शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

गटारातील पाइपगळतीवर भागते तहान

By admin | Updated: February 4, 2016 01:56 IST

पूर्वेकडील गोखीवरे-वालीव परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून तहान भागवण्यासाठी येथील शेकडो लोक गटारातून जाणाऱ्या पाईपलाईनच्या गळतीमधून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत

वसई : पूर्वेकडील गोखीवरे-वालीव परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून तहान भागवण्यासाठी येथील शेकडो लोक गटारातून जाणाऱ्या पाईपलाईनच्या गळतीमधून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत. गटारात उतरून मिळेत तेवढे पाणी भरण्यासाठी याठिकाणी चोवीस तास लोक रांगा लावून उभे असलेले पहावयास मिळते. नालासोपारा आणि वसईच्या पूर्वेकडे बेकायदा चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या पाण्यासाठी आजही वणवण भटकावे लागत आहे. महापालिकेकडून नळ कनेक्शन मिळत नसल्याने मिळेत तिथून पाणी आणण्यासाठी लोक रस्त्यावरून फिरताना पहावयास मिळतात. गोखीवरे रेंज नाका परिसरात तर गटारातून पाणी भरले जात आहे. याठिकाणाहून नवघर-माणिकपूर शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन जाते. रस्ता रुंदीकरण झाल्याने गटारे नव्याने बांधली गेली आहेत. त्या गटारांमधून ही मुख्य पाईपलाईन जाते. त्यावर आता फुटपाथ बांधण्यात आले आहेत. फुटपाथवरील मेन होलची झाकणे गायब झाली आहेत. त्या होलमधून लोक गटारात शिरतात. गटारातून जाणारी पाईपलाईन लिकेज असल्याने काही ठिकाणी पाणी गळती असते. ते पाणी घेण्यासाठी लोकांची चोवीस तास रांग लागलेली दिसते. पुरुष, महिला आणि लहान मुले प्लॅस्टिकचे ड्रम आणि हंडे घेऊन पाण्यासाठी रांग लावून उभे असतात. जसा नंबर येईल त्यानुसार घरातील एक व्यक्ती गटारात उतरून आतून पाणी भरुन वर असलेल्या आपल्या माणसाकडे देताना दिसते. ही पाईपलाईन गटारातून जात असून गेल्या काही महिन्यांपासून तिला गळती लागली आहे. पण, पालिकेकडून तिची दुरुस्ती केली जात नसल्याने लोक येथील पाणी नेत आहे. दुसरीकडे, गटारातच लिकेज असल्याने पाण्यामध्ये गटाराचे दूषित पाणी शिरत असण्याचाही धोका आहे. त्यामुळे हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्याण झाला आहे. (प्रतिनिधी)