शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
5
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
6
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
7
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
8
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
9
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
10
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
11
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
12
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
13
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
14
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
15
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
16
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
17
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
18
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
19
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट

उल्हास व वालधुनी नदीची पुररेषा निश्चित करा, महापालिकेची शासनाकडे मागणी

By सदानंद नाईक | Updated: October 27, 2022 19:22 IST

उल्हासनगरच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीची गटारगंगा झाली असून नदी किनारी अवैध बांधकामामुळे झोपडपट्टी भागाला पुराचा धोका निर्माण झाला.

उल्हासनगर - शहराच्या मधोमध वाहणारी वालधुनी व रिजेन्सी, अंटेलिया येथून वाहणारी उल्हास नदीची पुररेषा निश्चित करण्याची मागणी महापालिकेने राज्य शासनाकडे केली. शासनाने दोन्ही नदीची पुररेषा निश्चित केल्यास अनेक बांधकामावर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उल्हासनगरच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीची गटारगंगा झाली असून नदी किनारी अवैध बांधकामामुळे झोपडपट्टी भागाला पुराचा धोका निर्माण झाला. उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला नदी किनारी आरसीसीचे अवैध बांधकामे सर्व विरोध झुगारून उभे राहत आहेत. त्यामुळे नदी पात्र अरुंद व उथळ झाले. गेल्या काही वर्षात नदीच्या पुराचे पाणी शेकडो घरात जाऊन नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होत असल्याची माहिती माजी नगरसेवक गजानन शेळके यांनीं दिली. तर नदी किनाऱ्याच्या जागेच्या मालकी हक्कावरून प्रांत कार्यालय व महापालिका बघ्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे नदी किनारील खुल्या जागा भूमाफियांच्या घसात जात आहे. तीच परिस्थिती उल्हास नदीच्या किनाऱ्यावरील जागेची आहे. 

शहरातून वाहणाऱ्या उल्हास व वालधुनी नदी किनाऱ्याचा विकास करण्यासाठीं महापालिका पुढे सरसावली आहे. नदी किनाऱ्यावरील वाढत्या अवैध बांधकामामुळे महापालिका चिंतेत आहे. नदीची पुर नियंत्रण रेषा निश्चित झाल्यास, नदी किनाऱ्याचा विकास करता येणार आहे. असे आयुक्त अजीज शेख, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांचे म्हणणे आहे. आयुक्त शेख यांनी शासनाकडे एक प्रस्ताव पाठवून उल्हास व वालधुनी नदीची पूर नियंत्रण रेषा निश्चित करण्याची मागणी केली. पुररेषा निश्चित झाल्यास, नद्यांचा विकास होऊन शहराच्या विकास कामाला गती येणार असल्याची माहिती आयुक्त शेख यांनी दिली. मात्र नद्यांचे पूरनियंत्रण रेषा जाहीर झाल्यास नदी किनाऱ्यावरील शेकडो बांधकामावर गंडांत्तर येणार असल्याचे बोलले जात आहे. वालधुनी नदी किनाऱ्यावरील शांतीनगर, महात्मा फुले कॉलनी, वडोलगाव, संजय गांधीनगर, पवई चौक, हिराघाट, मातोश्रीनगर, शांतीनगर, सी ब्लॉक आदी परिसरातील बांधकामे शेकडो बाधित होणार आहे. 

नदी पात्रात अतिक्रमण

वालधुनी व उल्हास नदी किनाऱ्याला अवैध बांधकामाचा विळखा पडला आहे. शासनाने नदीची पूर नियंत्रण रेषा घोषित केल्यास, शहर विकासाला चालना मिळणार आहे. तसेच नद्यांचा पूर धोका कमी होणार आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर