शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीतील ८०० हेक्टर शेतीच्या नुकसानभरपाईला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात जुलै महिन्यात तब्बल ९०० मिमी. पाऊस झाला आहे. या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने ७८२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात जुलै महिन्यात तब्बल ९०० मिमी. पाऊस झाला आहे. या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने ७८२ हेक्टर शेतजमिनीसह पिके फळबागांचे नुकसान झाले आहे. याचा फटका जिल्हाभरातील दोन हजार ९०८ शेतकऱ्यांना बसला आहे. या नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांना आजघडीला मिळणे गरजेचे आहे. मात्र, त्यास विलंब झाला आहे. त्यामुळे या रकमेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या या शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात पावसामुळे आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सहा जण जुलैतील शेवटच्या आठवड्यामधील अतिवृष्टीने दगावले आहेत. या प्रत्येक मयताच्या वारसाला मात्र शासनाने तत्काळ पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. पण याच अतिवृष्टीत जिल्ह्यातील ७८२ हेक्टरवरील शेतीच्या नुकसानीकडे शासनाने अजूनही लक्ष दिले नाही. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी लाखो रुपयांच्या नुकसानभरपाईच्या रकमेपासून वंचित आहेत.

अतिवृष्टीने भातपिकासह फळबागा आणि शेतजमीन वाहून गेली आहे. शेताची बांधबंदिस्ती फुटली आहे. त्यामुळे शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने शेतात ओव्हळ पडले आहेत. शेत नापीक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. या अतिवृष्टीत तब्बल ६७३.५ हेक्टरवरील भातपिकाच्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यास बसलेला आहे. या दरम्यान ०.५ हेक्टर बागायत, फळबाग वाहून गेली. जिल्ह्याभरातील ९० हेक्टर शेतीचे बांध फुटले आहेत. याशिवाय हाताशी आलेल्या १८ हेक्टरवरील भाजीपाल्याचे या अतिवृष्टीत नुकसान झाले आहे.

----------