारळ ग्रामपंचायत सदस्या वेदिका गंभीरराव, उल्हास नदी बचाव कृती समितीचे अश्विन भोईर यांसह अन्य सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

----------------------------------------------------