शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ठाण्यातील वाचक कट्टयावर रंगली काव्य दीपावलीची मैफिल, रसिकांना मिळाला कवितांचा फराळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 16:37 IST

ठाण्यातील वाचक कट्ट्यावरील प्रेक्षकांना दीपावली निमित्त काव्य मैफिलीतून रसिकांना कवितांचा फराळ मिळाला. 

ठळक मुद्देवाचक कट्टयावर रंगली काव्य दीपावलीची मैफिलरसिकांना मिळाला कवितांचा फराळ माणसाला माणूस म्हणून वागणूक द्यावी - नाकती

ठाणे : अवघ्या काहीच दिवसांवर दिवाळी आली असून घरोघरी फराळ बनवायला सुरवात झाली आहे. पण हा फराळ जरा वेगळा आहे.या फराळात कविता ऐकण्यास मिळाल्या. वाचक कट्टयावर काव्य दीपावली अर्थात दिवाळीचा काव्यात्मक फराळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा हा २२ क्रं चा वाचक कट्टा होता.यावेळी रसिक प्रेक्षकांची गर्दी जमली होती.

    यावेळी वाचक कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांनी पूल देशपांडे लिखित "भरलेला खिसा" हि वास्तववादी कविता सादर केली. जीवन जगत असताना आर्थिक निकष कसे महत्वाचे ठरतात, माणसे परिस्तिथीनुसार कशी बदलतात तसेच या सर्वात मैत्री हीच अशी गोष्ट आहे जी शेवटपर्यंत टिकते असे या कवितेत सांगण्यात आले. विं.दा. करंदीकर लिखित "आयुष्याला द्यावे उत्तर" या कवितेतून जीवनाकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन आणि वागण्यातला निर्भीडपणा मांडण्यात आले. "बायको जेव्हा बोलत असते" या कवितेच्या माध्यमातून समस्त पुरुष जातीच्या वेदना विनोदी ढंगाने मांडण्यात आल्या. "कणा" हि कविता यावेळी खास आकर्षण ठरली, आपल्या कढील सर्व काही उध्वस्त झालेले असताना देखील जगण्याची नवी उमेद देणारी कविता म्हणजे कणा होय.अनेक समस्यांना सामोरं जात इथपर्यंतचा आपला खडतर प्रवास नाकती यांनी या कवितेच्या साहाय्याने मांडला. साध्याच्या वास्तवावर प्रखरपणे भाष्य करणारी "लाल रंग" ही स्वलिखित कविता सादर करत माणुसकीच्या बोथट झालेल्या भिंती व माणसांचे बदलते चेहरे यावर भाष्य करण्यात आले.एखाद्या अपघाताच्या वेळी रुग्णाला रक्त देताना आपण जात पाहतो का? मग इतर वेळी का आपण वेगवेगळ्या रंगात विभागले गेलो अहोत? असा प्रश्न या सादरीकरणातून विचारण्यात आला.  माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली तरच एकमेकांतिल अंतर व समाजातील जातीपातीच्या भिंती नष्ट होतील व सर्वधर्म समभाव ही भावना रुजू होईल असे नाकती म्हणाले. यावेळी साधना ठाकूर,गौरी ठाकूर यांनी गुलजार जिच्या कविता सादर केल्या.शुभांगी भालेकर यांनी पाणी व प्राणी,सहदेव कोळंबकर याने असा असावा तो,कुंदन भोसले याने दिवाळीच्या कविता,मौसमी घाणेकर यांनी काव्यांजली,रोशनी उंबरसाडे हीने कालयुग इत्यादी कवीता सादर केल्या. वैभव चव्हाण,रुक्मिणी कदम,महेश झिरपे,वैभव पवार,प्रथमेश मंडलीक, ओमकार मराठे, उत्तम ठाकूर,साक्षी महाडिक,माधुरी कोळी, अच्युत वाकडे यांनी देखील यावेळी विविध विषयांवर कवीता सादर केल्या. कट्ट्याचे निवेदन राजन मयेकर यांनी केले. दीपप्रज्वलन जेष्ठ प्रेक्षक वाकडे यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई