शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:44 IST

अंबरनाथ : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या काळात अनेकांनी आपला रोजगार गमावल्याने पाणी बिल भरलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ...

अंबरनाथ : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या काळात अनेकांनी आपला रोजगार गमावल्याने पाणी बिल भरलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली आहे. लवकरच अभय योजना लागू करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.

अंबरनाथ शहराकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. अंबरनाथमधील प्राधिकरणाचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर गोरगरीब व कष्टकरी आहेत. कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. तुटपुंज्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. यामुळे काही ग्राहकांना पाणी बिल भरणे शक्य झालेले नाही. अशा ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू केल्यास मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसूल होण्यास मदत होईल, असे आ. डॉ. किणीकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले.

यापूर्वी डॉ. किणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे २०१४-१५ मध्ये अभय योजना लागू करण्यात आली होती. यामुळे प्राधिकरणाच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास डॉ. किणीकर यांनी व्यक्त केला.

------------फोटो

...........

वाचली