शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन आदेशानुसार बदल्या होऊन शिक्षक हजर होण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 18:12 IST

ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यात समान शिक्षक ठेवून बदल्या करण्याचे न्यायालयीन आदेश आहेत. त्यानुसार बदल्या करण्यात आल्या. पालघरकडून सुमारे १८ शिक्षक ठाणे जिल्ह्यात येणार होते. तर ठाण्याचे ४० शिक्षकांच्या पालघरला बदल्या झाल्या होत्या. यातीलही सुमारे २५ शिक्षक पालघरला हजर झाले नाही. पालघरचेही ठाण्यात आले नाही. मात्र काही शिक्षक न्यायालयात गेल्यामुळे त्यावर सुनावणी सुरू आहे. सुमारे आठ दिवसात शिक्षकांच्या या बदल्याचा हा प्रश्न निकाली निघण्याची अपेक्षा ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी लोकमतला सांगितले.

ठळक मुद्देसुमारे चार महिने होऊन ही पालघरचे शिक्षक जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये हजर झाले नाहीन्यायालयीन आदेशाचे उलंगनविरोधात प्रामाणीकपणे हजर झालेले शिक्षक मात्र न्यायालयाचा दरवाजा थोटावण्याच्या तयारीत

ठाणे : न्यायालयीन आदेशानुसार ठाणे व पालघर जिल्हह्यातील बदल्या एकाच वेळी झाल्या. सुमारे चार महिने होऊन ही पालघरचे शिक्षक जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये हजर झाले नाही.न्यायालयीन आदेशाचे उलंगन करणाऱ्या या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडून होत आहे.ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यात समान शिक्षक ठेवून बदल्या करण्याचे न्यायालयीन आदेश आहेत. त्यानुसार बदल्या करण्यात आल्या. पालघरकडून सुमारे १८ शिक्षक ठाणे जिल्ह्यात येणार होते. तर ठाण्याचे ४० शिक्षकांच्या पालघरला बदल्या झाल्या होत्या. यातीलही सुमारे २५ शिक्षक पालघरला हजर झाले नाही. पालघरचेही ठाण्यात आले नाही. मात्र काही शिक्षक न्यायालयात गेल्यामुळे त्यावर सुनावणी सुरू आहे. सुमारे आठ दिवसात शिक्षकांच्या या बदल्याचा हा प्रश्न निकाली निघण्याची अपेक्षा ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी लोकमतला सांगितले.शिक्षकांच्या या बदल्यांच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर शिक्षण विभाग मात्र त्याविरोधात मूग गिळून आहे. यात मात्र गावखेड्यातील गरीब, कष्ठकरी, शेतकºयांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास विलंब करणाºया या शिक्षकांवर कडक कारवाईची मागणी देखील सदस्यांनी सर्वसाधारण सभेत लावून धरली. मात्र अद्यापही प्रशासनाकडून त्यावर उपाययोजना केली नसल्याचे उघड झाले.आहे. या मनमानी शिक्षकांवर कारवाईची मागणीही त्यांच्याकडून होत आहे. शहापूर, भिवंडी आदी तालुक्यातील शिक्षक संबंधीत शाळांवर हजर न झाल्यामुळे त्यांच्याकडून न्यायालयीन आदेशाचे उलंगन झाले. या विरोधात प्रामाणीकपणे हजर झालेले शिक्षक मात्र न्यायालयाचा दरवाजा थोटावण्याच्या तयारी आहेत.मुरबाड तालुक्यात एक शिक्षक व तीन केंद्र प्रमुख हजर झाले नाही. त्यांना या तालुक्यात यायचे नसल्यामुळे त्यांनी येण्यास नकार दिला. अंशकालीन बदल्यांच्या नावाखाली या केंद्र प्रमुखांच्या बदल्या रद्द होण्याची शक्यता मुरबाड गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड यांनी सांगितले. या केंद्र प्रमुखांमुळे मुरबाड पंचायत समितीच्या नियंत्रणातील टोकावडे, माळ व किशोर केंद्रांतील सुमारे ६० शाळांवरील नियंत्रणाची समस्या उद्भवली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी देखील सदस्यांसह नागरिकांकडून सतत होत आहे.

टॅग्स :thaneठाणेzp schoolजिल्हा परिषद शाळा