शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अतिवृष्टीतील ८०० हेक्टर शेतीच्या नुकसानभरपाईला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात जुलै महिन्यात तब्बल ९०० मिमी. पाऊस झाला आहे. या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने ७८२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात जुलै महिन्यात तब्बल ९०० मिमी. पाऊस झाला आहे. या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने ७८२ हेक्टर शेतजमिनीसह पिके फळबागांचे नुकसान झाले आहे. याचा फटका जिल्हाभरातील दोन हजार ९०८ शेतकऱ्यांना बसला आहे. या नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांना आजघडीला मिळणे गरजेचे आहे. मात्र, त्यास विलंब झाला आहे. त्यामुळे या रकमेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या या शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात पावसामुळे आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सहा जण जुलैतील शेवटच्या आठवड्यामधील अतिवृष्टीने दगावले आहेत. या प्रत्येक मयताच्या वारसाला मात्र शासनाने तत्काळ पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. पण याच अतिवृष्टीत जिल्ह्यातील ७८२ हेक्टरवरील शेतीच्या नुकसानीकडे शासनाने अजूनही लक्ष दिले नाही. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी लाखो रुपयांच्या नुकसानभरपाईच्या रकमेपासून वंचित आहेत.

अतिवृष्टीने भातपिकासह फळबागा आणि शेतजमीन वाहून गेली आहे. शेताची बांधबंदिस्ती फुटली आहे. त्यामुळे शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने शेतात ओव्हळ पडले आहेत. शेत नापीक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. या अतिवृष्टीत तब्बल ६७३.५ हेक्टरवरील भातपिकाच्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यास बसलेला आहे. या दरम्यान ०.५ हेक्टर बागायत, फळबाग वाहून गेली. जिल्ह्याभरातील ९० हेक्टर शेतीचे बांध फुटले आहेत. याशिवाय हाताशी आलेल्या १८ हेक्टरवरील भाजीपाल्याचे या अतिवृष्टीत नुकसान झाले आहे.

----------