शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

नव्या पत्रीपुलाचा उतार ठरतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:41 IST

कल्याण : बहुचर्चित नव्या पत्रीपुलाचे काम मार्गी लागल्याने वाहनचालकांची वाहतूककोंडीतून सुटका झाली असताना आता नव्यानेच एक समस्या उभी राहिली ...

कल्याण : बहुचर्चित नव्या पत्रीपुलाचे काम मार्गी लागल्याने वाहनचालकांची वाहतूककोंडीतून सुटका झाली असताना आता नव्यानेच एक समस्या उभी राहिली आहे. या पुलावरील कल्याणच्या दिशेने जाणारा रस्ता उताराचा असल्याने त्यावरून जाताना दुचाकी घसरण्याच्या तसेच अन्य वाहनाला धडकण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत, तर दुसरीकडे लगतच्या पुलावरील डोंबिवलीकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे तसेच उंच-सखल भाग असल्याने तेथून जाताना वाहनचालकांना कसरतीचा सामना करावा लागत आहे.

नोव्हेंबर २०१८ला धोकादायक अवस्थेतील जुना पत्रीपूल पाडण्यात आला. आठ महिन्यांत नव्या पत्रीपुलाचे काम मार्गी लागेल असे दावे त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी केले होते. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे पत्रीपुलाचे काम पूर्ण व्हायला दोन वर्षांहून अधिक कालावधी लागला. दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष घातल्याने २५ जानेवारीला त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. नव्या पुलाचे आई तिसाई देवी असे नामकरणही केले असून, तो वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालकांची कोंडीतून मुक्तता झाली आहे. ही बाब समाधानाची असली तरी कल्याण बाजूकडील उतारावर वाहने वेगाने जात असल्याने अपघाताच्या घटना त्याठिकाणी घडू लागल्या आहेत. उताराच्या ठिकाणी गोविंदवाडी बायपास येथूनही वाहने पत्रीपूल आणि कल्याणच्या दिशेने जात असल्याने त्या चौकात सिग्नल व्यवस्था सुरू करण्याबाबतचे पत्र मनसेचे कल्याण शहर संघटक रूपेश भोईर यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना २९ जानेवारीला दिले आहे. परंतु, अद्याप त्यांच्या पत्राला कोणतेही उत्तर प्रशासनाकडून दिले गेलेले नाही. त्यात आता दुचाकींना अपघात होण्याचे प्रकार वाढल्याने याची दखल तरी प्रशासनाकडून घेतली जाईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

------------------------------------------------------

फोटो आनंद मोरे