शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

उल्हासनगरात रंगला आयुक्त विरुद्ध उमपहापौर सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिका उपायुक्तांना सोपविलेल्या विभागात आयुक्तांनी भेदभाव केल्याचा आरोप उपमहापौर भगवान भालेराव यांनी ...

सदानंद नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिका उपायुक्तांना सोपविलेल्या विभागात आयुक्तांनी भेदभाव केल्याचा आरोप उपमहापौर भगवान भालेराव यांनी केला असून, उपायुक्त अशोक नाईकवाडे व प्रियंका राजपूत यांच्याकडील काही विभाग काढण्याची लेखी मागणी भालेराव यांनी केली आहे. जर ते विभाग काढून घेतले नाही, तर दालनाबाहेर उपोषण करण्याचा इशाराही भालेराव यांनी केला आहे. या प्रकाराने महापालिकेत आयुक्त विरुद्ध उपमहापौर असा सामना रंगल्याची चर्चा आहे.

उल्हासनगर महापालिकेला प्रथमच अतिरिक आयुक्त म्हणून करुणा जुईकर तर अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, प्रियंका राजपूत व सुभाष जाधव असे चार उपायुक्त मिळाले. उपायुक्त दर्जाचे चार अधिकारी मिळाल्याने महापालिकेत पारदर्शक व चांगले काम होणार असे वाटत होते. मात्र, उपमहापौर भगवान भालेराव यांनी उपायुक्त यांच्याकडे सोपविलेल्या विभागात आयुक्तांनी दुजाभाव करून काही उपायुक्तांना चांगले तर काहींना कमी दर्जाचे विभाग दिल्याचा आरोप केला आहे. उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्याकडील शिक्षण विभाग व महिला बालकल्याण विभाग तसेच उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम विभाग व भांडार विभाग काढून घेण्याची लेखी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. २९ जुलैच्या दुपारपर्यंत सोपविलेला विभाग काढला नाही, तर उपमहापौर दालनाबाहेर उपोषण करण्याचा इशारा भालेराव यांनी आयुक्तांना दिला आहे.

महापालिका उपायुक्तांकडील सोपविलेल्या विभागावरून आयुक्त डॉ.राजा दयानिधी व उपमहापौर भगवान भालेराव एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र शहरात निर्माण झाले. कोरोना महामारीच्या काळात महापालिकेत कार्यरत असलेले एकमेव उपायुक्त मदन सोंडे यांनी चमकदार कामगिरी केली. मात्र, त्यांना बाजूला सारून कमी महत्त्वाचे विभाग दिल्याचा आरोप भालेराव यांनी केला. तसेच विभाग सोपविताना वरिष्ठ श्रेणीचा विचार केला नाही, असेही ते म्हणाले.

------------

हे तर प्रशासकीय कामकाज- आयुक्त डॉ. दयानिधी

महापालिका सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना विविध विभागांचा पदभार सोपविणे, हे प्रशासकीय काम आहे. उपमहापौर भगवान भालेराव यांचे उपोषण व उपायुक्तांकडे सोपविल्याबाबतचे पत्र मिळाले असून नियमानुसार काय कारवाई होते. त्यानुसार कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्त. डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.