शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

कर्मचाऱ्यांना पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी

By admin | Updated: February 1, 2016 01:14 IST

विविध ठिकाणी कारवाई करण्यास गेल्यावर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण होते. अशा घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला असून, त्यांच्यात संताप व्यक्त होत आहे

भिवंडी : विविध ठिकाणी कारवाई करण्यास गेल्यावर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण होते. अशा घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला असून, त्यांच्यात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे मनपाकडून होणाऱ्या प्रत्येक कारवाईच्या वेळी कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी मनपा कर्मचारी संघटनेने केली आहे.महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना परिसरातील नागरिकांचा जमाव जमा होतो. त्यामधून काही अनुचित घटना घडण्याचा संभव असतो. तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटविताना तीनबत्ती व बागे फिरदोस येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला. वास्तविक, रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून मार्केट विभागातील फी वसुली ठेकेदार दररोज पावती फाडतात. ती केवळ एक दिवसासाठी असते. स्थानिक व बाहेरून आलेल्या फेरीवाल्यांकडून शहरात झालेला कचरा उचलण्यासाठी ही वसुली केली जाते. मात्र, काही राजकीय पुढाऱ्यांनी पावती म्हणजे रस्त्यावर बसण्याचा परवाना दिल्याचा गैरसमज फेरीवाल्यांमध्ये पसरवला आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकाम हटविताना तांत्रिक अधिकारी, शहर विकासप्रमुख तसेच उपायुक्त (अतिक्रमण) यांनी घटनास्थळी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. शहरात जागोजागी मनपाचे काही प्लंबर अनधिकृत जोडणी करीत आहेत. अशी जोडणी केलेल्या नागरिकांचे नळ तोडण्यास गेले असता विरोध होतो. (प्रतिनिधी)