शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शाळा असूनही फी मात्र १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:26 IST

स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ऑनलाईन शाळांचा निर्णय योग्य आहे. गेल्या वर्षानंतर यंदाही ...

स्नेहा पावसकर

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ऑनलाईन शाळांचा निर्णय योग्य आहे. गेल्या वर्षानंतर यंदाही कोरोनामुळे शाळा ऑनलाईनच सुरू झालेल्या आहेत. मात्र, तरीही बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांकडून नियमित शाळेनुसार १०० टक्के फी ‌वसूल केली आहे. विद्यार्थी शाळेच्या कोणत्याही साधनांचा उपभोग घेणार नसूनही त्यांच्याकडून पूर्ण फी आकारल्याने पालक वर्गामध्ये नाराजीचा सूर आहे.

ठाणे जिल्ह्यात खासगी, अनुदानित, विनाअनुदानित अशा मिळून एकूण १६२० शाळा आहेत. जिल्ह्यात अनुदानित ४५१, विनाअनुदानित ११६, अंशत: अनुदानित ७३, सेल्फ फायनान्स ८५१, तर अनरेक्ग्नाइज २६ शाळा आहेत. तर इतर १०३ शाळा अशा मिळून १६२० शाळा आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या सर्वच शाळा या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. इयत्तेनुसार आणि त्यांच्या अभ्यासानुसार शिक्षक दररोज काही तास ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेतात. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तके दिली. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेच्या इतर कोणत्याही सुविधेचा फायदा होत नाही की शाळेत वर्गही भरत नाही, तरी कसली फी घेतात, असा प्रश्न पालक उपस्थित करतात.

-------------

शाळा तर बंद आहे. ऑनलाईन क्लासच होतात. मुलं काय शाळेत जात नाहीत. शाळेचे वर्ग, कॉम्प्युटर क्लास, लायब्ररी, स्पोर्टस, या गोष्टी वापरल्या जात नाहीत, तर त्याचे चार्जेस तरी कमी करावेत. मात्र, शाळा हल्ली सरसकट फी घेत आहेत. हा आम्हा पालकांना भुर्दंड आहे.

- अनेय मेतकुटे, पालक

----------------

आधीच लॉकडाऊनमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड अनेकांवर पडली आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण महत्त्वाचे आहेच; पण तेही काही तासांपुरते असते. आणि एवढेच वर्ग होतात. मग यासाठी पूर्ण फी का आकारली जाते. शाळांनी फीमध्ये सगळ्यांना सवलत दिली पाहिजे.

राधिका दवणे, पालक

------------

---------------

आमची शाळा तर सध्या ७० टक्के फी घेते आहे. मात्र, इतर ज्या शाळा पूर्ण फी घेत असतील, त्यांनी शाळा ऑफलाईन सुरू होत नाही तोपर्यंत इतर विविध शुल्क जी आकारली जातात, ती कमी करायला हरकत नाही. त्यातही आपल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गेल्यावर्षी सुरुवातीला फी न भरण्याचे पालकांना आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर वर्षभरात त्यांनी त्याबाबत स्पष्ट खुलासा केला नाही. अनुदानित वगळता इतर सर्व शाळा चालविताना संस्थाचालकांना कसरत करावी लागते आहे. शाळेचा मेंटेनन्स, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे पगार, लाईट बिल यातून सुटका नाहीच. या कोविडच्या काळात स्वत:कडचे पैसे पदरमोड करून शाळा चालविणे परवडत नसल्याने काही संस्थाचालकांनी शाळा बंद केल्या आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या फी बाबत काही गाईडलाईन ठरवून द्याव्या, तेच उचित ठरेल, असे मत ठाण्यातील काही नामांकित शाळेच्या संस्थाचालकांनी व्यक्त केले.