शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण भरण्यास यंदा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील सहा मनपा, उद्याेग, कारखाने आणि गावपाड्यांना पाणीपुरवठा करणारे बारवी धरण गेल्या वर्षी १ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील सहा मनपा, उद्याेग, कारखाने आणि गावपाड्यांना पाणीपुरवठा करणारे बारवी धरण गेल्या वर्षी १ सप्टेंबरला १०० टक्के भरले होते. जिल्ह्यात यंदा पावसाने कहर करून जनजीवन विस्कळीत करूनही यंदा मात्र बारवी धरण अजूनपर्यंतही भरले नसून, अवघा ९५ टक्के पाणीसाठा झाल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

शहरांसह गावखेड्यांतील रहिवासी आणि शेतकऱ्यांना जुलैतील अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहले. यांच्या पुराचे पाणी खाडीला भरती असल्यामुळे निवासी भागात, घरांमध्ये शिरल्याने रहिवाशांना घरांच्या छतांवर रात्रंदिवस बसावे लागले आहे. यादरम्यान मात्र बारावी धरणाच्या पाणलोटात कमी पाऊस पडल्यामुळे त्यात १०० टक्के पाणीसाठा तयार झाला नाही. यामुळे १ सप्टेंबरपूर्वी धरण भरण्याचा अंदाज मात्र फोल ठरला आहे.

मुसळधार पावसाचा अंदाज असतानाही तो बहुधा गेल्या काही दिवसांपासून फोल ठरत आहे. त्यामुळे बारवी धरणात आज रोजी ९५ टक्के पाणीसाठा आहे. या धरणाची पाणीपातळी अवघी ७२.०१ मीटर तयार झाली. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ७२.५७ मीटर पाणीपातळी होती. गेल्या वर्षी ३३७.६५ घनमीटर पाणीसाठा असलेल्या या बारवी धरणात शनिवारी ३१८.३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.

या धरणात गेल्या सरासरी २२६६ मिमी पाऊस पडला होता. मात्र, यंदा सरासरी १९८४ मिमी पाऊस पडला आहे. दस्तुरखुद्द धरणात सरासरी अवघा १९७८ मिमी पाऊस पडला, तर या धरणाच्या पाणलोटापैकी खानिवरे या पाणलोटात सरासरी २७२८ मिमी, कान्होळला २०९५ मिमी, पाटगावला २०२३ मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २३४२ मिमी पाऊस पडलेला आहे. या धरणात गेल्या पाच वर्षांतील सरासरी २२०.६१ दशलक्ष घनमीटर मीटर पाणीसाठा होता. यामध्ये २०१६ ला २३३.०७ दशलक्ष घनमीटर, २०१७ ला २२९.९० आणि २०१८ व २०१९ या दोन्ही वर्षी २२९.८७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता.