शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

बोगस जमीन व्यवहाराच्या चौकशीची मागणी

By admin | Updated: July 5, 2017 06:17 IST

शहापूर तालुक्यातील डोळखांब विभागामध्ये १९९५ पासून भूमाफियांनी महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, खोटे शेतकरी आणि दस्तावेज

लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हवली : शहापूर तालुक्यातील डोळखांब विभागामध्ये १९९५ पासून भूमाफियांनी महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, खोटे शेतकरी आणि दस्तावेज तयार करून गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर विकल्या आहेत, असे बाधित शेतकरी कायदेशीर लढाई लढत आहेत. असे शेकडो व्यवहार तालुक्यात केवळ डोळखांब विभागात झाले आहेत. या संपूर्ण बोगस प्रकरणांची सखोल चौकशी करून हे सर्व बोगस व्यवहार रद्द करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते केशव भेरे यांनी केली. अशा असंख्य प्रकरणांचा उलगडा करताना त्यांनी पुराव्यानिशी दाखवून दिले. शेतकऱ्यांची संमती नसताना यापूर्वी जमिनी कशा हस्तांतरित झाल्या, याचेही दाखले भेरे यांनी दिले. २००० पूर्वी कोणत्याही खरेदीसाठी कूलमुखत्यारपत्र बनवताना शेतकऱ्यांचे फोटो आवश्यक नव्हते. तसेच दस्तावेजावर सह्या स्टॅम्पव्हेंडरकडे घेतल्या जायच्या. त्यांच्यावरच विश्वासून नायब तहसीलदार डोळे झाकून सह्या करायचे. यासाठी लागणारे साक्षीदारही दलालांचीच माणसे असायची. ते शेतकऱ्यांना ओळखतही नव्हते. अशी एक ना अनेक उदाहरणे त्यांच्याकडे आहेत.हा व्यवहार संपूर्णपणे बोगस असल्याची कागदपत्रे डोळ्यांसमोर असताना तहसीलदारांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे सोडून फेरफार नोंदवण्याचे आदेश दिल्याने शंका निर्माण होत आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यासाठी भेरे यांनी शहापूरचे तहसीलदार आणि भिवंडी प्रांत यांच्याकडे १९९७ मध्ये तक्रार केली. त्यानंतर, २००१ मध्ये दुसरी तक्रार केली. परंतु, त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर, २००२ मध्ये पुन्हा स्मरणपत्र दिले. मात्र, त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’!ज्या मालकाच्या जमिनीचा बोगस व्यवहार झाला आहे, त्या मालकाला समोरची व्यक्ती जमीन परत द्यायला तयार असेल आणि कोणाची हरकत नसेल, तर संगनमताने प्रकरण मिटवण्यासाठी कायद्यात तशी तरतूद आहे. तसे होत नसेल तर मूळ मालकाने फौजदारी गुन्हा दाखल करावा. आम्ही अजून फेरफार नोंदवले नाहीत. - डी.बी. आहिरे, मंडळ अधिकारी, डोळखांबयासारखे असंख्य बोगस व्यवहार डोळखांब विभागात झाले आहेत. त्यासंदर्भातील बहुतेक प्रकरणे शहापूर तहसील आणि भिवंडी प्रांत कार्यालयात प्रलंबित आहेत. गरीब शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रकरणांची चौकशी होऊन शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना लवकरात लवकर परत मिळाव्यात. - केशव भेरे, सामाजिक कार्यकर्ते