शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

शेती घटल्याने सुपाची मागणी घटली; विक्रेत्या महिलेची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:43 IST

आळेफाटा येथील सूर्यवंशी ४० वर्षांपासून सूपविक्रीचा व्यवसात करत आहेत.

पंकज पाटील मुरबाड : शेतीशी निगडित असलेल्या पारंपरिक सुपांची विक्री मोठ्या प्रमाणात घटली आहे. प्लास्टिकच्या सुपांमुळे पारंपरिक विणीचे सूप नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी आता शेतीसाठी सूप शक्यतो वापरत नाही. केवळ धार्मिक विधीसाठी सुपाचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्या पारंपरिक व्यवसायावर त्याचा परिणाम होत असल्याची भावना सूपविक्रेत्या चंपा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

मुरबाडची म्हसा यात्रा म्हणजे सर्वांचे आकर्षण. या यात्रेत पारंपरिक शेतीशी निगडित अवजारे, जनावरे, टोपली आणि सूप यांची मोठी विक्री होते. म्हसा यात्रेतील टोपली बाजारात गेल्या ४० वर्षांपासून सुपाचा व्यवसाय करणाऱ्या सूर्यवंशी यांनी आपली व्यथा मांडली. टोपलीच्या तुलनेत सुपाची मागणी कमी होत चालली आहे. शेतीचे प्रमाण कमी झाल्याने सुपांच्या विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे. काही भागात आजही शेती सुरू आहे, त्यामुळे ते शेतकरी आवर्जून सूप खरेदी करतात. मात्र, जी गावे शहराशी जोडली गेली आहेत, त्या गावात सुपांचे महत्त्व केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित राहिले आहे. हळद, लग्नसराई आणि पाचवीपूजन करताना काही ठिकाणी सुपाची गरज भासते. त्यासाठीच वापरले जाते. मात्र, पारंपरिक शेतीशी जोडले गेलेले सूप आता हव्या त्या प्रमाणात विकले जात नाही.

आळेफाटा येथील सूर्यवंशी ४० वर्षांपासून सूपविक्रीचा व्यवसात करत आहेत. पूर्वी १० रुपयांपासून सूप मिळत होते. आज महागाई वाढल्याने त्याच सुपाची किंमत आता २०० ते ३०० च्या घरात गेली आहे. मात्र, बाजारात प्लास्टिकचे सूप अल्प किमतीत मिळत असल्याने ते घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. असे असतानाही मंदीच्या काळातही सूर्यवंशी सुपाचा व्यवसाय करीत आहेत. वर्षभर विविध आठवडाबाजारांत सूपविक्री करून त्या आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत. मात्र, म्हसाच्या यात्रेत खºया अर्थाने त्यांना दोन पैशांचा फायदा नक्कीच होतो. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांत हा फायदाही कमी होत चालला आहे.

एक सूप विणण्यासाठी दीड तास जातो. मात्र, त्याचा मोबदला म्हणून २०० रुपये देण्यासही ग्राहक तयार होत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपली तिसरी पिढी या व्यवसायात असून पुढची पिढी हे काम करेल, असे वाटत नाही. पूर्वीसारखी मागणी नसल्याने आता आमचे नातवंडं या व्यवसायापासून दुरावत आहेत. तसेच या व्यवसायाकडे न वळता शिक्षण घेऊन दुसरा व्यवसाय करावा, असा सल्ला स्वत: सूर्यवंशी देतात.