शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय हेतूसाठी पाणी रोखण्याचं काम; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By पंकज पाटील | Updated: October 10, 2023 19:42 IST

साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते.

पंकज पाटील, अंबरनाथ:अंबरनाथ पश्चिमेकडील काही भागात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईसंदर्भात मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन पाणी कार्यालयाकडून देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरु असलेले साखळी उपोषण आज माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थितीमध्ये मागे घेण्यात आले. यावेळी आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत राजकारणासाठी पाण्याचा वापर केला जात असल्याचा आरोप केला.

अंबरनाथ पश्चिम भागातील संघटन चौक, बुवापाडा,भास्करनगर आदी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे  शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ  शुक्रवारपासून साखळी उपोषण  सुरू करण्यात आले होते. अखेर  उपोषणाच्या आजच्या पाचव्या  दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या उपोषणास भेट देत उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे घेतले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांनी उपोषणकर्ते यांच्या २० पैकी १८ मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासनाचे पत्र आव्हाड यांच्या उपस्थितीत उपोषणकर्ते यांना देत उपोषण मागे घेतले. तर आव्हाड यांनी संबधित अधिकाऱ्यांना एक महिन्यांची मुदत देत दिलेल्या आश्वासनानुसार पाण्याचा पुरवठा न झाल्यास परत पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला. तर अंबरनाथ शहरात निवडणुका जवळ आल्यावरच राजकीय हेतूसाठी पाणी रोखण्याचं काम सुरू होते. राजकारण करण्यासाठी पाण्याचा वापर होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला

टॅग्स :ambernathअंबरनाथ