शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

तुर्फेपाडा झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी वंचितचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 00:01 IST

पुनर्वसनाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडून निवेदन

ठाणे : घोडबंदर रोडवरील शासकीय भूखंडावर उभारलेल्या बेकायदा झोपड्यांना लागलेल्या आगीत ५५ झोपड्या खाक झाल्या होत्या. या झोपडीधारकांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. तसेच, त्यांना कोणत्याही प्रकारची मदतही जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही. यामुळे या झोपडीधारकांना मदत देण्यात यावी, त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

घोडबंदर रोडवरील तुर्फेपाडा येथे ब्रह्मांड फेज-२ चे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी असलेल्या शिवनेरी इमारतीजवळील मोकळ्या शासकीय भूखंडावर पत्र्यांची बेकायदा घरे उभारली आहेत. याच झोपड्यांना ३ जानेवारी रोजी काही समाजकंटकांनी आग लावली होती. या आगीत सुमारे ५५ झोपड्या खाक झाल्या आहेत. याप्रकरणी संबंधित गुन्हेगारांवर अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केलेली आहे. मात्र, या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचे अर्थसाहाय्य प्रशासनाने दिलेले नाही. तलाठ्यांनी पंचनामा केला असला, तरी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तहसीलदार आणि समाजकल्याण अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अत्याचारग्रस्तांचे पुनर्वसन करावे, अशी तरतूद असतानाही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्याने हा मोर्चा काढल्याचे चव्हाण यांनी सांगितले.असा निघाला मोर्चा : ठाणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाची सुरु वात झाली. तो राममारु ती रोडमार्गे गडकरी रंगायतनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. यावेळी आंदोलकांनी सुमारे तीन तास धरणे आंदोलन केले. या मोर्चामध्ये सुखदेव उबाळे, अ‍ॅड. किशोर दिवेकर, चंद्रकांत कांबळे, सुरेश कांबळे, उन्मेष बागवे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकºयांच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी