शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

काळाबाजार थांबवणाऱ्या बायोमेट्रीकला विलंब

By admin | Updated: October 26, 2015 00:50 IST

शिधावाटप (रेशनिंग) दुकानांवरील धान्य, रॉकेल, साखरेसह अन्नधान्याचा काळाबाजार थांबवण्यासाठी ‘बायोमेट्रीक सिस्टीम’ची तयारी पूर्ण झाली आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेशिधावाटप (रेशनिंग) दुकानांवरील धान्य, रॉकेल, साखरेसह अन्नधान्याचा काळाबाजार थांबवण्यासाठी ‘बायोमेट्रीक सिस्टीम’ची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, त्याच्या अंमलबजावणीस विलंब होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत. यासाठी दोन टप्प्यांमध्ये कामाचे नियोजन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सगळ्या शिधापत्रिकांची संगणकीय नोंद करण्यात आली. भारत सरकारचा खाद्य निगम विभाग ते तालुकास्तरावर होणाऱ्या धान्यवाहतुकीचे संगणकीकरण, पुरवठा विभागाच्या विविध कार्यालयांचे संगणकीकरण झाल्याचे सांगितले जात आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात एफपीएस अ‍ॅटोमेशन म्हणजे प्रत्येक शिधावाटप दुकानावर बायोमेट्रीक यंत्र बसवणे अपेक्षित आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे ५५४ शिधावाटप धान्य दुकाने आहेत. त्यावरील सुमारे एक लाख ९५ हजार कार्डधारकांच्या शिधापत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाले आहे. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रेशनिंग दुकाने असून त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांचीदेखील सर्व प्रकारची तपासणी, नोंदणी आधीच पार पडली आहे. यामध्ये विशेषत: आधारकार्ड, बँक खाते क्रमांक, मोबाइल नंबर यांचीही नोंद झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे गोरगरीब भरडले जात आहेत. यावर पर्याय म्हणून रेशनिंग दुकानांत जावे तर तेथे नेहमीप्रमाणे कोटा आला नसल्याचे उत्तर त्याला मिळते. त्यामुळे कार्डधारक मोठ्या विवंचनेत सापडले आहेत. बायोमेट्रीक लागू झाले असते तर त्याचे धान्य त्यास महिनाभरात कधीही घेता आले असते. यामुळेच बायोमेट्रीक सिस्टीम लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्वस्त धान्य दुकानांवर केंद्र तसेच राज्य शासनाव्दारे शिधापत्रिकाधारकांना जीवनावश्यक अन्नधान्य, खाद्यतेल, रॉकेल, गहू, तांदूळ, साखर स्वस्तात मिळणे अपेक्षित आहे. डाळीचे भाव वाढल्यामुळे गोरगरिबांच्या तोंडचा डाळभातही हिरावला गेला. यावर, मात करण्यासाठी रेशनवर सवलतीच्या दराने कार्डधारकांना डाळी मिळण्यासाठी उपाय करण्याची गरज आहे.