शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

तुर्फेपाडा झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी वंचितचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 00:01 IST

पुनर्वसनाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडून निवेदन

ठाणे : घोडबंदर रोडवरील शासकीय भूखंडावर उभारलेल्या बेकायदा झोपड्यांना लागलेल्या आगीत ५५ झोपड्या खाक झाल्या होत्या. या झोपडीधारकांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. तसेच, त्यांना कोणत्याही प्रकारची मदतही जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही. यामुळे या झोपडीधारकांना मदत देण्यात यावी, त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

घोडबंदर रोडवरील तुर्फेपाडा येथे ब्रह्मांड फेज-२ चे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी असलेल्या शिवनेरी इमारतीजवळील मोकळ्या शासकीय भूखंडावर पत्र्यांची बेकायदा घरे उभारली आहेत. याच झोपड्यांना ३ जानेवारी रोजी काही समाजकंटकांनी आग लावली होती. या आगीत सुमारे ५५ झोपड्या खाक झाल्या आहेत. याप्रकरणी संबंधित गुन्हेगारांवर अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केलेली आहे. मात्र, या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचे अर्थसाहाय्य प्रशासनाने दिलेले नाही. तलाठ्यांनी पंचनामा केला असला, तरी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तहसीलदार आणि समाजकल्याण अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अत्याचारग्रस्तांचे पुनर्वसन करावे, अशी तरतूद असतानाही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्याने हा मोर्चा काढल्याचे चव्हाण यांनी सांगितले.असा निघाला मोर्चा : ठाणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाची सुरु वात झाली. तो राममारु ती रोडमार्गे गडकरी रंगायतनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. यावेळी आंदोलकांनी सुमारे तीन तास धरणे आंदोलन केले. या मोर्चामध्ये सुखदेव उबाळे, अ‍ॅड. किशोर दिवेकर, चंद्रकांत कांबळे, सुरेश कांबळे, उन्मेष बागवे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकºयांच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी