शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

मीरा भाईंदरमध्ये नवे निर्बंध धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST

मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढू लागला असतानाच अनेक बेजबाबदार नागरिक व काही नगरसेवक कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जारी ...

मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढू लागला असतानाच अनेक बेजबाबदार नागरिक व काही नगरसेवक कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जारी केलेल्या निर्देशांचे पालन करीत नाहीत. आता पोलीस व महापालिकेने संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा काही नवे निर्बंध लागू केले आहेत; परंतु बेजबाबदार लोकांवर कठोर कारवाई कधी करणार, असा सवाल निर्देशांचे पालन करणाऱ्या नागरिकांनी केला आहे .

शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क घालणे, गर्दी टाळणे, आदी निर्देशांचे पालनच केले जात नाही . शहरातच नव्हे तर अगदी पालिका मुख्यालयातही मास्क न घालणारे वा अर्धवट घालणारे नगरसेवक, राजकीय पदाधिकारी मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर पालिका आणि पोलीस कारवाई करत नाहीत.

पोलीस व महापालिकेने रात्री ८ ते सकाळी ७ दरम्यान जमावबंदी लागू केली आहे. १५ एप्रिलपर्यंत शहरात मनाई आदेश लागू आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. या कालावधीत विनाकारण फिरणारे किंवा दुकाने, हॉटेल, बार खुले ठेवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे .

शहरातील आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. महापालिकेची उद्याने, मैदाने केवळ सकाळी ७ ते सकाळी ११ दरम्यानच खुली राहणार आहेत. पालिका कार्यालयांमध्ये केवळ लोकप्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे. नागरिकांना प्रवेश बंद केला असून, ज्यांना बैठकीसाठी बोलावले आहे, त्यांना विशेष पास दिला जाणार आहे.

मास्क सक्तीचा करण्यात आला असून, मास्क न घालणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड वसुली केली जाणार आहे. शॉपिंग मॉल्समध्ये प्रवेश करण्यापूर्वी मास्क व शारीरिक तापमान तपासणे गरजेचे केले आहे.

.........