शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

ओवळा-माजिवडा मतदारसंघातील आर.एम.सी. व खडी क्रशर प्लान्ट हटवण्याची मागणी 

By धीरज परब | Updated: February 14, 2023 17:08 IST

शहरी भागामध्ये  होणाऱ्या विविध विकास कामांसाठी तसेच बांधकाम प्रकल्पांसाठी आर.एम.सी. प्लान्टची गरज आहे ही वस्तूस्थिती असली तरी सुध्दा हे प्लान्ट उभारत असताना पर्यावरण विभागाने परवानगी देताना काही अटी घालणे आवश्यक आहे.

मीरारोड - प्रदूषण करणारे घोडबंदर - मीरारोड व नागला बंदर येथील आरएमसी तसेच खडी क्रशर प्लान्ट हलवण्याचे आदेश पर्यावरण विभागाने २०२१ साली देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 

शहरी भागामध्ये  होणाऱ्या विविध विकास कामांसाठी तसेच बांधकाम प्रकल्पांसाठी आर.एम.सी. प्लान्टची गरज आहे ही वस्तूस्थिती असली तरी सुध्दा हे प्लान्ट उभारत असताना पर्यावरण विभागाने परवानगी देताना काही अटी घालणे आवश्यक आहे. परंतू, पर्यावरण खात्याचे अधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ठाणे व मिरा-भाइर्दर महानगरपालिका हद्दीमध्ये भरवस्तीत आर.एम.सी. प्लान्ट उभारले जात आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. आरएमसी व खडी क्रशर मुळे होणाऱ्या प्रदूषण बाबत विधानसभेत डिसेम्बर २०२१ मध्ये लक्षवेधी सूचना मांडली असता त्यावेळी पर्यावरण खात्याच्या वतीने या सर्व प्रदुषण करणाऱ्या प्लान्टवर कारवाई करण्यासंदर्भात सुचना संबंधित विभागांना  देण्यात आल्या होत्या. 

परंतू, ठाणे जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रण महामंडळ व आर.एम.सी. प्लान्ट धारकांचे असलेल्या हितसंबंधांमुळे अद्यापपर्यंत या प्लान्टवर कुठल्याही प्रकारे कारवाई झालेली नाही.  त्यामुळे मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर गाव व आजूबाजूच्या परिसरामध्ये तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागला बंदर व भाइर्दरपाडा गावातील अनेक लोकांना श्वसनासह वेगवेगळ्या  आजारांना सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. प्रदूषण नियंत्रणाची व कारवाईची जबाबदार ज्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर आहे तेच अधिकारी भ्रष्टाचाराचे प्रदूषण पसरवून लोकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी खेळ करत आहेत. अश्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करावे अशी मागणी आ. सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधितांना केल्याचे सांगितले. 

ठाणे व मीरा भाइर्दर महानगरपालिका हद्दीतील नागरी वस्तीमध्ये सुरू असलेले आर.एम.सी. प्लान्ट महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर किमान २० कि.मी. अंतरापर्यंत स्थलांतरीत करण्याचे आदेश देण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.  

टॅग्स :thaneठाणे