शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

उल्हासनगरातील पूरग्रस्तांचे पंचनामे करण्याची मागणी

By सदानंद नाईक | Updated: July 26, 2023 17:26 IST

महापालिकेने ९०० पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.

उल्हासनगर : वालधुनी नदीचे पुराचे पाणी सखल भागातील झोपडपट्टी घुसल्याने, शेकडो जणांचे संसार उघडयावर आले होते. अश्या पूरबाधितांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीचे शिवाजी रगडे व माजी नगरसेविका सविता रगडे- तोरणे यांनी तहसिलदार यांना केले आहे.

उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचा फटका गेल्या १९ जुलै रोजी शहरातील भारतनगर, सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, रेणुका सोसायटी, आम्रपालीनगर हिराघाट, शांतीनगर येथील मातोश्रीनगर, राजीव गांधीनगर आदी ठिकाणच्या शेकडो घरात पुराचे पाणी घुसले होते.

महापालिकेने ९०० पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. पुराच्या पाण्याने, पूरग्रस्त नागरिकांच्या घरातील अन्नधान्य, कपडे, शालेय मुलांचे शैक्षणिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या आहेत. अश्या पूरग्रस्त नागरिकांच्या घराचे पंचनामे करून, नुकसान भरपाई करण्याची मागणी माजी नगरसेविका सविता तोरणे-रगडे व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी तहसीलदार कार्यालयाकडे केले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर