शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास व वालधुनी नदीची पुररेषा निश्चित करा, महापालिकेची शासनाकडे मागणी

By सदानंद नाईक | Updated: October 27, 2022 19:22 IST

उल्हासनगरच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीची गटारगंगा झाली असून नदी किनारी अवैध बांधकामामुळे झोपडपट्टी भागाला पुराचा धोका निर्माण झाला.

उल्हासनगर - शहराच्या मधोमध वाहणारी वालधुनी व रिजेन्सी, अंटेलिया येथून वाहणारी उल्हास नदीची पुररेषा निश्चित करण्याची मागणी महापालिकेने राज्य शासनाकडे केली. शासनाने दोन्ही नदीची पुररेषा निश्चित केल्यास अनेक बांधकामावर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उल्हासनगरच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीची गटारगंगा झाली असून नदी किनारी अवैध बांधकामामुळे झोपडपट्टी भागाला पुराचा धोका निर्माण झाला. उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला नदी किनारी आरसीसीचे अवैध बांधकामे सर्व विरोध झुगारून उभे राहत आहेत. त्यामुळे नदी पात्र अरुंद व उथळ झाले. गेल्या काही वर्षात नदीच्या पुराचे पाणी शेकडो घरात जाऊन नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होत असल्याची माहिती माजी नगरसेवक गजानन शेळके यांनीं दिली. तर नदी किनाऱ्याच्या जागेच्या मालकी हक्कावरून प्रांत कार्यालय व महापालिका बघ्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे नदी किनारील खुल्या जागा भूमाफियांच्या घसात जात आहे. तीच परिस्थिती उल्हास नदीच्या किनाऱ्यावरील जागेची आहे. 

शहरातून वाहणाऱ्या उल्हास व वालधुनी नदी किनाऱ्याचा विकास करण्यासाठीं महापालिका पुढे सरसावली आहे. नदी किनाऱ्यावरील वाढत्या अवैध बांधकामामुळे महापालिका चिंतेत आहे. नदीची पुर नियंत्रण रेषा निश्चित झाल्यास, नदी किनाऱ्याचा विकास करता येणार आहे. असे आयुक्त अजीज शेख, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांचे म्हणणे आहे. आयुक्त शेख यांनी शासनाकडे एक प्रस्ताव पाठवून उल्हास व वालधुनी नदीची पूर नियंत्रण रेषा निश्चित करण्याची मागणी केली. पुररेषा निश्चित झाल्यास, नद्यांचा विकास होऊन शहराच्या विकास कामाला गती येणार असल्याची माहिती आयुक्त शेख यांनी दिली. मात्र नद्यांचे पूरनियंत्रण रेषा जाहीर झाल्यास नदी किनाऱ्यावरील शेकडो बांधकामावर गंडांत्तर येणार असल्याचे बोलले जात आहे. वालधुनी नदी किनाऱ्यावरील शांतीनगर, महात्मा फुले कॉलनी, वडोलगाव, संजय गांधीनगर, पवई चौक, हिराघाट, मातोश्रीनगर, शांतीनगर, सी ब्लॉक आदी परिसरातील बांधकामे शेकडो बाधित होणार आहे. 

नदी पात्रात अतिक्रमण

वालधुनी व उल्हास नदी किनाऱ्याला अवैध बांधकामाचा विळखा पडला आहे. शासनाने नदीची पूर नियंत्रण रेषा घोषित केल्यास, शहर विकासाला चालना मिळणार आहे. तसेच नद्यांचा पूर धोका कमी होणार आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर