शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

पावसाळा उलटूनही जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:28 IST

जिल्ह्यातील रस्त्यांची दैना; वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप

शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालक स्थानिक यंत्रणेच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहताना दिसत आहेत. पालिका प्रशासन केवळ थातूरमातूर डागडुजी करून रस्त्यांची कामे सुरू असल्याचा कांगावा करते. मात्र तात्पुरते डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवरून अवजड वाहने गेल्याने या रस्त्यांची पुन्हा दुरवस्था होते. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास होत असून, धुळीचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांकडून पालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.भिवंडीत तर ही परिस्थिती जास्तच भीषण आहे. शहरातील रस्त्यांप्रमाणेच भिवंडीतील उड्डाणपुलांचीही अक्षरश: दैना झाली आहे. भिवंडीतील अंजूरफाटा, वंजारपट्टीनाका रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी कोट्यवधींचे काम एमएमआरडीए प्रशासनाकडून मंजूर करण्यात आले आहे. कंत्राटदारामार्फत या रस्त्याचे कामही सुरू आहे. मात्र या रस्त्याच्या कामाचे कोणतेही नियोजन नसल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. याच मार्गावर असलेल्या धामणकरनाका येथील उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे धूळ उडत असल्याने दुचाकीस्वारांना प्रचंड त्रास होत आहे. या उड्डाणपुलाच्या देखभालीकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने स्थानिकांसह प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. धामणकरनाका उड्डाणपुलाप्रमाणेच कल्याणनाका येथे असलेल्या उड्डाणपुलाचीही खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे रस्त्यांच्या दुरवस्थेवर तातडीने उपाययोजना करण्यात येणार असून, खड्डे लवकरात लवकर दुरु स्त करण्यात येतील. शहरात १५ रस्त्यांची कामे सुरू होणार असून त्यासाठी योग्य नियोजन व उपाययोजनाही करण्यात येतील, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.स्मार्ट सिटीसोबतच शहरातून मेट्रो धावण्याची स्वप्ने राज्यकर्ते दाखवत असले, तरी प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण झाली असून, पावसाळा उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल, असे बोलून सर्वच यंत्रणा हात झटकत होत्या. आता पावसाळा उलटल्यानंतर जिल्ह्यातील रस्त्यांची नेमकी काय स्थिती आहे, याचा आढावा घेतला आहे, ‘लोकमत’चे प्रतिनिधी पंकज पाटील, सदानंद नाईक, नितीन पंडितआणि जनार्दन भेरे यांनी.अधिकारीही करतात धुळीतून प्रवास : धुळीमुळे नागरिकांना घशाचे व श्वसनाचे आजार होत आहेत. मात्र शहरात पालिका प्रशासन व ग्रामीण भागात सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. धामणकरनाका ते वंजारपट्टीनाका या रस्त्यावर खड्डे व धुळीचे साम्राज्य इतके पसरले आहे की, दुचाकीस्वारांना प्रवास करताना अक्षरश: नको होत आहे. याच मार्गावर भिवंडी पालिकेचे कार्यालय असून, सर्वच अधिकारी व कर्मचारी धुळीच्या रस्त्यावरून रोजचा प्रवास करत असतानाही त्यात सुधारणा झालेली नाही.