शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

उल्हास व वालधुनी नदीची पुररेषा निश्चित करा, महापालिकेची शासनाकडे मागणी

By सदानंद नाईक | Updated: October 27, 2022 19:22 IST

उल्हासनगरच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीची गटारगंगा झाली असून नदी किनारी अवैध बांधकामामुळे झोपडपट्टी भागाला पुराचा धोका निर्माण झाला.

उल्हासनगर - शहराच्या मधोमध वाहणारी वालधुनी व रिजेन्सी, अंटेलिया येथून वाहणारी उल्हास नदीची पुररेषा निश्चित करण्याची मागणी महापालिकेने राज्य शासनाकडे केली. शासनाने दोन्ही नदीची पुररेषा निश्चित केल्यास अनेक बांधकामावर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उल्हासनगरच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीची गटारगंगा झाली असून नदी किनारी अवैध बांधकामामुळे झोपडपट्टी भागाला पुराचा धोका निर्माण झाला. उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला नदी किनारी आरसीसीचे अवैध बांधकामे सर्व विरोध झुगारून उभे राहत आहेत. त्यामुळे नदी पात्र अरुंद व उथळ झाले. गेल्या काही वर्षात नदीच्या पुराचे पाणी शेकडो घरात जाऊन नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होत असल्याची माहिती माजी नगरसेवक गजानन शेळके यांनीं दिली. तर नदी किनाऱ्याच्या जागेच्या मालकी हक्कावरून प्रांत कार्यालय व महापालिका बघ्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे नदी किनारील खुल्या जागा भूमाफियांच्या घसात जात आहे. तीच परिस्थिती उल्हास नदीच्या किनाऱ्यावरील जागेची आहे. 

शहरातून वाहणाऱ्या उल्हास व वालधुनी नदी किनाऱ्याचा विकास करण्यासाठीं महापालिका पुढे सरसावली आहे. नदी किनाऱ्यावरील वाढत्या अवैध बांधकामामुळे महापालिका चिंतेत आहे. नदीची पुर नियंत्रण रेषा निश्चित झाल्यास, नदी किनाऱ्याचा विकास करता येणार आहे. असे आयुक्त अजीज शेख, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांचे म्हणणे आहे. आयुक्त शेख यांनी शासनाकडे एक प्रस्ताव पाठवून उल्हास व वालधुनी नदीची पूर नियंत्रण रेषा निश्चित करण्याची मागणी केली. पुररेषा निश्चित झाल्यास, नद्यांचा विकास होऊन शहराच्या विकास कामाला गती येणार असल्याची माहिती आयुक्त शेख यांनी दिली. मात्र नद्यांचे पूरनियंत्रण रेषा जाहीर झाल्यास नदी किनाऱ्यावरील शेकडो बांधकामावर गंडांत्तर येणार असल्याचे बोलले जात आहे. वालधुनी नदी किनाऱ्यावरील शांतीनगर, महात्मा फुले कॉलनी, वडोलगाव, संजय गांधीनगर, पवई चौक, हिराघाट, मातोश्रीनगर, शांतीनगर, सी ब्लॉक आदी परिसरातील बांधकामे शेकडो बाधित होणार आहे. 

नदी पात्रात अतिक्रमण

वालधुनी व उल्हास नदी किनाऱ्याला अवैध बांधकामाचा विळखा पडला आहे. शासनाने नदीची पूर नियंत्रण रेषा घोषित केल्यास, शहर विकासाला चालना मिळणार आहे. तसेच नद्यांचा पूर धोका कमी होणार आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर