शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

शहापूर तालुका विभाजनाची मागणी

By admin | Updated: August 30, 2015 23:33 IST

भौगोलिक क्षेत्रफळ आणि लोकसंख्येने अन्य तालुक्यांच्या मानाने ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूरच्या विभाजनाच्या रखडलेल्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे

शहापूर: भौगोलिक क्षेत्रफळ आणि लोकसंख्येने अन्य तालुक्यांच्या मानाने ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूरच्या विभाजनाच्या रखडलेल्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. वाडा तालुक्याचे विभाजन करुन विक्रमगड तालुका झाला तेंव्हा, तसेच जिल्ह्याचे विभाजन करुन नवीन पालघर जिल्हा स्थापन केला तेंव्हा देखिल शहापूरचेही विभाजन अपेक्षीत मानले जात होते. मात्र धुरंधर राजकीय नेतृत्वाची उणीव असल्याने या मागणीकडे दुर्लक्षच करण्यात आले.ठाणे जिल्ह्याचे आता पुन्हा दुसर्यांदा होऊ घातलेले विभाजन राज्य शासनाकडे प्रस्तावित आहे. कल्याण या नव्या जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी केली जात आहे. अशावेळी शहापूरचे रखडलेले विभाजन येथील जनतेला होईल असे वाटू लागले आहे. विभाजनातला संभाव्य तालुका म्हणून किन्हवली, कसारा, खर्डी, वासिंद या मध्यवर्ती ठिकाणांची नावे गेली पंचवीस वर्षे चर्चेत आहेत. पण शहापूरचे विभाजन काही झाले नाही. परंतु किन्हवली तालुका करण्याच्या मागणीने जोर धरल्यानंतर किरण निचिते यांनी वासिंद तालुका करण्याची तर दिलीप अधिकारी, बबन शेलवले यांनी खर्डी तालुक्याची मागणी पुढे रेटली आहे. नुकतेच किन्हवलीतील रहीवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा तालुका विभाजनाच्या मागणीला तोंड फोडले आहे. नवीन किन्हवली तालुका करतांना मुरबाड तालूक्यातील सरळगांव, टोकावडे भागातील गावांचा समावेश करता येऊ शकतो, खर्डी अथवा कसारा तालुका झाल्यास लगतच्या वाडा, मोखाडा तालुक्यातील आदिवासी, दुर्गम गांवे, वस्त्यांना न्याय मिळेल असे मानले जात आहे, तर वासिंद हा कल्याणच्या ग्रामिण भागातील गावांसह मध्यवर्ती तालुका होऊ शकतो. पण तो होणार कधी ?