शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

गटारातील पाइपगळतीवर भागते तहान

By admin | Updated: February 4, 2016 01:56 IST

पूर्वेकडील गोखीवरे-वालीव परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून तहान भागवण्यासाठी येथील शेकडो लोक गटारातून जाणाऱ्या पाईपलाईनच्या गळतीमधून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत

वसई : पूर्वेकडील गोखीवरे-वालीव परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून तहान भागवण्यासाठी येथील शेकडो लोक गटारातून जाणाऱ्या पाईपलाईनच्या गळतीमधून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत. गटारात उतरून मिळेत तेवढे पाणी भरण्यासाठी याठिकाणी चोवीस तास लोक रांगा लावून उभे असलेले पहावयास मिळते. नालासोपारा आणि वसईच्या पूर्वेकडे बेकायदा चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या पाण्यासाठी आजही वणवण भटकावे लागत आहे. महापालिकेकडून नळ कनेक्शन मिळत नसल्याने मिळेत तिथून पाणी आणण्यासाठी लोक रस्त्यावरून फिरताना पहावयास मिळतात. गोखीवरे रेंज नाका परिसरात तर गटारातून पाणी भरले जात आहे. याठिकाणाहून नवघर-माणिकपूर शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन जाते. रस्ता रुंदीकरण झाल्याने गटारे नव्याने बांधली गेली आहेत. त्या गटारांमधून ही मुख्य पाईपलाईन जाते. त्यावर आता फुटपाथ बांधण्यात आले आहेत. फुटपाथवरील मेन होलची झाकणे गायब झाली आहेत. त्या होलमधून लोक गटारात शिरतात. गटारातून जाणारी पाईपलाईन लिकेज असल्याने काही ठिकाणी पाणी गळती असते. ते पाणी घेण्यासाठी लोकांची चोवीस तास रांग लागलेली दिसते. पुरुष, महिला आणि लहान मुले प्लॅस्टिकचे ड्रम आणि हंडे घेऊन पाण्यासाठी रांग लावून उभे असतात. जसा नंबर येईल त्यानुसार घरातील एक व्यक्ती गटारात उतरून आतून पाणी भरुन वर असलेल्या आपल्या माणसाकडे देताना दिसते. ही पाईपलाईन गटारातून जात असून गेल्या काही महिन्यांपासून तिला गळती लागली आहे. पण, पालिकेकडून तिची दुरुस्ती केली जात नसल्याने लोक येथील पाणी नेत आहे. दुसरीकडे, गटारातच लिकेज असल्याने पाण्यामध्ये गटाराचे दूषित पाणी शिरत असण्याचाही धोका आहे. त्यामुळे हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्याण झाला आहे. (प्रतिनिधी)