शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी येत नाही अन् बोलणार पण नाही" असं म्हणणाऱ्या भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा भाजपात प्रवेश
2
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
3
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
4
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
5
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
6
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन
7
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
8
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
9
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
10
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
11
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
12
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
13
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
14
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
15
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
16
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
17
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
18
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
19
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
20
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल

‘बेकायदा बांधकामे नियमित करणे हा अवमान’

By admin | Updated: March 14, 2016 01:41 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांप्रकरणी उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट याचिकेच्या सुनावणीच्या वेळी यापुढे कोणतेही बांधकाम नियमित करण्यात येऊ नये

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांप्रकरणी उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट याचिकेच्या सुनावणीच्या वेळी यापुढे कोणतेही बांधकाम नियमित करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले असताना राज्य सरकार बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय कसा घेऊ शकते. सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे राजकीय हेतूने घेतला आहे. या निर्णयाने उच्च न्यायालयाचा अवमान होणार असल्याचा दावा याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले यांनी केला आहे. डिसेंबर २०१५ पूर्वीची ठाणे जिल्ह्यातील २ लाख बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील ६७ हजार बांधकामांचा समावेश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. गोखले यांच्या याचिकेवर २८ जानेवारी २००८ रोजी उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते की, महापालिका क्षेत्रातील कोणतेही बेकायदा बांधकाम नियमित करण्यात येऊ नये. महापालिकेने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मनपा क्षेत्रात ६७ हजार बेकायदा बांधकामे असल्याची माहिती दिली होती.नियोजन नसताना निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ट असताना असा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही. कारण, कायदे पूर्वलक्षीप्रभावाने तयार करता येत नाहीत. पुढे होणारी बेकायदा बांधकामे रोखता येऊ शकतात. मागील काळात झालेल्या बेकायदा बांधकामांचे काय करणार, हे आधी स्पष्ट करावे लागेल. २०१० सालच्या अहवालानुसार सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता कल्याण-डोंबिवलीत होती. दरएकरी जागेत १७०० लोक राहत असल्याचा अहवाल होता. इतक्या जास्त घनतेच्या शहरात सोयीसुविधा पुरविल्या गेलेल्या नसताना बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेऊन काय साध्य होणार, असा सवाल गोखले यांनी केला. उल्हासनगरच्या धर्तीवर माणुसकीच्या नावाखाली ही बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात उल्हासनगरात काय झाले, हे सगळ्यांनाच माहीत आहे. २००६ साली राज्य सरकारने विशेष अध्यादेश काढून बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. प्रत्यक्षात एकही बांधकाम नियमित झालेले नाही. कल्याण-डोंबिवली महापालिका नागरिकांना पुरेशा नागरी सोयीसुविधा पुरवू शकत नाही.अस्तित्वात असलेल्या सुविधा अपुऱ्या आहेत. सुविधांची वानवा असून सात लाख लोकवस्तीला पुरेल इतकाच पाणीसाठा असताना त्यावर १५ लाख लोकसंख्येची तहान भागवली जाते. त्यातून पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. घनकचऱ्याचा प्रकल्प महापालिका उभारू शकलेली नाही. तसेच कचरा ओला व सुका असे वर्गीकृत पद्धतीने गोळा करू शकली नाही. पुरेशी प्रसाधनगृहे महापालिका उभारू शकलेली नाही. अस्वच्छ शहर असा शहराचा लौकिक आहे. परिवहन सेवा सक्षम नाही. शहराला पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. एखाद्या गल्लीत रुग्णवाहिका शिरत नाही. साधे स्ट्रेचरवरून आजारी व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवणे जिकिरीचे होते. अशा परिस्थितीत बेकायदा बांधकामे नियमित केल्याने नागरी सुविधांवर नक्कीच ताण येणार आहे.