शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प : जमीन संपादनाविरुद्ध शेतकरी आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 01:47 IST

दिल्ली ते जेएनपीटीदरम्यान मालगाडी वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग अर्थात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाकरिता पहिल्या टप्प्यात जमीन देण्यास शेतक-यांनी विरोध करून निम्म्यापेक्षा जास्त शेतक-यांनी मोबदला स्वीकारण्यास विरोध केला

- मुरलीधर भवार ।

कल्याण : दिल्ली ते जेएनपीटीदरम्यान मालगाडी वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग अर्थात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाकरिता पहिल्या टप्प्यात जमीन देण्यास शेतक-यांनी विरोध करून निम्म्यापेक्षा जास्त शेतक-यांनी मोबदला स्वीकारण्यास विरोध केला असतानाच दुस-या टप्प्यात ३४४ शेतक-यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रेडी रेकनरप्रमाणे सध्याचा जागेचा दर हवा असलेल्या शेतक-यांना सरकार देत असलेला मोबदला स्वीकारा, अन्यथा जागेची रक्कम न्यायालयात जमा करू, असा इशारा सरकारने दिला आहे. यामुळे शेतकरी व सरकार यामधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.कल्याण प्रांत कार्यालयात प्रकल्पबाधित शेतकºयांनी त्यांच्या जागेच्या मोबदल्याची रक्कम घेण्याकरिता आधारकार्ड, बँकेचा खाते क्रमांक जमा करण्याचे आवाहन वृत्तपत्रात जाहिरात देऊन केले होते. त्यासाठी १९ ते २६ सप्टेंबरची मुदत दिली आहे. मोबदल्याविषयी काही तक्रार असल्यास त्याविषयी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याची मुभा दिली आहे. परंतु, जो मोबदला जाहीर करण्यात आला आहे, तो प्रथम स्वीकारा. त्यानंतर, कमीजास्त रकमेविषयी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागावी, असे सरकारने म्हटले आहे. जे मोबदला स्वीकारणार नाहीत, त्यांची रक्कम न्यायालयात जमा केली जाईल, असे बजावल्याने सरकारकडून जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप प्रकल्पबाधितांनी केला आहे.निळजेतील प्रकल्पबाधित शेतकरी प्रकाश पाटील यांनी सांगितले की, ‘गावातील आठ शेतकºयांची जागा प्रकल्पात जात आहे. त्या बदल्यात २०१३ मधील रेडी रेकनरप्रमाणे मोबदला दिला जात आहे. मोबदला २०१७ च्या रेडी रेकनर दराप्रमाणे दिला जावा, अशी आमची मागणी आहे. २०१३ मध्ये एक गुंठा जमिनीला १४ लाख २० हजार रुपये दर होता, तर २०१७ मधील रेडी रेकनरनुसार एक गुंठा जमिनीला २० लाखांचा दर आहे. यापूर्वी गावातून दिवा-पनवेल मार्गासाठी जागा संपादित करण्यात आली. आता डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी जागा घेतली जात नाही. रेल्वे मार्गासाठी जमिनी देऊनही आम्हाला मोबदला मिळालाच नव्हता. आमच्या भावकीची आठ जणांची शेतजमीन प्रकल्पात बाधित होत आहे. कुणाची जागा कमी व जास्त आहे. मिळालेली रक्कम कशी वाटून घेणार. आमची किती जागा घेतली जाणार आहे, तिचे सीमांकन काय, त्याची कल्पना नाही. त्यामुळे आमचा विरोध आहे.’यासंदर्भात कल्याण प्रांत कार्यालयातील अधिकारी डी. पी. म्हात्रे म्हणाले की, मोबदल्याची रक्कम घेण्यासाठी आमच्याकडे अद्याप एकही प्रकल्पबाधित आलेला नाही. विविध तारखा विविध प्रकल्पबाधितांना दिलेल्या आहेत. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी महामंडळ स्थापन केले आहे. त्यांच्या माध्यमातून जमीन संपादनाची प्रक्रिया राबवली जात आहे. कल्याण तालुक्यातील १० गावे या प्रकल्पामुळे बाधित होणार आहे. प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी डहाणूच्या उपजिल्हाधिकारी प्रतिभा पुदलवाड यांना २०१३ मध्ये नियुक्त केले होते. प्रकल्पाच्या जमीन संपादनास तेव्हा तीव्र विरोध झाल्यावर त्या वेळच्या रेडी रेकनर दराप्रमाणे प्रतिचौरस मीटर जागेसाठी तीन हजार ३०० रुपये दर दिला गेला. हा दर ३० टक्क्यांनी जास्त होता. जमीन संपादनाची प्रक्रिया तीन वर्षे चालली. मोबदला किती व कशा स्वरूपात द्यायचा, यावर २००३ मध्ये एकमत झालेले नव्हते. २००९ पासून प्रकल्पाचे काम सुरू आहे. जमीन संपादनाचीच प्रक्रिया किचकट व वेळखाऊ असल्याने २०१७ पर्यंत ही प्रक्रिया सुरूच आहे. हा कॉरिडॉर झाला की, मालगाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उपलब्ध होईल.प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व मोबदल्यावर निर्णय घेण्याची मागणी खा. श्रीकांत शिंदे यांनी जुलै २०१६ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली होती. मात्र, अद्याप हा तिढा सुटलेला नाही.दुसºया टप्प्यात ३४४ शेतकरी होणार बाधितदिल्ली ते जेएनपीटीदरम्यान डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर या देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मोबदलावाटप करण्यात आले आहे. प्रकल्पबाधित शेतकºयांची संख्या २७५ इतकी होती. त्यापैकी अर्ध्या शेतकºयांनी रक्कम स्वीकारलेली नाही.आता दुसºया टप्प्यात ३४४ शेतकरी प्रकल्पबाधित होणार आहेत. त्यांना २२६ कोटी रुपयांचा मोबदला देय आहे. दुसºया टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील भोपर, उसरघर, निळजे, गावदेवी, काटई, नांदिवली येथील सात हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी रायगड आणि पालघर जिल्ह्यांमधीलही जमीन संपादित केली जात आहे.