शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मागणी ४०० ‘रेमडेसिविर’ची, मात्र मिळतात केवळ १००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या सात कोविड रुग्णालयांमधील रुग्णांसाठी दिवसाला ४०० रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असताना, मात्र मनपाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या सात कोविड रुग्णालयांमधील रुग्णांसाठी दिवसाला ४०० रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असताना, मात्र मनपाला केवळ १०० इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत.

केडीएमसी हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या १४ हजारांच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱ्यांपैकी ७५ टक्के रुग्ण हे कोविडचे सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आहेत. सौम्य लक्षणे असलेल्यांना टाटा आमंत्रा येथील कोविड केंद्रात पाठविले जाते. मात्र, गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनी ‘रेमडेसिविर’ची आवश्यकता लागते. मनपाने यापूर्वी पुरेशी रेमडेसिविर इंजेक्शन मागवली होती. मात्र, आताची वाढती रुग्णसंख्या पाहता, या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. पुरेशी इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने मनपा प्रशासनही हतबल झाले आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोनाचा आढावा घेतला असताना, मनपा आयुक्तांनी ३० हजार इंजेक्शनचा पुरवठा कंत्राटदाराकडून मनपास उपलब्ध होईल, अशी तजवीज केली आहे. ही इंजेक्शन उपलब्ध होताच मनपा रुग्णालयात पुरेशी इंजेक्शन उपलब्ध होतील. तेव्हा हा ताण कमी होईल, असे स्पष्टीकरण दिले. दरम्यान, रेमडेसिविर पुरवठादाराकडून उपलब्ध होऊ शकते. मात्र, टोझलीझुमॅब इंजेक्शन तर बाजारातच उपलब्ध नाही. २७ एप्रिलपर्यंत उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, ते अद्याप उपलब्ध झालेले नाही.

इंजेक्शन बाहेरून आणण्याची वेळ

मनपा हद्दीतील ९० खासगी कोविड रुग्णालयांतील रुग्णांनाही रेमडेसिविर आणि टोझलीझुमॅबची गरज भासत आहे. त्यापैकी ‘रेमडेसिविर’ हे जिल्हाधिकारी नियंत्रण समितीकडून उपलब्ध करून दिले जाते. मात्र, खासगी रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात हे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना ते बाहेरून आणण्यास सांगितले जाते, परंतु ते बाजारात मिळत नाही. नियंत्रण समितीकडूनही अत्यावश्यक बाब म्हणून दुसऱ्या दिवशी हे इंजेक्शन दिले जाते. दरम्यानच्या काळात रुग्णांची प्रकृती खालावल्यास त्यांचा प्राण जाऊ शकतो, अशी भीती त्यांच्या नातेवाइकांना सतावते.

------------------------