शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत घट; मृत्युदरही शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:59 IST

कोरोना काळात ठरली दिलासादायक बाब

-  सुनील घरतपारोळ : पालघर जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले असताना, डेंग्यूसारख्या रुग्णांची संख्या या वर्षी जिल्ह्यात कमी झाल्याचे आणि मृत्युदरही शून्यावर आल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासा देणारी बाब ठरली आहे.राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाबरोबर डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असताना, पालघर जिल्ह्यात डेंग्यूच्या तापाचे प्रमाण कमी आहे. डेंग्यू हा एडीस् इजिटी या डासापासून होतो. डेंग्यू तापाकडे दुर्लक्ष झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. या वर्षी जिल्ह्यात केवळ ४५ रुग्ण आढळून आले असून, एकाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यूची भीती कमी झाली आहे. विशेष म्हणजे, वसई-विरार शहर महापालिकेतही या वर्षी डेंग्यूच्या रुग्णांची नोंद कमी झाली आहे, तर वसई, जव्हार, तलासरी या तालुक्यात डेंग्यूचा दर शून्यावर आहे.पालघर जिल्हा अजूनही कोरोनातून भयमुक्त झालेला नाही. मात्र, डेंग्यूची भीती कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप विभागाकडून मोठ्या प्रमाणात डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून डेंग्यूच्या निर्मूलनासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून, त्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात सन २०१९ मध्ये डेंग्यूचे २७१ रुग्ण आढळले होते. मात्र, आरोग्य विभागाकडून त्या रुग्णांवर वेळीच उपचार केल्याने एकही रुग्ण दगावला नव्हता. त्यानंतर, चालू वर्षात जानेवारी, २०२० पासून जिल्ह्यात केवळ ४५ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे.खासगी रूग्णालयांतूनही डेंग्यू रूग्णांची मिळते माहिती खासगी रुग्णालयांनामध्येही डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाला माहिती कळविण्यात येते. जिल्ह्यातील तालुक्यानुसार रुग्णसंख्या पालघर-४, डहाणू-१८, वाडा-१०, मोखाडा-५, वसई-विरार महापालिका-७ रुग्ण. वसई, तलासरी, जव्हार तालुक्यांमध्ये एकही डेंग्यूचा रुग्ण नाही. डेंग्यूची लक्षणे अचानक जोराचा ताप येणे. डोक्याचा पुढचा भाग खूप दुखणे. डोळ्याच्या मागील भागात वेदना होणे. स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होणे. छाती आणि त्यावर गोवरासारखे पुरळ येणे. मळमळणे आणि उलट्या होणे. त्वचेवर वृण उठणे.जिल्ह्यात डास निर्मूलनाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून खासगी रुग्णालयांनाही सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाला रुग्णाबद्दल माहिती कळविण्यात येते.- सागर पाटील, हिवताप अधिकारी, पालघर जिल्हा

टॅग्स :dengueडेंग्यू