शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

बंदी असून देखील बेकायदा मासेमारी करणाऱ्या बोटींची नोंदणी रद्द करून गुन्हे दाखल करण्याची मागणी

By धीरज परब | Updated: June 14, 2024 17:45 IST

२०२४ सालचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलैपर्यंत लागू असताना रेवस, करंजा आणि मुंबईतील काही मच्छिमारांनी अवैध मासेमारीचे सत्र सुरू ठेवले असल्याने माश्यांच्या प्रजनन आणि संवर्धनावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

मीरारोड - १ जून पासून मासेमारीला शासनाने बंदी घातलेली असताना देखील  रेवस, करंजा आणि मुंबईतील काही मच्छिमारांनी अवैध मासेमारी चालविल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल कारण्यासह त्यांच्या बोटी जप्त करून नोंदणी रद्द करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्या कडे केली आहे .

समिती तर्फे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो, सचिव संजय कोळी, युवा कार्याध्यक्ष मनीष वैती, पालघर जिल्हा अध्यक्ष . विनोद पाटील, उत्तम भागातून स्टीफन कासुघर व कासलिन डाँगरकर तर वसई भागातून मिल्टन सौध्या, ब्लेस जन्या, संजू मानकर आदी सदस्य यांनी शुक्रवारी पाटणे यांची भेट घेतली. यावेळी बेकायदा मासेमारी बद्दल उपस्थित होते

२०२४ सालचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलैपर्यंत लागू असताना रेवस, करंजा आणि मुंबईतील काही मच्छिमारांनी अवैध मासेमारीचे सत्र सुरू ठेवले असल्याने माश्यांच्या प्रजनन आणि संवर्धनावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अवैध मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या गलबती समुद्रात वादळी वाऱ्याने बुडाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. 

अवैध मासेमारी करणाऱ्या गलबतीवर नौकेचे नंबर पुसून मासेमारी करीत असल्याचे गेल्यावर्षी दिसून आले होते. अशा प्रकारच्या अवैध मासेमारीमुळे देशाची सागरी सुरक्षा धोक्यात येऊ शकते. जर मासेमारी होत असल्याचे पाकिस्तानी यंत्रणांच्या निदर्शनास आले तर मुंबईत मोठा आतंकवादी हल्ला नाकारता येणार नाही. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या मच्छीमार बोट मालकांवर देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल करा. 

विषयाचे गांभीर्य लक्षात घेता आणि अवैध मासेमारीला आळा घालण्याकरिता, अवैध मासेमारी करणाऱ्या बोटी जप्त करून त्या बोटींच्या रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावेत. रेती उत्खनन करण्याऱ्या बोटींना ज्याप्रमाणे महसूल विभागाकडून फोडून टाकण्यात येतात त्याच धर्तीवर पावसाळी बंदी कालावधीत अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांना फोडून टाकण्यात यावे. अवैध मासेमारी करणाऱ्या नौका मालकांवर, खलाश्यांवर, मासे विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी यावेळी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत समितीच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रत्येक तालुक्यातील परवाना अधिकारी यांना कार्यवाहीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मच्छिमार नेते बर्नड डिमेलो यांनी दिली आहे