शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:44 IST

अंबरनाथ : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या काळात अनेकांनी आपला रोजगार गमावल्याने पाणी बिल भरलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ...

अंबरनाथ : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या काळात अनेकांनी आपला रोजगार गमावल्याने पाणी बिल भरलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली आहे. लवकरच अभय योजना लागू करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.

अंबरनाथ शहराकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. अंबरनाथमधील प्राधिकरणाचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर गोरगरीब व कष्टकरी आहेत. कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. तुटपुंज्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. यामुळे काही ग्राहकांना पाणी बिल भरणे शक्य झालेले नाही. अशा ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू केल्यास मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसूल होण्यास मदत होईल, असे आ. डॉ. किणीकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले.

यापूर्वी डॉ. किणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे २०१४-१५ मध्ये अभय योजना लागू करण्यात आली होती. यामुळे प्राधिकरणाच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास डॉ. किणीकर यांनी व्यक्त केला.

------------फोटो

...........

वाचली