शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

राजकीय हेतूसाठी पाणी रोखण्याचं काम; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By पंकज पाटील | Updated: October 10, 2023 19:42 IST

साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते.

पंकज पाटील, अंबरनाथ:अंबरनाथ पश्चिमेकडील काही भागात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईसंदर्भात मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन पाणी कार्यालयाकडून देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरु असलेले साखळी उपोषण आज माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थितीमध्ये मागे घेण्यात आले. यावेळी आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत राजकारणासाठी पाण्याचा वापर केला जात असल्याचा आरोप केला.

अंबरनाथ पश्चिम भागातील संघटन चौक, बुवापाडा,भास्करनगर आदी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे  शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ  शुक्रवारपासून साखळी उपोषण  सुरू करण्यात आले होते. अखेर  उपोषणाच्या आजच्या पाचव्या  दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या उपोषणास भेट देत उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे घेतले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांनी उपोषणकर्ते यांच्या २० पैकी १८ मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासनाचे पत्र आव्हाड यांच्या उपस्थितीत उपोषणकर्ते यांना देत उपोषण मागे घेतले. तर आव्हाड यांनी संबधित अधिकाऱ्यांना एक महिन्यांची मुदत देत दिलेल्या आश्वासनानुसार पाण्याचा पुरवठा न झाल्यास परत पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला. तर अंबरनाथ शहरात निवडणुका जवळ आल्यावरच राजकीय हेतूसाठी पाणी रोखण्याचं काम सुरू होते. राजकारण करण्यासाठी पाण्याचा वापर होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला

टॅग्स :ambernathअंबरनाथ