शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बोगस जमीन व्यवहाराच्या चौकशीची मागणी

By admin | Updated: July 5, 2017 06:17 IST

शहापूर तालुक्यातील डोळखांब विभागामध्ये १९९५ पासून भूमाफियांनी महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, खोटे शेतकरी आणि दस्तावेज

लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हवली : शहापूर तालुक्यातील डोळखांब विभागामध्ये १९९५ पासून भूमाफियांनी महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, खोटे शेतकरी आणि दस्तावेज तयार करून गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर विकल्या आहेत, असे बाधित शेतकरी कायदेशीर लढाई लढत आहेत. असे शेकडो व्यवहार तालुक्यात केवळ डोळखांब विभागात झाले आहेत. या संपूर्ण बोगस प्रकरणांची सखोल चौकशी करून हे सर्व बोगस व्यवहार रद्द करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते केशव भेरे यांनी केली. अशा असंख्य प्रकरणांचा उलगडा करताना त्यांनी पुराव्यानिशी दाखवून दिले. शेतकऱ्यांची संमती नसताना यापूर्वी जमिनी कशा हस्तांतरित झाल्या, याचेही दाखले भेरे यांनी दिले. २००० पूर्वी कोणत्याही खरेदीसाठी कूलमुखत्यारपत्र बनवताना शेतकऱ्यांचे फोटो आवश्यक नव्हते. तसेच दस्तावेजावर सह्या स्टॅम्पव्हेंडरकडे घेतल्या जायच्या. त्यांच्यावरच विश्वासून नायब तहसीलदार डोळे झाकून सह्या करायचे. यासाठी लागणारे साक्षीदारही दलालांचीच माणसे असायची. ते शेतकऱ्यांना ओळखतही नव्हते. अशी एक ना अनेक उदाहरणे त्यांच्याकडे आहेत.हा व्यवहार संपूर्णपणे बोगस असल्याची कागदपत्रे डोळ्यांसमोर असताना तहसीलदारांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे सोडून फेरफार नोंदवण्याचे आदेश दिल्याने शंका निर्माण होत आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यासाठी भेरे यांनी शहापूरचे तहसीलदार आणि भिवंडी प्रांत यांच्याकडे १९९७ मध्ये तक्रार केली. त्यानंतर, २००१ मध्ये दुसरी तक्रार केली. परंतु, त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर, २००२ मध्ये पुन्हा स्मरणपत्र दिले. मात्र, त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’!ज्या मालकाच्या जमिनीचा बोगस व्यवहार झाला आहे, त्या मालकाला समोरची व्यक्ती जमीन परत द्यायला तयार असेल आणि कोणाची हरकत नसेल, तर संगनमताने प्रकरण मिटवण्यासाठी कायद्यात तशी तरतूद आहे. तसे होत नसेल तर मूळ मालकाने फौजदारी गुन्हा दाखल करावा. आम्ही अजून फेरफार नोंदवले नाहीत. - डी.बी. आहिरे, मंडळ अधिकारी, डोळखांबयासारखे असंख्य बोगस व्यवहार डोळखांब विभागात झाले आहेत. त्यासंदर्भातील बहुतेक प्रकरणे शहापूर तहसील आणि भिवंडी प्रांत कार्यालयात प्रलंबित आहेत. गरीब शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रकरणांची चौकशी होऊन शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना लवकरात लवकर परत मिळाव्यात. - केशव भेरे, सामाजिक कार्यकर्ते