शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

ओवळा-माजिवडा मतदारसंघातील आर.एम.सी. व खडी क्रशर प्लान्ट हटवण्याची मागणी 

By धीरज परब | Updated: February 14, 2023 17:08 IST

शहरी भागामध्ये  होणाऱ्या विविध विकास कामांसाठी तसेच बांधकाम प्रकल्पांसाठी आर.एम.सी. प्लान्टची गरज आहे ही वस्तूस्थिती असली तरी सुध्दा हे प्लान्ट उभारत असताना पर्यावरण विभागाने परवानगी देताना काही अटी घालणे आवश्यक आहे.

मीरारोड - प्रदूषण करणारे घोडबंदर - मीरारोड व नागला बंदर येथील आरएमसी तसेच खडी क्रशर प्लान्ट हलवण्याचे आदेश पर्यावरण विभागाने २०२१ साली देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 

शहरी भागामध्ये  होणाऱ्या विविध विकास कामांसाठी तसेच बांधकाम प्रकल्पांसाठी आर.एम.सी. प्लान्टची गरज आहे ही वस्तूस्थिती असली तरी सुध्दा हे प्लान्ट उभारत असताना पर्यावरण विभागाने परवानगी देताना काही अटी घालणे आवश्यक आहे. परंतू, पर्यावरण खात्याचे अधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ठाणे व मिरा-भाइर्दर महानगरपालिका हद्दीमध्ये भरवस्तीत आर.एम.सी. प्लान्ट उभारले जात आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. आरएमसी व खडी क्रशर मुळे होणाऱ्या प्रदूषण बाबत विधानसभेत डिसेम्बर २०२१ मध्ये लक्षवेधी सूचना मांडली असता त्यावेळी पर्यावरण खात्याच्या वतीने या सर्व प्रदुषण करणाऱ्या प्लान्टवर कारवाई करण्यासंदर्भात सुचना संबंधित विभागांना  देण्यात आल्या होत्या. 

परंतू, ठाणे जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रण महामंडळ व आर.एम.सी. प्लान्ट धारकांचे असलेल्या हितसंबंधांमुळे अद्यापपर्यंत या प्लान्टवर कुठल्याही प्रकारे कारवाई झालेली नाही.  त्यामुळे मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर गाव व आजूबाजूच्या परिसरामध्ये तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागला बंदर व भाइर्दरपाडा गावातील अनेक लोकांना श्वसनासह वेगवेगळ्या  आजारांना सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. प्रदूषण नियंत्रणाची व कारवाईची जबाबदार ज्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर आहे तेच अधिकारी भ्रष्टाचाराचे प्रदूषण पसरवून लोकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी खेळ करत आहेत. अश्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करावे अशी मागणी आ. सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधितांना केल्याचे सांगितले. 

ठाणे व मीरा भाइर्दर महानगरपालिका हद्दीतील नागरी वस्तीमध्ये सुरू असलेले आर.एम.सी. प्लान्ट महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर किमान २० कि.मी. अंतरापर्यंत स्थलांतरीत करण्याचे आदेश देण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.  

टॅग्स :thaneठाणे