शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बाधितांना अद्याप कायमस्वरूपी घरेच नाहीत; नागरिकांची राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 06:08 IST

पालिकेने त्यांना कांदळवन नष्ट करून तेथे बेकायदा कचरा भराव करून झालेल्या भूखंडात झोपड्या बांधून राहण्यास दिले.  

मीरा रोड - २००३ मध्ये रेल्वेच्या जागेतील १३५ घरे पाडल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी घरे देण्यास आजही पालिका टाळाटाळ करत आहे. मूलभूत सुविधांचा अभाव, अमानवीय राहणीमानामुळे त्रस्त नागरिकांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली.  

आयोगाने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मीरा-भाईंदर पालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना सुनावणीवेळी ११ ऑगस्टला हजर राहण्याचे समन्स जारी केले आहेत. भाईंदर पूर्वेला बंदरवाडी झोपडपट्टी ही रेल्वेच्या जागेत होती. पात्र, झोपडपट्टीधारक असूनही त्यांचे पुनर्वसन न करताच ती तोडून १३५ कुटुंबांना रेल्वे आणि पालिकेने रस्त्यावर आणले. पालिकेने त्यांना कांदळवन नष्ट करून तेथे बेकायदा कचरा भराव करून झालेल्या भूखंडात झोपड्या बांधून राहण्यास दिले.  

चौरस फुटांची दिली जागा २०१७ मध्ये ठाणे जिल्हाधिकारी यांनी पालिकेस प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदर १३५ कुटुंबीयांचे पुनर्वसन करा, असे कळवले होते. पालिकेने २०१९ मध्ये इंद्रलोक फेज ३ मधील एम्स या २० मजली संक्रमण शिबिरातील १६० चौरस फुटांच्या फ्लॅटमध्ये त्यांना तात्पुरते राहण्यास परवानगी दिली. तेव्हापासून १३५ कुटुंबे या लहानशा घरात राहत आहेत. 

इमारत असली तरी असुविधा खूप २० मजली इमारतीत दोन लिफ्ट असल्या तरी एकच लिफ्ट चालू असते. तीही बंद पडत असते. लिफ्ट बंद झाल्याने आत अडकून पडलेल्यांना मोठ्या जिकिरीने बाहेर काढले जाते. पुरेसे पाणी मिळत नाही. सामायिक वीज बिल न भरल्याने दोन-तीन दिवस वीजपुरवठा खंडित केला गेला होता, असे आरोप रहिवाशांनी केले आहेत.  

रहिवाशांचे हाल थांबवा आणि त्यांना घरे द्या...पालिकेने कायमस्वरूपी घरे द्यावीत, हाल थांबवावेत यासाठी रहिवासी संस्थेचे अध्यक्ष शैलेश गोंड यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली. पालिकेकडे परवडणाऱ्या योजनेतील ५१ घरे असून ती आणि घोडबंदर येथील योजनेतून मिळणारी ५० घरे कायमस्वरूपी द्यावीत, अशी मागणी गोंड यांनी केली. पालिकेच्या शपथपत्रानंतर आयोगाचे अध्यक्ष जस्टीस ए. एम. बदर यांनी, ठाणे जिल्हाधिकारी आणि मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त यांना हजर राहण्याचे समन्स बजावले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक