शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘त्या’ बाधितांना अद्याप कायमस्वरूपी घरेच नाहीत; नागरिकांची राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 06:08 IST

पालिकेने त्यांना कांदळवन नष्ट करून तेथे बेकायदा कचरा भराव करून झालेल्या भूखंडात झोपड्या बांधून राहण्यास दिले.  

मीरा रोड - २००३ मध्ये रेल्वेच्या जागेतील १३५ घरे पाडल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी घरे देण्यास आजही पालिका टाळाटाळ करत आहे. मूलभूत सुविधांचा अभाव, अमानवीय राहणीमानामुळे त्रस्त नागरिकांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली.  

आयोगाने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मीरा-भाईंदर पालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना सुनावणीवेळी ११ ऑगस्टला हजर राहण्याचे समन्स जारी केले आहेत. भाईंदर पूर्वेला बंदरवाडी झोपडपट्टी ही रेल्वेच्या जागेत होती. पात्र, झोपडपट्टीधारक असूनही त्यांचे पुनर्वसन न करताच ती तोडून १३५ कुटुंबांना रेल्वे आणि पालिकेने रस्त्यावर आणले. पालिकेने त्यांना कांदळवन नष्ट करून तेथे बेकायदा कचरा भराव करून झालेल्या भूखंडात झोपड्या बांधून राहण्यास दिले.  

चौरस फुटांची दिली जागा २०१७ मध्ये ठाणे जिल्हाधिकारी यांनी पालिकेस प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदर १३५ कुटुंबीयांचे पुनर्वसन करा, असे कळवले होते. पालिकेने २०१९ मध्ये इंद्रलोक फेज ३ मधील एम्स या २० मजली संक्रमण शिबिरातील १६० चौरस फुटांच्या फ्लॅटमध्ये त्यांना तात्पुरते राहण्यास परवानगी दिली. तेव्हापासून १३५ कुटुंबे या लहानशा घरात राहत आहेत. 

इमारत असली तरी असुविधा खूप २० मजली इमारतीत दोन लिफ्ट असल्या तरी एकच लिफ्ट चालू असते. तीही बंद पडत असते. लिफ्ट बंद झाल्याने आत अडकून पडलेल्यांना मोठ्या जिकिरीने बाहेर काढले जाते. पुरेसे पाणी मिळत नाही. सामायिक वीज बिल न भरल्याने दोन-तीन दिवस वीजपुरवठा खंडित केला गेला होता, असे आरोप रहिवाशांनी केले आहेत.  

रहिवाशांचे हाल थांबवा आणि त्यांना घरे द्या...पालिकेने कायमस्वरूपी घरे द्यावीत, हाल थांबवावेत यासाठी रहिवासी संस्थेचे अध्यक्ष शैलेश गोंड यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली. पालिकेकडे परवडणाऱ्या योजनेतील ५१ घरे असून ती आणि घोडबंदर येथील योजनेतून मिळणारी ५० घरे कायमस्वरूपी द्यावीत, अशी मागणी गोंड यांनी केली. पालिकेच्या शपथपत्रानंतर आयोगाचे अध्यक्ष जस्टीस ए. एम. बदर यांनी, ठाणे जिल्हाधिकारी आणि मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त यांना हजर राहण्याचे समन्स बजावले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक